मंगलवार, 4 अक्तूबर 2011

विजयादशमीच्या हार्दीक शुभेच्छा

शुभ दशहरा
विजयादशमी. एक विजयाचा उत्सव दिन. विजय आपल्या सर्वांचा. आता येणारा प्रत्येक दिवस हा सोनेरी चिमुकल्या पावलांनी येणारा. प्रत्येक सोनेरी क्षणाचा सोबती. मैत्रीचे पवित्र नात जपणारा. आपल्या जीवनात सुख-समाधान, समृद्धी, देणारा विजयादशमीचा दिवस... आपल्या सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा...
 ============================================

विजय का पर्व विजयादशमी की हार्दिक बधाई
 ============================================
सोनेरी शुभेच्छा. आली विजयादशमी. एक नवी शुभेच्छा 
============================================
दस-याच्या हार्दीक शुभेच्छा
 ============================================
दारावर तोरण आणि अंगणी रांगोळी, देवघरातील पाटीवर सरस्वती विराजली, सोने लुटुन आज साजरा करुया दसरा, लाभो सुख समृ ध्दी किर्ती तुम्हाला. सर्वांना विजया दशमी अर्थात दस-याच्या हार्दीक शुभेच्छा !!! 
 ============================================
सर्वांना विजयादशमीच्या हार्दीक शुभेच्छा
  ============================================

 




     



दसर्‍याच्या दिवशी सोने म्हणून आपट्याची पाने का देतात ? 
 १.मीची पाने : दसर्‍याच्या दिवशी शमीची पाने एकमेकांना प्रदान करू नयेत, तर ती पाने आपल्या वास्तूत ठेवावीत. यामुळे वास्तूतील वायुमंडल शुद्ध होण्यास मदत होते. शमी ही तेजतत्त्वरूपी आहे. ही तम-रजात्मक असल्याने तिच्यातून प्रक्षेपित होणारे तेजकण हे वातावरणात आगीची निर्मिति करतात. या सूक्ष्म ज्वाळांनी जिवाचा क्षात्रभाव जागृत होण्यास मदत होते. क्षात्रभाव हा आत्मशक्‍तीच्या बळावर जिवाला संस्कारात्मक अशा क्षात्रवृत्तीकडे नेतो.

वनवासाला जातांना पांडवांनी शमीच्या झाडाच्या ढोलीत शस्त्रे ठेवली होती. शमीच्या खोडातून व पानांतून उत्पन्न होणार्‍या तेजतत्त्वरूपी धगीमुळे शस्त्रांतील सुप्‍त मारक शक्‍ती अखंड कार्यरत अवस्थेला राहू शकते.

२. पट्याची पाने : ही आप व तेज या कणांशी निगडित असल्याने शमीकडून प्रक्षेपित झालेल्या लहरी या आपट्याच्या पानांकडून ग्रहण केल्या जाऊन त्या आपतत्त्वाच्या बळावर प्रवाही बनवल्या जातात व जेव्हा या आपट्यांच्या पानांचे आदान-प्रदान होते, त्या वेळी हे तेजतत्त्वरूपी कण आपट्याच्या पानातून जिवाच्या तळहाताकडे संक्रमित होतात. यामुळे जिवाच्या हातावरील देवतांच्या स्थानांचे बिंदू कार्यरत होऊन त्या बिंदूतून ते ते आवश्यक तत्त्व जिवाच्या सूक्ष्मदेहापर्यंत आपकणांच्या साहाय्याने झिरपले जाते.
या कारणास्तव शमीची पाने घरात ठेवून दसर्‍याच्या दिवशी वायुमंडलाची शुद्धी करावी व त्यानंतर आपट्याच्या पानांतून तेजतत्त्व एकमेकांना प्रदान करून ईश्‍वरी राज्य स्थापनेला लागणारा क्षात्रभाव जागृत अवस्थेत ठेवावा. 

`शमी तम-रजात्मक असल्याने तिच्यातून प्रक्षेपित होणारे तेजकण हे वातावरणात आगीची निर्मिति करतात.' तम-रजात्मक शमीतून तेजकण कसे प्रक्षेपित होतील ?

एक विद्वान : शमीतून प्रक्षेपित होणार्‍या तम-रजात्मक लहरी या तेजतत्त्वाच्या साहाय्याने वातावरणात प्रकट कार्य करतात. यामुळे प्रथम शमीपत्रातील रजोकणांच्या घर्षणातून उत्पन्न झालेली ऊर्जा तेजाची निर्मिती करते व हेच तेज अग्नीच्या रूपाने तमोकणांच्या साहाय्याने वातावरणातील काळया कणांचे विघटन करते, म्हणजेच शमीपत्र हे तमोकणांच्या साहाय्याने काळया कणांचा लय करते
 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly