बुधवार, 5 अप्रैल 2023

"मृत्यू" म्हणजे काय ?

 मृत्यू का येतो ,, ?

                    


       जे उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपि दिसे.

                       संत ज्ञानेश्वर


या विश्वाचे काही नियम आहेत, जे सर्व विश्वाला पाळावे लागतात. अशा  नियमां मधील हा एक नियम आहे. या विश्वात ज्या ज्या गोष्टी निर्माण झाल्या,  होत आहेत व होतील त्या नाश पावल्या, नाश पावत आहेत व नाश पावतील. मानवी देह  निर्माण होतो म्हणून त्याला शेवटही आहे. ज्याला आरंभ आहे त्याला शेवट आहे.


                   मृत्यू कधी येतो ?


मृत्यू कधीही लवकर येत नाही किंवा उशिराही येत नाही. मृत्यू नेहमीच, ज्यावेळी यायला पाहिजे त्यावेळीच येतो.


या जन्मीचे प्रारब्ध संपले की मृत्यू येतो. जे कर्म पक्व होऊन फळ देण्यास  सिद्ध झालेले असते, त्याला 'प्रारब्ध' असे म्हणतात. 'प्रारब्ध' या शब्दाला  एक नकारार्थी किंवा असहायतेची छटा आहे. पण तसे असण्याची काही गरज नाही.  सद्गुरुंच्या कृपेचा आधार घेत विवेकाचा वापर करून, श्रेयस निवड करत आपले  प्रारब्ध आपल्याला बदलता येते. हीच तर मानवी जन्माची सर्वात मोठी उपलब्धी  आहे. मानवा व्यतिरिक्त इतर जीवांना मात्र ही उपलब्धी मिळालेली नाही.


हिंदु ज्ञान परंपरेतील एक मूलभूत सिद्धांत आहे - कर्म सिद्धांत. कर्म  म्हणजे कृती. ही कृती स्थूल पातळी वरील कार्य, मानसिक पातळी वरील भावना किंवा  वैचारिक पातळीवरील तरंग या स्वरूपात असेल. त्यालाच कर्म असे म्हटले जाते.  प्रत्येक कर्माचे त्याच्या प्राप्त स्वरूपात फळ मिळतेच.


काही  कर्माचे फळ लगेच मिळते त्याला "क्रियमाण कर्म" म्हणतात. काही कर्माचे फळ  काही काळा नंतर मिळते, त्याला "संचित कर्म" म्हणतात. या दुसऱ्या प्रकारच्या  संचित कर्मातील जे कर्मफळ भोगाच्या दृष्टीने देण्यायोग्य झालेले असते,  त्याला प्रारब्ध म्हणतात. प्रारब्ध म्हणजे कोणी कोणावर लादलेले ओझे नसते,  तर ते या जन्मात किंवा या पूर्वीच्या जन्मात स्थूल, भावनिक, वैचारिक  पातळीवर आपण जे कर्म केले त्या कृतीचा परिणाम असतो. ते या जन्मात आपल्याला  अनुभवायचे असते. त्यालाच 'प्रारब्ध भोग' असेही म्हणतात.


        माझे कर्म कुठे साठवलेले असते ?


प्रत्येकाच्या कर्माचा हिशोब त्यांच्या चित्तावर लिहिलेला असतो. चित्त  म्हणजे अंतर्मन. याच अंतर्मनामध्ये सर्व कर्मे साठवली जातात. ज्याला आपण  आठवणी किंवा संस्कार म्हणतो.

ज्यांची ध्यानात गती आहे ते मात्र  त्यांच्या चित्तावरील आठवणी किंवा संस्कार पाहून, त्यांच्या आयुष्यात जे  काही घडत आहे, त्याविषयीची कर्मगती जाणू शकतात.


               प्रारब्ध कोण ठरवतो ?


स्वतःचे प्रारब्ध प्रत्येक जीव स्वतः ठरवतो. पुढील जन्म घेण्या अगोदर  प्रत्येक जीव कुठल्या कर्माची फळे पुढील जन्मात भोगायची ते स्वतः ठरवतो.  त्याप्रमाणे तो जीव त्याच्या कर्मास साजेसे योग्य ते आई-वडील, इतर  नातेवाईक, मित्र मंडळी व इतरांची निवड करतो. यालाच 'जीवन नियोजन' असेही  म्हणतात.


प्रारब्धा कडे "घ्यायचे अनुभव" किंवा "शिकायचे धडे" या  दृष्टिकोनातूनही  पाहता येते. प्रारब्धा विषयीच्या या अर्थाने 'प्रारब्ध हे  भोगूनच संपवावे लागते, असे समजते. यामध्ये असहायतेची भावना नसते, तर  आत्म्याच्या उत्क्रांती साठीचा हा अनुभव असतो, अशा अनुभवांनाच 'तीव्र  प्रारब्ध' असेही म्हणतात. परंतु प्रारब्धा मध्येही बदल करणे शक्य असते. प्रारब्धा मधील बदलाच्या शक्यते मुळेच आध्यात्मिक साधनेलाही महत्व प्राप्त होते.


            मृत्यूची भिती का वाटते ?


१. जर जन्माला आल्या पासून मृत्यूचा अनुभवच नाही, तर त्याची भिती  वाटण्याचे कारण  म्हणजे पूर्वजन्मांमध्ये मनुष्य कितीतरी वेळा मृत्यू पावला  आहे आणि त्यामुळेच मृत्यूचे भय त्याच्याठायी स्मृतीमध्ये साठले आहे. मरण  येताना शेवटी जी स्मृती राहते, तीच गती मृत्यू पावलेल्याच्या ठायी प्राप्त  होते. मृत जीवाने जीवीत असताना शरीरावर अत्यंत प्रेम केलेले असते. त्यामुळे  ते शरीर सोडताना त्याला जे दुःख होते, ती स्मृती त्याच्याबरोबर पुढील  जन्मात येते आणि त्यामुळेच त्या जीवाला मृत्यूची भिती वाटते. याचाच  अर्थ जीवाच्या चित्तावर पूर्व जन्मातील मृत्यूच्या आठवणी साठवलेल्या असतात  आणि त्या आठवणीं मुळेच त्याला मृत्यूची भिती वाटत असते.


२. या जन्मात जीवास मृत्यू कधी व कसा येणार ? हे माहीत नसते. या अनिश्चितते मुळेही त्यास मृत्यूची भिती वाटते.

३. मृत्यूची भिती ही बऱ्याचदा मृत्यूच्या समयी होणाऱ्या वेदनांचे भय, असहायता, दुसऱ्यावरच्या अवलंबनत्वाची भिती, आप्तस्वकीयांच्या वियोगाचे  दुःख, जीवनाचा मोह वगैरे अशा अनेक कारणां मुळे निर्माण झालेली असते.


                "मृत्यू" म्हणजे काय ?  


 हे जर आपण नीट समजून घेतले तर मृत्यू विषयीची अनायास वाटणारी भीति निर्माण होणार नाही.

★ "मृत्यू" म्हणजे मृत होणे नसून पुढील जीवन प्राप्त होणे, असे आहे आणि ही जन्म जन्मांतरीची प्रक्रिया आहे.

★ जीवन व मृत्यू या भिन्न अवस्था नसून एका पाठोपाठ येणाऱ्या जीवन चक्राच्या  जीवन गती विषयक क्रिया आहेत. या जीवन क्रिया कर्माच्या शून्य अवस्थे पर्यंत अविरत चालू राहतात. जीवन - मरणाच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी सद्गुरु ची आवश्यकता आहे. 


गुरु भक्त शिष्या कडून वेगवेगळ्या सेवा व दान रूपाने पुण्य कर्म करून घेतात  मंत्र मूलम् गुरुवाक्य  समजून जो भक्त शिष्य सदैव गुरूच्या हाकेला सेवा व दान यासाठी तत्पर असतो त्याला गुरु दानाच्या काही पटीत परत तर देतातच. परंतु त्यांच्या संसार रथाची दोरी आपल्या हातात घेतात त्याहीपेक्षा अशा भक्त  शिष्य मोक्षमूलम् गुरुकृपा  यास पात्र होतो.


तात्पर्य -: गुरु कार्यात मिळणारी सेवा ही पूर्व प्रारब्ध शिवाय मिळत नाही मिळणारी गुरु सेवा ही ईश्वरी कार्य समजून काम करीत राहिल्यास जन्म मृत्युच्या चक्रातून मुक्ती  मिळवून देणारच असते, तोच भक्त शिष्य मोक्ष प्राप्त करू शकतो. 

*********


लेख अप्रतिम आहे . 

जरूर वाचा आणिआपल्या मनःचतुष्टि वरील अनावश्यक बोजा फेकून द्या.


🚩🚩🙏राम कृष्ण हरी 🙏🚩🚩

उच्चशिक्षित चिमणीच रखडलेले लग्न ...

 


उच्चशिक्षित चिमणीच रखडलेले लग्न ...


*शहरात रहाणार्‍या एका टि रोजीपिकल, मध्यम वर्गीय,

 कुटुंबांत जन्मलेली  चिमणी लहानपणापासुनच अभ्यासात खूप हुषार. घरात आई वडील दोघेही नोकरी करणारे व एक मोठा भाऊ. भाऊ बी.कॉम. झाला व एका को ऑपरेटीव्ह बँकेत नोकरीला लागला.*


चिमणी हुशार म्हणुन इंजिनीयरींगला गेली. बी. ई. कॉम्प्युटर झाली. कॅम्पसमधेच तिला चांगले ७ लाखांचे पॅकेज मिळाले व वयाच्या बाविसाव्या वर्षी तिचा जॉब सुरु झाला तिचे आई वडील व भाऊ या तिघांच्या पगाराची बेरीज सुद्धा एवढी येत नव्हती त्यामुळे साहजिकच अरमान सातवे आसमान तक पहुंच गये थे. आता तिच्यासाठी वर संशोधन सुरू झाले.


मुलगा न्यूक्लियर फॅमिलीतला, वेल सेटल्ड  च हवा, इंजिनीयर च हवा, आय.टी. किंवा सॉफ्टवेअर मधला च हवा या च अटींवर ( व मुलाचे आईवडील सोबत नको ही सुप्त अट ) मुले बघायला सुरवात झाली.


सुरूवातीलाच एक स्थळ आले ते त्यांच्या ‘च’ च्या अटींमधे फिट्ट बसणारे होते. मुलगा एकुलता एक, आयटी इंजिनीयर, १० लाखांचे पॅकेज, देखणा, रुबाबदार व वेलसेटल्ड होता. आई वडील गावी रहाणारे भरपूर शेतीवाडी म्हणजे त्याची पण अडचण नव्हती. 


पण.....


मुलाचे वय होते २८ तर मुलीचे वय २३. वयामधे ५ वर्षांचे अंतर. चिमणीच्या आईला हे वयातील अंतर जास्त वाटले. तिच्या मते मुलाच्या व मुलीच्या वयामधे " २ ते ३ वर्षांपेक्षा जास्त अंतर नको" तसेच आत्ता तर सुरूवात केली आहे मिळतील याहून चांगले असा विचार करून ‘क्षमस्व’ म्हणुन मुलाला नकार कळवण्यात आला.


सुरुवातीलाच एवढे चांगले स्थळ चालून आल्याने व भरपूर चॉइस समोर दिसत असल्यामुळे अपेक्षा आणखीन वाढल्या. मुलगी बी.ई. आहे एवढा पगार आहे तर मुलगा वेल एस्टॅब्लिश व तिच्यापेक्षा जास्त शिकलेला हवा. नवऱ्याचे शिक्षण व पगार हे बायकोपेक्षा जास्त असले पाहिजे असे चिमणीच्या आईला वाटू लागले त्यामुळे मुलगा एम.ई., एम. टेक. एम.एस. किंवा पी. एचडी. झालेलाच असला पाहिजे अशी नवीन अट लागू झाली. आता या कॅटेगरीतली बहुसंख्य मुले वयाने जास्त, चष्मा लावणारी, टक्कल पडु लागलेली अशी होती. जी सुयोग्य मुलं या कॅटेगरीत बसत होती त्यांच्याही काही अपेक्षा होत्या व त्यांना याहून उत्तम स्थळे चालून येत असल्यामुळे ते चिमणीला नापसंत करत. त्यामुळे जी मुले चिमणीला पसंत पडत त्यांना चिमणी पसंत पडत नसे, आणि ज्या मुलांना चिमणी पसंत पडत असे ती मुले चिमणीला पसंत पडत नसत असा खेळ सुरू झाला.


बघता बघता या खेळात चार पाच वर्षे गेली चिमणीचे वय वाढत चालले. त्यामुळे थोडे कॉंप्रोमाईज करुन ‘ बी. ई. ला बी. ई. चालेल’ अशी अट शिथील करण्यात आली. पण पाच सहा वर्षांच्या जॉबमधे चिमणीचे पॅकेज चांगलेच वाढले होते. सांगुन येणार्‍या मुलांचे पॅकेज त्यापेक्षा कमी होते. चिमणीच्या आईच्या हो हो आईच्याच अटीत ती मुले बसत नव्हती.


बिझनेस करणारी व चिमणीपेक्षा जास्त कमावणारी मुले सांगुन आली. पण बिझनेस करत असल्याने जॉइन्ट फॅमिली होती. मुलीच्या संसारात आईवडिलांची व बाकीच्यांची अडचण नको हा सुप्त हेतू मनात असल्याने नोकरीवालाच पाहिजे हे कारण सांगून नकार कळवण्यात आला.


चिमणीचे वय २९ झाले आणि एक मोठ्ठा टर्निंग पॉइंट आला. चिमणीच्या भावाचे लग्न झाले. चिमणीलाही कंपनीने सहा महिने प्रोजेक्टसाठी अमेरिकेला पाठवले. परत आल्यावर नाही म्हटल तरी मिळत असलेला पगार, परदेशवारी मुळे आलेला मीपणा व नणंद भावजयीच्या नात्यातील पूर्वापार चालत आलेले प्रेम यामुळे घरात रोज कटकटी सुरू झाल्या त्यामुळे ती काही वर्षे पुन्हा परदेशी गेली.


आणखीन काही वर्षे गेली....


आता चिमणी तेहतीस वर्षांची झाली असून प्रौढ दिसु लागली आहे. वरसंशोधन सुरूच आहे पण आता समस्या अशी आहे की पस्तीशीतील बहुतेक मुले डायव्होर्स झालेली, काहीतरी प्रॉब्लेम असणारी किंवा काही वाईट व्यसने असलेली आहेत.


आता अटी बऱ्याच शिथील झाल्या आहेत. 


आता  कोणताही मुलगा चालेल बी.ई. ऐवजी एमसीए किंवा एमसीएम असला तरी चालेल. 


त्याचा पगार कमी असला तरी हरकत नाही.,


बट...स्टील देअर ईज नो लक !


आता चिमणीच्या आईवडिलांनी ज्योतिषांचे ऊंबरठे झिजवायला सुरवात केली आहे. भरपूर पैसे खर्च करून सगळ्या प्रख्यात ज्योतिषांना चिमणीची पत्रिका दाखवुन झाली आहे. प्रत्येक ज्योतिष्यांनी सांगितलेले उपाय शांती व खडे वापरून झाले आहेत.


बट.... स्टिल देअर इज नो लक


चिमणीने स्वतःचे लग्न स्वतः ठरवावे म्हणुनही स्वातंत्र्य देऊन झाले पण लव्ह मॅरेज करण्याचे धाडस चिमणीत नाही. अजुनही चिमणीसाठी मुले पहाणे चालुच आहे.


चिमणी आता ४० वर्षांची झाली आहे.तिच्याजवळ स्वतःचे सुंदर घर, गाडी व भरपूर बॅन्क बॅलन्स आहे. पण आयुष्य नासलय. काळजी करणारे कोणीही मायेचे माणूस जवळ नाही. 


वैराण झालय आयुष्य.


आता आई वडील पण वयोमाना नुसार थकलेत.


( मुलीच्या संसारात सासू सासरे नको म्हणणार्‍या आईला सूनच सांभाळत आहे. ) 


चिमणी एकटी पडलीय. 


कोण चुकले...

चिमणी ?

चिमणीचे वडील ?

चिमणीची आई ?


अपेक्षा व अटींचा हा खेळ सद्धया अनेक चिमण्यांच्या आयुष्यात चालू आहे. विशेषतः उच्चशिक्षीत कुटुंबामधे अशा चिमण्यांची संख्या वाढत चालली आहे


ज्यांना फक्त मुलीच आहेत त्यांनी सुद्धा हे लक्षात ठेवावे की आपण मुलींना आयुष्यभर पुरणार नाही आपल्यानंतर तिला कोणाचाही आधार असणार नाही त्यामुळे योग्य वयात लग्न होणे आवश्यक आहे.


fly