शुक्रवार, 4 नवंबर 2016

पावसाळा कोट्‌स




पावसाळा कोट्‌स

अलंकारिक भाषेत म्हणायचे झाल्यास जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ढग रडताहेत! आपण पाहिलेली स्वप्ने विखुरताहेत, शहराची व्यवस्था पण ढासळतेय, शहरातील लोकांचा अहंकार नष्ट होतोय, शहरातील रहिवाशांची फक्त तक्रारच ऐकावी लागते. निष्काळजीपणाने डुकरांच्या झुंडीवर झुंडी हिंडताहेत, अशा परिस्थितीत खूप घाण होते. पण डुकरांची मजा असते आणि साफ करणं माणसाला फार कठीण जातं.
पावसाने दगा दिला. चहूकडून ढग आकाशात जमले. ढग असे सरकत होते, जणू प्रेमिकेने आपली कूस बदलली. ढगाने गडगडाट केला आणि बरसायला सुरुवात केली. एक ना एक दिवस पाऊस पडणारच होता. मी सारखे लक्ष देऊन होते. जलधारांच्या सुरांच्या नाद-लयीकडे सारखे लक्ष जात होते.
आता तर नाले भरून जातील. दरवर्षी जमणारा उन्हाळ्यातील कचरा, नंतर होणारी पानझड, म्हणून अजून कचरा आणि नंतर तो ‘घुमड घुमड कर आई रे घटा’ म्हणावे असा पाऊस! अशा वेळेस वादळ सुटते. सगळा कचरा त्या पाण्याबरोबर वाहून एका जागी गोळा होतो. नाल्यात अडकतो. एखादी स्त्री आपल्या मुलाला सांगून कचरा खाली आलेल्या कचरागाडीत टाकायला देते. तो मुलगा कचरागाडी आली का नाही हे न बघता कुठेतरी नाल्याच्या कोपऱ्याला टाकून आपल्या कामासाठी निघून जातो. तोच कचरा नालीत अडकतो आणि कॅरी बॅग्स तरंगत फुगा बनून अडथळा करतात. नालेसफाई झाली तरी काही ठिकाणचे तसेच राहून जाते. परत आलेल्या धुवाधार पावसाने अजून कचरा साठतच जातो आणि लोकांना नगरपालिकेकडे धाव घ्यावी लागते. गल्लीबोळातून पाणी साठते आणि दरुगधी पसरायला लागते.
मी पण कल्पना करतेय की, कोणीतरी वयस्कर जोडपे त्या रिमझिम पावसात अडकले आहे. त्याला पायी येण्यासाठी अडचण होतेय आणि पावसाची रिप रिप तर थांबणं शक्य दिसत नाहीय. आनंदी आणि समाधानी वृत्तीचे प्राणी असतील तर म्हणणार ‘बरसात में मिले तुम सजन बरसात में’ हा नर्गिस-राज कपूरचा सिनेमा. अशा समाधानी आणि खेळीमेळीच्या वृत्तीतून जरी पावसात भिजणे झाले तरी शेवटी काही वेळेस माणूस या पावसाचा ओलेपणा नाही सहन करू शकत आणि मग आजारी पडतो. आजार त्रस्त करून सोडतात. नद्यांच्या काठाने मानवी संस्कृती विकसित होते. नद्याही प्रदूषणाच्या विळख्यातून सुटत नाहीत. परंतु मानवाने इतक्या झपाटय़ाने ‘प्रगती’ केली की जणू नदीच आपली आश्रित आहे. आपल्या कचऱ्याचे हलाहल, मल जल आणि सांडपाण्याचे विष तिला पाजून त्रस्त करून सोडलं. प्रदूषण मंडळाने प्रमुख नद्यांचे १५० टापू प्रदूषित असल्याचे २०१३ च्या शेवटी जाहीर केले आहे.
पाऊस संपला!! जणू कोणीतरी माझ्याजवळचं माणूस दूर गेल्यासारखं वाटतंय! उगाच हुरहुर, गप्पांना कारण! विषय काय, तर आज पाऊस पडेल. आज पाऊस आलाच नाही. उद्या पाऊस येणार का, आता आपल्याला पाऊस हवा अजून! बस झाला बाई, हा तर खूपच बरसलाय. या असतात पावसाच्या आगमनाच्या, अंदाजाच्या आणि त्याच्या जास्त येण्याने कंटाळवाणं करण्याच्या पावसाच्या गप्पा!! हल्ली मला वेडच लागलंय जणू! वर्तमानपत्रांच्या, टीव्हीवरच्या किंवा कुणाच्या बोलण्यावर (फोनवर किंवा सहज) लक्ष देऊन ऐकते आणि हवामानाच्या अंदाजावर विचार करताना पावसाळी चित्रे पाहिली की मला काव्य स्फुरायला लागते. पाऊस पडण्याची मला मजा वाटते. नगरपालिकेने नाले साफ केले नाहीत, त्यामुळे कचरा तुंबून सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. त्यात कदाचित नावेही चालवता येतील. दूर कामाच्या निमित्ताने गेलेली व्यक्ती परतताना किंवा कोणी कधी नव्हे तो नि ती बाहेर पडलीत आणि अचानक त्या वेळी पावसाने धूम मचवली आहे. ‘बरसात में हमसे मिले तुम सजन बरसात में’ असे म्हणत म्हणत रस्ता संपवावा लागेल की काय? आणि मी मात्र त्यावर काव्य करण्याचा विचार करते आणि मग कागदावर उतरते ती कविता. पावसाळी कवीची कल्पना, चार महिने उन्हाळा वगैरे वगैरे.
हवामान खात्याने भविष्यवाणी वर्तवली आणि पावसाच्या बाबतीत ती शंभर टक्के खरी ठरली, असे कधी होऊ शकेल का? मान्सून दहा दिवसांनी बरसेल, मृग गडगडाट करून करून थकला असेल. बिच्चारा पाऊस!! आणि या पावसाची कोणतीही वेळ आणि काळ असो! समजा एखादी स्त्री बाल्कनीत वाट पाहत असताना म्हणेल की ‘मेरे पिया गये रंगून वहां से किया है टेलिफोन’ कारण रंगूनमध्ये खूप पाऊस नेहमी पडत असतो.
यमक जुळवण्याचे आणि अर्थपूर्ण ओळी झाल्या की नाही हे मी परत परत वाचून पाहते. जमलेच तर एखादा श्रोता पाहते आणि माझं दीर्घ काव्य किंवा चार ओळीचं काव्य अजमावून घेतेच घेते आणि लागलीच कुठेतरी ते प्रकाशित करण्याचा चंगही बांधते. काव्याच्या पुस्तकासाठी प्रकाशकाकडे विचारणा करते. गेलेल्या पावसाच्या कवितांचे मूल्यमापन करून प्रकाशकही विचारात पडलेले मला समजलं. त्यांचा निरोप इनडायरेक्ट की पावसावरील कवितांचे अल्प स्वरूप होऊ शकेल तर?
पावसाळा निबंध मराठी पावसाळा माहिती माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध पावसाळा वर निबंध पावसाळा कविता पावसाळा निबंध in marathi पावसाळ्यातील दिवस निबंध माझा आवडता ऋतू हिवाळा

fly