शुक्रवार, 18 अगस्त 2023

पंचकच्छ

कच्छ , पंचकच्छ

 गृहस्थासाठी कोणतेही धार्मिक कृत्य करताना कच्छ म्हणजे काष्ठा अनिवार्य आहे ।


सर्वसाधारण आपण जे धोतर नेसतो ते जर गाठ मारून नसलेलं असेल तर ते त्रिकच्छ होते ।

म्हणजे तीन वेळा खोचलेले ।,, नवखे धोतर नसणारे असे धोतर नेसतात ।


उजवीकडील डावीकडे आणि डावीकडील उजवीकडे शेडे खोचून जे नेसले जाते त्याला पंचकच्छ म्हणतात,, कारण ते पाच वेळा खोचून नेसले जाते ।। अभ्यस्त लोकं या प्रकारातील धोतर नेसतात ।


कुक्षिद्वये तथा पृष्ठे नाभौ द्वौ परिकीर्तितौ ।

पञ्चकच्छास्तु ते प्रोक्ताः सर्वकर्मसु शोभनाः ।।

आचारेन्दु ।।


उपरोक्त दोन्ही प्रकारातील नेसण्यात काष्ठा असतो ।


पंचकच्छ हे उत्तम आणि गाठ मारून नसलेले त्रिकच्छ हे मध्यम ।


पण दोन्ही ग्राह्य आहेत ।


अजून एक पद्धत आहे ,, दुटांगी धोतर,, लफ्फेदार बटरफ्लाय,

त्याला तिर्यक्कच्छ म्हणतात,, हे अग्राह्य असते ।

किंवा अजून एक "शिवलेले रेडिमेड तयार" मिळते


ते फॅन्सी ड्रेस साठी ठीक आहे ,, पण धार्मिक कृत्यात अग्राह्य ।


किंवा काही जण नुसती लुंगी नेसतात,, गोल,, त्याला विकच्छ म्हणतात,, हे प्रवासात अथवा नुसतंच काही काम नसताना, झोपताना चालेल ।

पण धर्मीम कृत्यात अग्राह्य ,, ।


पाठशाळेत शिकणाऱ्या ब्रह्मचाऱ्याला पंचकच्छ नेसण्याचे बंधन नाही,, पण त्याने कौपिन ,, म्हणजे लंगोटी धारण केली पाहिजे,, । 


लंगोट नव्हे ,, 


लंगोटी,, ,,, लंगोटी म्हणजे नुसतीच कापडाची लांब पट्टी असते ,, जी कटिसूत्रात अडकवली जाते ।


लंगोट म्हणजे शिवलेला असतो ।


सोवळ्याच्या संकल्पनेत शिवलेलं वस्त्र चालत नाही , कारण त्याची अखंडता नाहीशी झालेली असते ।


काष्ठा न लावता केलेलं कर्म निष्फळ ठरतं ,, 


काष्ठा न लावता जे काही जप, पूजा, दान, हवन इत्यादी केलं जातं त्याचं सर्व पुण्य पाताळात जातं ,,


छिद्र असलेल्या पिंपात कितीही घागरी ओतल्या तरी त्याचा उपयोग नसतो । तसे आहे हे ।


एकदा एकाने विचारलं , " कि मग मी काष्ठा न लावता एवढा जप केला तो व्यर्थ गेला ?" 


त्यावर मी म्हणालो , "नाही, व्यर्थ नाही गेला ,, त्या जपाचं फलस्वरूप म्हणूनच तुला आज हे कळलं कि काष्ठा लावूनच जप करावा ।" 


जेव्हा बलि महाराजांना पाताळात जाण्याची आज्ञा झाली तेव्हा त्यांनी विष्णुंना विचारलं कि आमच्या भोजनाची काय व्यवस्था,, आम्हाला ऊर्जा कशी मिळेल ?

त्यावर विष्णु म्हणाले , पृथ्वीवर जे काही अशास्त्रीय पद्धतीने धर्मकर्म होईल ती ऊर्जा तुला प्राप्त होईल, जे कोणी अमंत्रक भोजन करतील ते भोजन तुला प्राप्त होईल ।


श्रीभगवानुवाच ।


दानान्यविधी दत्तानि श्राद्धान्यश्रोत्रियाणि च ।

हुतान्यश्रद्धया यानि तानि दास्यन्ति ते फलम् ।।


अदक्षिणास्तथा यज्ञाः क्रियाश्चाविधिना कृताः ।

फलानि तव दास्यन्ति अधीतान्यव्रतानि च ।।


उदकेन विना पूजा विना दर्भेण या क्रिया ।

आज्येन च विना होमं फलं दास्यन्ति ते बले ।।


श्री वामन पुराण , अध्याय ३१ , श्लोक ७८, ७९, ८० ।

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly