मंगलवार, 8 नवंबर 2016

हजार – पाचशेच्या नोटा चलनातून बाद; नरेंद्र मोदींची घोषणा

हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ही

पंतप्रधान नरेंद्र मोदी

काळा पैसा आणि विदेशातून येणाऱ्या नकली नोटांना रोखण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ही घोषणा केली. आज रात्री मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज रात्री आठच्या सुमारास देशवासियांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशातील गंभीर मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यात काळा पैसा आणि बोगस नोटांबाबत बोलताना त्यांनी ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा केली. आज मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयामुळं देशवासियांमध्ये निर्माण होणार संभ्रम दूर केला. तुम्हाला कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. या नोटांना बँक खाते आणि पोस्ट खात्यात जमा करू शकतात. सुरूवातीच्या काळात बँक खात्यातून ठराविक रक्कमच काढता येईल, असं त्यांनी सांगितलं. हजार आणि पाचशेच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी ५० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. तत्काळमध्ये १० नोव्हेंबर ३० डिसेंबर या कालावधीत बँक आणि पोस्ट खात्यात ओळखपत्र म्हणजेच पॅन कार्ड आणि आधार कार्ड सादर करून तुम्ही नोटा बदलू शकता.
९ नोव्हेंबरला सर्व बँका बंद राहणार
दरम्यान, देशभरातील सर्व बँका उद्या म्हणजेच ९ नोव्हेंबरला बंद राहणार आहेत. आता २००० च्या नवीन नोटा चलनात आणण्यात येणार आहेत. रिझर्व्ह बँकेनं तसा प्रस्ताव स्वीकारला आहे. १० नोव्हेंबरलाही काही एटीएम मशीन बंद ठेवण्यात येणार आहेत.

Rs 500, Rs 1,000 note rumours, not polls, behind cash surge? Accept Rs 500/1,000 n


modi, pm modi
Prime Minister Narendra Modi talked about fighting corruption and black money during his address to the nation on Tuesday. In a major step to check black money, the prime minister announced demonetization of Rs 500 and 100 currency notes. He said the government has been fighting the menace of black money and corruption ever since it assumed power two years ago.
Earlier in the day, he met Chiefs of Army and Navy Staffs and Vice Chief of Air Staff, who came to brief him on the security preparedness of the forces manning the border outposts. National Security Advisor Ajit Doval was also present during the briefing. During the meeting, the Prime Minister is understood to have taken stock of the situation along the Line of Control (LoC) and International Border where Pakistan has been regularly shelling military posts as well as civilian areas.
Army Chief Gen Dalbir Singh Suhag is believed to have briefed Modi on the situation and how the forces are handling the Pakistani provocation.

8, 20168:38 PM

Notes of Rs 2000 and Rs 500 will be circulated soon, RBI has decided to limit the notes with higher value: PM Modi

8, 20168:37 PM

On November 9, all banks will remain closed for public work: PM Narendra Modi

8, 20168:37 PM

PM Modi urges people to help the government in fight against black money and fake currency notes













Rs 500, Rs 1,000 note rumours, not polls, behind cash surge?
Accept Rs 500/1,000 notes only after careful scrutiny: RBI - The ..
.PM address LIVE: Modi scraps Rs 500 and Rs 1,000 notes to put full ...
Rs 500, Rs 1,000 notes withdrawn, PM announces in emergency ...
PM Modi Live: New Rs 2,000, Rs 500 Notes to be Issued Soon - News18
Rs 500, Rs 1000 notes to be illegal from midnight today: Narendra Modi
LIVE: PM Modi Scraps ?1000 and ?500 currency notes - Times Now
Rs 500 and Rs 1000 notes cease to be legal tender from midnight: PM ...
LIVE: Rs 500 and 1000 currency notes stand abolished from midnight ...
500 and 1000 notes news on Twitter

शुक्रवार, 4 नवंबर 2016

पावसाळा कोट्‌स




पावसाळा कोट्‌स

अलंकारिक भाषेत म्हणायचे झाल्यास जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ढग रडताहेत! आपण पाहिलेली स्वप्ने विखुरताहेत, शहराची व्यवस्था पण ढासळतेय, शहरातील लोकांचा अहंकार नष्ट होतोय, शहरातील रहिवाशांची फक्त तक्रारच ऐकावी लागते. निष्काळजीपणाने डुकरांच्या झुंडीवर झुंडी हिंडताहेत, अशा परिस्थितीत खूप घाण होते. पण डुकरांची मजा असते आणि साफ करणं माणसाला फार कठीण जातं.
पावसाने दगा दिला. चहूकडून ढग आकाशात जमले. ढग असे सरकत होते, जणू प्रेमिकेने आपली कूस बदलली. ढगाने गडगडाट केला आणि बरसायला सुरुवात केली. एक ना एक दिवस पाऊस पडणारच होता. मी सारखे लक्ष देऊन होते. जलधारांच्या सुरांच्या नाद-लयीकडे सारखे लक्ष जात होते.
आता तर नाले भरून जातील. दरवर्षी जमणारा उन्हाळ्यातील कचरा, नंतर होणारी पानझड, म्हणून अजून कचरा आणि नंतर तो ‘घुमड घुमड कर आई रे घटा’ म्हणावे असा पाऊस! अशा वेळेस वादळ सुटते. सगळा कचरा त्या पाण्याबरोबर वाहून एका जागी गोळा होतो. नाल्यात अडकतो. एखादी स्त्री आपल्या मुलाला सांगून कचरा खाली आलेल्या कचरागाडीत टाकायला देते. तो मुलगा कचरागाडी आली का नाही हे न बघता कुठेतरी नाल्याच्या कोपऱ्याला टाकून आपल्या कामासाठी निघून जातो. तोच कचरा नालीत अडकतो आणि कॅरी बॅग्स तरंगत फुगा बनून अडथळा करतात. नालेसफाई झाली तरी काही ठिकाणचे तसेच राहून जाते. परत आलेल्या धुवाधार पावसाने अजून कचरा साठतच जातो आणि लोकांना नगरपालिकेकडे धाव घ्यावी लागते. गल्लीबोळातून पाणी साठते आणि दरुगधी पसरायला लागते.
मी पण कल्पना करतेय की, कोणीतरी वयस्कर जोडपे त्या रिमझिम पावसात अडकले आहे. त्याला पायी येण्यासाठी अडचण होतेय आणि पावसाची रिप रिप तर थांबणं शक्य दिसत नाहीय. आनंदी आणि समाधानी वृत्तीचे प्राणी असतील तर म्हणणार ‘बरसात में मिले तुम सजन बरसात में’ हा नर्गिस-राज कपूरचा सिनेमा. अशा समाधानी आणि खेळीमेळीच्या वृत्तीतून जरी पावसात भिजणे झाले तरी शेवटी काही वेळेस माणूस या पावसाचा ओलेपणा नाही सहन करू शकत आणि मग आजारी पडतो. आजार त्रस्त करून सोडतात. नद्यांच्या काठाने मानवी संस्कृती विकसित होते. नद्याही प्रदूषणाच्या विळख्यातून सुटत नाहीत. परंतु मानवाने इतक्या झपाटय़ाने ‘प्रगती’ केली की जणू नदीच आपली आश्रित आहे. आपल्या कचऱ्याचे हलाहल, मल जल आणि सांडपाण्याचे विष तिला पाजून त्रस्त करून सोडलं. प्रदूषण मंडळाने प्रमुख नद्यांचे १५० टापू प्रदूषित असल्याचे २०१३ च्या शेवटी जाहीर केले आहे.
पाऊस संपला!! जणू कोणीतरी माझ्याजवळचं माणूस दूर गेल्यासारखं वाटतंय! उगाच हुरहुर, गप्पांना कारण! विषय काय, तर आज पाऊस पडेल. आज पाऊस आलाच नाही. उद्या पाऊस येणार का, आता आपल्याला पाऊस हवा अजून! बस झाला बाई, हा तर खूपच बरसलाय. या असतात पावसाच्या आगमनाच्या, अंदाजाच्या आणि त्याच्या जास्त येण्याने कंटाळवाणं करण्याच्या पावसाच्या गप्पा!! हल्ली मला वेडच लागलंय जणू! वर्तमानपत्रांच्या, टीव्हीवरच्या किंवा कुणाच्या बोलण्यावर (फोनवर किंवा सहज) लक्ष देऊन ऐकते आणि हवामानाच्या अंदाजावर विचार करताना पावसाळी चित्रे पाहिली की मला काव्य स्फुरायला लागते. पाऊस पडण्याची मला मजा वाटते. नगरपालिकेने नाले साफ केले नाहीत, त्यामुळे कचरा तुंबून सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. त्यात कदाचित नावेही चालवता येतील. दूर कामाच्या निमित्ताने गेलेली व्यक्ती परतताना किंवा कोणी कधी नव्हे तो नि ती बाहेर पडलीत आणि अचानक त्या वेळी पावसाने धूम मचवली आहे. ‘बरसात में हमसे मिले तुम सजन बरसात में’ असे म्हणत म्हणत रस्ता संपवावा लागेल की काय? आणि मी मात्र त्यावर काव्य करण्याचा विचार करते आणि मग कागदावर उतरते ती कविता. पावसाळी कवीची कल्पना, चार महिने उन्हाळा वगैरे वगैरे.
हवामान खात्याने भविष्यवाणी वर्तवली आणि पावसाच्या बाबतीत ती शंभर टक्के खरी ठरली, असे कधी होऊ शकेल का? मान्सून दहा दिवसांनी बरसेल, मृग गडगडाट करून करून थकला असेल. बिच्चारा पाऊस!! आणि या पावसाची कोणतीही वेळ आणि काळ असो! समजा एखादी स्त्री बाल्कनीत वाट पाहत असताना म्हणेल की ‘मेरे पिया गये रंगून वहां से किया है टेलिफोन’ कारण रंगूनमध्ये खूप पाऊस नेहमी पडत असतो.
यमक जुळवण्याचे आणि अर्थपूर्ण ओळी झाल्या की नाही हे मी परत परत वाचून पाहते. जमलेच तर एखादा श्रोता पाहते आणि माझं दीर्घ काव्य किंवा चार ओळीचं काव्य अजमावून घेतेच घेते आणि लागलीच कुठेतरी ते प्रकाशित करण्याचा चंगही बांधते. काव्याच्या पुस्तकासाठी प्रकाशकाकडे विचारणा करते. गेलेल्या पावसाच्या कवितांचे मूल्यमापन करून प्रकाशकही विचारात पडलेले मला समजलं. त्यांचा निरोप इनडायरेक्ट की पावसावरील कवितांचे अल्प स्वरूप होऊ शकेल तर?
पावसाळा निबंध मराठी पावसाळा माहिती माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध पावसाळा वर निबंध पावसाळा कविता पावसाळा निबंध in marathi पावसाळ्यातील दिवस निबंध माझा आवडता ऋतू हिवाळा

fly