सोमवार, 4 सितंबर 2023

Acidity व उपाय

 Acidity व उपाय          



जेव्हा पोटातील गॅस्ट्रिक ग्लँड ही ॲसिडचे उत्पादन वाढवू लागते, त्या स्थितीला ॲसिडिटी (acidity)असे म्हणतात. सामान्यत: आपल्या पोटात हायड्रोक्लोरिक ॲसिडचा स्त्राव होतो, जो अन्न पचवण्याचे व ते तोडण्याचे कार्य करतो. एखाद्या व्यक्तीला जेव्हा ॲसिडिटीचा त्रास होतो तेव्हा शरीरात अपचन, छातीत जळजळ होणे, अन्ननलिकेत वेदना होणे, पोटात अल्सर आणि जळजळ (burning sensation) होणे अशी लक्षणे दिसून येतात. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, ताणतणाव, धूम्रपान, मद्यपान, व्यायामाचा अभाव आणि खराब जीवनशैली (bad lifestyle) यामुळे ॲसिडिटी होते. त्याशिवाय जे लोक जास्त प्रमाणात मांसाहार करणाऱ्या किंवा अति तेलकट व तिखट पदार्थ खाणाऱ्यानाही ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. काही औषधांनी ॲसिडिटीचा कमी होऊ शकतो, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत.




ज्या लोकांना ॲसिडिटीची समस्या असते त्यांना अन्ननलिकेत वेदना होणे तसेच जेवल्यानंतर पोटात जळजळ होणे आणि आंबट ढेकर येणे अशी लक्षणे जाणवतात. तर काही वेळा त्यांना बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास देखील होतो. जीवनशैलीत बदल करणे व खाण्यापिण्याच्या सवयी सुधारणे या उपायांनी ॲसिडिटीवर उपचार करता येऊ शकतात. काही घरगुती उपायांनीही ॲसिडिटीचा त्रास कमी करता येऊ शकतो.




अॅसिडीटीमुळे त्रस्त आहात? मग, ‘हा’ घरगुती उपाय नक्की ट्राय करा!



– पोटात जळजळ होणे


– घशात जळजळणे


– अस्वस्थ वाटणे


– आंबट ढेकर येत राहणे


– तोंडाची चव जाणे


– बद्धोष्ठतेचा त्रास होणे.


कशामुळे होतो ॲसिडिटी ?


1) सतत मांसाहार व तेलकट, तिखट पदार्थ खाणे


2) धूम्रपान व मद्यपान करणे


3) ताणतणाव


4) पोटाचे आजार


कसा करावा ॲसिडिटीपासून बचाव ?


– मसालेदार अन्नपदार्थ खाणे टाळावे.


– आहारात जास्तीत जास्त भाज्या व फळांचा समावेश करावा.


– भरपूर पाणी व द्रव पदार्थांचे सेवन करून शरीर हायड्रेटेड ठेवावे.


– अन्न चावून चावून सावकाश खावे.


– जेवणानंतर लगेच झोपू नये. जेवण व झोप यात कमीत कमी 3 तासांचे अंतर ठेवावे.


– तुळशीची पाने, लवंग, बडीशोप इत्यादी पदार्थांचे सेवन करावे.


– गरज नसताना औषधं घेणे टाळावे.


मंगलवार, 29 अगस्त 2023

भारतात आहेत या १५ चित्रविचित्र रहस्यमयी जागा...

 भारतात आहेत या १५ चित्रविचित्र रहस्यमयी जागा... 


१. उंदरांचं मंदिर - करणी माता मंदिर, राजस्थान 

बिकानेरपासून ३० किलोमीटर अंतरावर असणारं हे मंदिर २०,००० उंदरांचं घर आहे. इतकंच नाही तर इथे उंदरांची पूजाही केली जाते. हे उंदिर म्हणजे देवीचा अवतार असल्याचं इथे मानलं जातं. 


२. पक्ष्यांची सामूहिक आत्महत्या - जतिंगा, आसाम

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात आसाममधील जतिंगा गावात स्थलांतर करणारे हजारो पक्षी अतिवेगाने उडत येतात आणि येथील झाडांना आणि घरांना मुद्दामून आपटतात आणि मरण पावतात. ते असं का करतात, हे एक मोठं कोडं आहे. 


३. लोकतकचा तरंगता तलाव - मणिपूर

मणिपूरचा लोकतक तलाव हा जगातील एक नैसर्गिक आश्चर्य आहे. या तलावात अनेक अशी बेटं आहेत जी तरंगत राहतात. माणसं या बेटांवर शेती करतात. तसेच तेथे जगातील काही दुर्मिळ प्राणीही आढळतात. दरवर्षी हजारो पर्यटक या बेटांना भेट देतात. 


४. रुपकुंड तलाव - उत्तराखंड 

उत्तराखंडात हिमालयाच्या कुशीत १६,५०० फुटांवर रुपकुंड तलाव आहे. इथे कोणत्याही प्रकारची मानवी वस्ती अस्तित्वात नाही. तरीही इथे नवव्या शतकातले ६०० मानवी सांगाडे सापडले आहेत. हे सांगाडे इथे कसे आले त्याची कोणालाही माहिती नाही.


५. कुंभलगड किल्ल्याच्या भिंती - राजस्थान 

चीनच्या ग्रेट वॉलबद्दल तर आपल्याला माहिती असतं. पण, राजस्थानच्या कुंभलगड किल्ल्याला असलेली ३६ किलोमीटरची भिंत ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब भिंत आहे. या भिंतीत जवळपास ३०० मंदिरं आहेत. 


६. कोलकत्यातील वडाचे झाड

कोलकत्याच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये असलेले हे वडाचे झाड म्हणजे एक आश्चर्य आहे. हे वडाचे झाड म्हणजे एक जंगलच आहे. ते २०० वर्ष जुने आहे. ते इतके पसरले आहे की त्याचा परीघ जवळपास २ किलोमीटर इतका प्रचंड आहे. 


७. चुंबकीय टेकडी - लडाख 

लेह लडाख येथे असलेली चुंबकीय टेकडी हे एक मोठे आश्चर्य आहे. इथे एका विशिष्ट जागी न्यूट्रल गीअरमध्ये गाडी उभी केल्यास ती आपोआप या टेकडीकडे आकर्षित होते. 


८. कोडीन्ही गाव - केरळ

केरळमधील या २००० लोकवस्ती असलेल्या गावात तब्बल ३५० जुळ्यांचा जन्म झाला आहे. दर १००० लोकांमागे ४२ जुळ्यांचा जन्म या गावात नोंदवला गेला आहे. 


९. पंबन बेटावरचे तरंगते दगड - रामेश्वरम

रामेश्वरमनजीकच्या पंबन बेटावरुन रामाने रामसेतू बांधला अशी आख्यायिका आहे. याच बेटावर असे काही दगड आढळतात जे पाण्यावर तरंगतात. रामाने सेतू बांधण्यासाठी हेच दगड वापरले असावेत अशी समजूत आहे.


१०. झाडांच्या मुळांचे पूल - चेरापूंजी, मेघालय 

मेघालयमधील लोकांनी इथल्या जंगलातील झाडांच्या विस्तृत मुळांना असा काही आकार दिला की त्या मुळांचे साकव तयार झाले. गावातील लोक हे साकव दळणवळणासाठी वापरतात. 


११. लटकते खांब - लेपक्षी, आंध्र प्रदेश 

आंध्र प्रदेशातील लेपक्षी मंदिरातील ७० खांबांपैकी एक खांब असा आहे जो कोणत्याही आधाराशिवाय लटकतो. या खांबाच्या खालून एखादा कपडा किंवा ओढणीही आरपार जाऊ शकतो. 


१२. महाबलीपुरममधील झुलता दगड - तामिळनाडू 

भौतिकशास्त्राच्या सर्व नियमांना तिलांजली देणारा एक मोठा खडक महाबलिपूरम येथे आहे. त्याला प्रेमाने कृष्णाचा लोण्याचा गोळा असंही म्हटलं जातं. कोणत्याही आधाराशिवाय हा पाच मीटर व्यासाचा खडक एका उतरत्या पृष्ठभागावर गेली अनेक शतकं उभा आहे. 


१३. बडा इमामबरा - लखनऊ, उत्तर प्रदेश 

लखनऊतील १८व्या शतकात बांधलेल्या या महालाचा राजदरबार ५० मीटर रुंद आहे. विशेष म्हणजे इतक्या रुंद दरबारात एकही खांब नाही. वास्तूविशारदांमध्ये या दरबाराच्या बांधकामाविषयी आश्चर्य व्यक्त केलं जातं. 


 १४. मोटरसायकल बुलेट बाबाचं मंदिर - राजस्थान

एका व्यक्तीच्या रस्त्यात झालेल्या अपघातानंतर त्याची बुलेट पोलिसांनी पोलीस स्थानकात आणली. दुसऱ्या दिवशी ती बुलेट अपघाताच्या ठिकाणी सापडली. पोलिसांनी ती पुन्हा आणून तिला साखळदंडांनी बांधून ठेवलं. तरीही ती अपघाताच्या ठिकाणी गेली. ती कशी गेली याची कोणालाच माहिती नाही. आता मात्र या बुलेटची पूजा केली जाते. प्रत्येक वाटसरू या बुलेट बाबाला वंदन करतो आणि मगच पुढचा प्रवास करतो. 


१५. आशियातील स्वच्छ गाव - मावलिंनॉग, मेघालय

मेघालयमधील चेरापुंजीजवळ असलेलं हे गाव आशियातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून प्रसिद्ध आहे. तसंच या गावात साक्षरतेचं प्रमाण १०० टक्के इतकं असून इथे प्रत्येकाला अस्खलित इंग्रजी बोलता येतं. 


     ही भारता विषयी माहिती तुम्हाला आवडतली तर नक्की पुढील ग्रुपला पाठवावी

fly