बुधवार, 5 अप्रैल 2023

उच्चशिक्षित चिमणीच रखडलेले लग्न ...

 


उच्चशिक्षित चिमणीच रखडलेले लग्न ...


*शहरात रहाणार्‍या एका टि रोजीपिकल, मध्यम वर्गीय,

 कुटुंबांत जन्मलेली  चिमणी लहानपणापासुनच अभ्यासात खूप हुषार. घरात आई वडील दोघेही नोकरी करणारे व एक मोठा भाऊ. भाऊ बी.कॉम. झाला व एका को ऑपरेटीव्ह बँकेत नोकरीला लागला.*


चिमणी हुशार म्हणुन इंजिनीयरींगला गेली. बी. ई. कॉम्प्युटर झाली. कॅम्पसमधेच तिला चांगले ७ लाखांचे पॅकेज मिळाले व वयाच्या बाविसाव्या वर्षी तिचा जॉब सुरु झाला तिचे आई वडील व भाऊ या तिघांच्या पगाराची बेरीज सुद्धा एवढी येत नव्हती त्यामुळे साहजिकच अरमान सातवे आसमान तक पहुंच गये थे. आता तिच्यासाठी वर संशोधन सुरू झाले.


मुलगा न्यूक्लियर फॅमिलीतला, वेल सेटल्ड  च हवा, इंजिनीयर च हवा, आय.टी. किंवा सॉफ्टवेअर मधला च हवा या च अटींवर ( व मुलाचे आईवडील सोबत नको ही सुप्त अट ) मुले बघायला सुरवात झाली.


सुरूवातीलाच एक स्थळ आले ते त्यांच्या ‘च’ च्या अटींमधे फिट्ट बसणारे होते. मुलगा एकुलता एक, आयटी इंजिनीयर, १० लाखांचे पॅकेज, देखणा, रुबाबदार व वेलसेटल्ड होता. आई वडील गावी रहाणारे भरपूर शेतीवाडी म्हणजे त्याची पण अडचण नव्हती. 


पण.....


मुलाचे वय होते २८ तर मुलीचे वय २३. वयामधे ५ वर्षांचे अंतर. चिमणीच्या आईला हे वयातील अंतर जास्त वाटले. तिच्या मते मुलाच्या व मुलीच्या वयामधे " २ ते ३ वर्षांपेक्षा जास्त अंतर नको" तसेच आत्ता तर सुरूवात केली आहे मिळतील याहून चांगले असा विचार करून ‘क्षमस्व’ म्हणुन मुलाला नकार कळवण्यात आला.


सुरुवातीलाच एवढे चांगले स्थळ चालून आल्याने व भरपूर चॉइस समोर दिसत असल्यामुळे अपेक्षा आणखीन वाढल्या. मुलगी बी.ई. आहे एवढा पगार आहे तर मुलगा वेल एस्टॅब्लिश व तिच्यापेक्षा जास्त शिकलेला हवा. नवऱ्याचे शिक्षण व पगार हे बायकोपेक्षा जास्त असले पाहिजे असे चिमणीच्या आईला वाटू लागले त्यामुळे मुलगा एम.ई., एम. टेक. एम.एस. किंवा पी. एचडी. झालेलाच असला पाहिजे अशी नवीन अट लागू झाली. आता या कॅटेगरीतली बहुसंख्य मुले वयाने जास्त, चष्मा लावणारी, टक्कल पडु लागलेली अशी होती. जी सुयोग्य मुलं या कॅटेगरीत बसत होती त्यांच्याही काही अपेक्षा होत्या व त्यांना याहून उत्तम स्थळे चालून येत असल्यामुळे ते चिमणीला नापसंत करत. त्यामुळे जी मुले चिमणीला पसंत पडत त्यांना चिमणी पसंत पडत नसे, आणि ज्या मुलांना चिमणी पसंत पडत असे ती मुले चिमणीला पसंत पडत नसत असा खेळ सुरू झाला.


बघता बघता या खेळात चार पाच वर्षे गेली चिमणीचे वय वाढत चालले. त्यामुळे थोडे कॉंप्रोमाईज करुन ‘ बी. ई. ला बी. ई. चालेल’ अशी अट शिथील करण्यात आली. पण पाच सहा वर्षांच्या जॉबमधे चिमणीचे पॅकेज चांगलेच वाढले होते. सांगुन येणार्‍या मुलांचे पॅकेज त्यापेक्षा कमी होते. चिमणीच्या आईच्या हो हो आईच्याच अटीत ती मुले बसत नव्हती.


बिझनेस करणारी व चिमणीपेक्षा जास्त कमावणारी मुले सांगुन आली. पण बिझनेस करत असल्याने जॉइन्ट फॅमिली होती. मुलीच्या संसारात आईवडिलांची व बाकीच्यांची अडचण नको हा सुप्त हेतू मनात असल्याने नोकरीवालाच पाहिजे हे कारण सांगून नकार कळवण्यात आला.


चिमणीचे वय २९ झाले आणि एक मोठ्ठा टर्निंग पॉइंट आला. चिमणीच्या भावाचे लग्न झाले. चिमणीलाही कंपनीने सहा महिने प्रोजेक्टसाठी अमेरिकेला पाठवले. परत आल्यावर नाही म्हटल तरी मिळत असलेला पगार, परदेशवारी मुळे आलेला मीपणा व नणंद भावजयीच्या नात्यातील पूर्वापार चालत आलेले प्रेम यामुळे घरात रोज कटकटी सुरू झाल्या त्यामुळे ती काही वर्षे पुन्हा परदेशी गेली.


आणखीन काही वर्षे गेली....


आता चिमणी तेहतीस वर्षांची झाली असून प्रौढ दिसु लागली आहे. वरसंशोधन सुरूच आहे पण आता समस्या अशी आहे की पस्तीशीतील बहुतेक मुले डायव्होर्स झालेली, काहीतरी प्रॉब्लेम असणारी किंवा काही वाईट व्यसने असलेली आहेत.


आता अटी बऱ्याच शिथील झाल्या आहेत. 


आता  कोणताही मुलगा चालेल बी.ई. ऐवजी एमसीए किंवा एमसीएम असला तरी चालेल. 


त्याचा पगार कमी असला तरी हरकत नाही.,


बट...स्टील देअर ईज नो लक !


आता चिमणीच्या आईवडिलांनी ज्योतिषांचे ऊंबरठे झिजवायला सुरवात केली आहे. भरपूर पैसे खर्च करून सगळ्या प्रख्यात ज्योतिषांना चिमणीची पत्रिका दाखवुन झाली आहे. प्रत्येक ज्योतिष्यांनी सांगितलेले उपाय शांती व खडे वापरून झाले आहेत.


बट.... स्टिल देअर इज नो लक


चिमणीने स्वतःचे लग्न स्वतः ठरवावे म्हणुनही स्वातंत्र्य देऊन झाले पण लव्ह मॅरेज करण्याचे धाडस चिमणीत नाही. अजुनही चिमणीसाठी मुले पहाणे चालुच आहे.


चिमणी आता ४० वर्षांची झाली आहे.तिच्याजवळ स्वतःचे सुंदर घर, गाडी व भरपूर बॅन्क बॅलन्स आहे. पण आयुष्य नासलय. काळजी करणारे कोणीही मायेचे माणूस जवळ नाही. 


वैराण झालय आयुष्य.


आता आई वडील पण वयोमाना नुसार थकलेत.


( मुलीच्या संसारात सासू सासरे नको म्हणणार्‍या आईला सूनच सांभाळत आहे. ) 


चिमणी एकटी पडलीय. 


कोण चुकले...

चिमणी ?

चिमणीचे वडील ?

चिमणीची आई ?


अपेक्षा व अटींचा हा खेळ सद्धया अनेक चिमण्यांच्या आयुष्यात चालू आहे. विशेषतः उच्चशिक्षीत कुटुंबामधे अशा चिमण्यांची संख्या वाढत चालली आहे


ज्यांना फक्त मुलीच आहेत त्यांनी सुद्धा हे लक्षात ठेवावे की आपण मुलींना आयुष्यभर पुरणार नाही आपल्यानंतर तिला कोणाचाही आधार असणार नाही त्यामुळे योग्य वयात लग्न होणे आवश्यक आहे.


मी.... चा स्वाहा....म्हणजे 🌹स्वामी🌹

 मी.... चा स्वाहा....म्हणजे    🌹स्वामी🌹




➿➿➿➿➿➿➿


एक व्यक्ती नेहमी 'श्री स्वामी समर्थ' नामाचा जप करीत असे. हळूहळू तो फार म्हातारा झालेला त्यामुळे तो एका खोलीत पडून असायचा. जेव्हा कधी त्यास शौच, स्नानासाठी जावे लागे तेव्हा तो आपल्या मुलाला मदतीसाठी आवाज देत असे आणि मुलगा त्यास घेऊन जात असे.

हळूहळू काही दिवसानंतर मुलाला आवाज देऊन ही मुलगा येत नसे जर आला तर फार उशीरा. त्यामुळे कधी कधी अंथरुन घाण होई, त्यावरच दिवस घालवावा लागत असे. आणि आता जास्त म्हातारपण आल्यामुळे फार कमी दिसू लागले होते. 

एके दिवशी सकाळी असाच तो आवाज देत असताना पटकन मुलगा आला आणि आपल्या कोमल स्पर्शाने त्यांना शौच-स्नानाला घेऊन गेला. नंतर अंथरूणावर आणून झोपवले. असा आता त्या मुलाचा रोजचा दिनक्रम चालू झाला होता. मग म्हाताऱ्यास संशय येतो की, आधी जेव्हा मी अनेकवेळा आवाज द्यायचो तेव्हा मुलगा येत नव्हता. पण आता एका अावाजात मुलगा कसा येतो.? आणि मला शौच-स्नानास घेऊन जातो. म्हणून एकदा तो म्हातारा त्या मुलाचा हात पकडतो आणि विचारतो की,  "खरे सांग तु कोण आहेस ? कारण माझा मुलगा तर असा एवढा नम्र विनयी नाही." तेव्हा खोलीत एकदम प्रकाश प्रकट झाला त्या मुलाच्या रूपातील श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपले रुप दाखवले. तेंव्हा ती म्हातारी व्यक्ती रडत म्हणाली, "हे स्वामीराया, तुम्ही स्वतः माझ्या या कार्यासाठी रोज येत होता.... स्वामीराया तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर मला यातून मुक्ती द्या.!"

तेव्हा स्वामी महाराज म्हणतात की, "तू जे भोगत आहे ते तुझे प्रारब्ध आहे. तू माझा खरा भक्त आहेस. नित्य माझे नाम जपत असतो, म्हणून तुझ्या भक्तीच्या प्रेमापोटी तुझे प्रारब्ध मी स्वतः भोगून संपवत आहे." 

स्वामीराया स्वतः म्हणतात, "माझी कृपा सर्वोपरि आहे त्यामुळे तुझे प्रारब्ध संपवता येते. नाहीतर प्रारब्ध भोगण्यासाठी परत जन्माला यावे लागेल. हाच कर्माचा नियम आहे. म्हणून मी स्वतः तुझे प्रारब्ध संपविण्याचा प्रयत्न करत आहे व जन्म-मरणातून तुला मुक्ती द्यायची आहे."

स्वामी महाराज म्हणतात, "प्रारब्ध तीन प्रकारचे आहेत...

१)मंद

२)तीव्र

३)तीव्रतम


* 'मंद प्रारब्ध' माझे नाम जपल्याने संपवता येते.

* 'तीव्र प्रारब्ध' हे खऱ्या संताच्या सान्निध्यात राहून श्रद्धा

आणि विश्वासाने माझे नामाचा जप करुन संपवता येते.

* 'तीव्रतम प्रारब्ध' मात्र भोगावेच लागते.


पण जो नित्य श्रद्धा आणि विश्वासाने माझे नाम सतत जपत असतो त्याच्या प्रारब्धात मी स्वतः बरोबर राहून त्याचे प्रारब्ध मी संपवतो, त्याला याचा त्रास होऊ देत नाही. प्रारब्ध आधी रचले काय नंतर रचले काय ? मी कशाला चिंता करु, फक्त 'श्री स्वामी समर्थ' नाम जपत राहायचे.....


🙏।। अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू अवधूत चिंतन भक्त वत्सल्य भक्ताभिमानी श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय ।।🙏

fly