मंगलवार, 18 अप्रैल 2023

✨🌺✨ धारासांज✨🌺✨

 ✨🌺✨ धारासांज✨🌺✨ 

प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच पर्याय ठेवले आहेत, एक तर देऊन जा, नाही तर सोडून जा. कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करुन ठेवलेली नाही.

नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं, मनापासून जे सांभाळलं जातं ते खरं नातं असतं. जवळीक दाखवणारा हा जवळचांच असतो असं नाही, हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला असतो...

चांगल्या व वाईट अनुभवाची शाळा म्हणजे आयुष्य, जिथं प्रत्येक अनुभव एक नवीन शिकवण देऊन जातो..!


कधी हसावं कधी रडावं, कधी बोलावं कधी शांत रहावं, कधी थांबावं कधी चालावं, कधी सोपं कधी कठीण, कधी आशा कधी निराशा, कधी स्वप्न कधी आठवणी, कधी नवीन कधी जूने, कधी विश्वास कधी अविश्वास, कधी विचार कधी कुविचार, माणूस एक चालती फिरती मशीन, कधी प्रेम कधी शिक्षा आयुष्यच एक परीक्षा...

माणसाचा आदर्श मित्र म्हणजे प्रामाणिक कर्तव्य आहे जे कधीच धोका देत नाही आणि धैर्य हे असे कडवट रोपटे आहे ज्याला नेहमी गोड फळे येतात... समोरच्यामध्ये वाईटपणा दाखवणे सामान्य माणसाची ओळख असते आणि वाईटपणातचं चांगले शोधणे हे मात्र खास माणसाची ओळख असते...!!

 प्रत्येक फुलाचं भाग्य नसतं देवाच्या चरणी अर्पण व्हायचं. म्हणून इतर फुलं उमलायचं सोडत नाहीत. उपेक्षित राहिलं म्हणून रानावनातली डोंगरदऱ्यातली फुलं जगण्याची जिद्द कधीही सोडत नाही..! माणसानं ही असंच जगावं.

जे राहून गेलं, ते राहणारच होतं. कारण, काय करायचं? हे ठरवणारा मी नव्हतो. आजही जे करावंसं वाटत आहे, ते तरी हातून कुठं होतंय..? म्हणूनच, 'जो तुझे मंजूर, वो हमे मंजूर' म्हणत वैचारिक पातळीवरच शांत आहे. मानसिक पातळीवर 'नवी लाकडं' रचली जात आहेत.

 

 

   ओळख होण्याआधी, सगळेच अनोळखी असतात. मनं एकदा जुळली की, सहज आपले होतात. यालाच आपले जिवलग म्हणतात...! कमावलेली नाती आणि जिंकलेले मन ज्याला सांभाळता येते, तो आयुष्यात कधीच हारत नाही.!!

 

"कात्रीची" धार गेली तर कापड एक वेळ कापलं जात नाही. पण "खात्रीची" धार गेली की "नातं " मात्र कापलं जातं..!

सुख क्षणभर गोष्टीमध्ये लपलेलं असतं फक्त ते मनभर जगता आलं पाहिजे...!

अंधारात सोबत असणारा काजवा उजेडात सोबत असणाऱ्या सूर्यापेक्षा जास्त मोलाचा असतो...! 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly