बुधवार, 28 जनवरी 2015

च्यवनप्राशचे फायदे.


जीवन जगण्यात माणसाला रस असतो, तोपर्यंतच त्याला जीवनरस मिळत राहतो. जीवनरस संपला तर झाडेही काष्ठवत होतात. तसेच जीवनरस संपला तर शरीराचे लाकूड व्हायला वेळ लागत नाही. मनुष्य किती वर्षे जगला यापेक्षा तो रसयुक्‍त काळ किती जगला, हे महत्त्वाचे असते.

""मला यात स्वारस्य नाही, मला त्यात स्वारस्य नाही, मला गाण्यात रस नाही, मला सर्कसमध्ये रस नाही, मला जीवन जगण्यातच रस उरलेला नाही,'' अशा तऱ्हेची विधाने ऐकली, की हसावे की रडावे तेच कळत नाही. एवढे काय झाले, की माणसे जगायला घाबरतात व जीवनापासून दूर पळून जातात. जोपर्यंत जीवन जगण्यात माणसाला रस असतो, तोपर्यंतच त्याला जीवनरस मिळत राहतो. जीवनरस संपला तर झाडेही काष्ठवत होतात. तसेच जीवनरस संपला, तर शरीराचे लाकूड व्हायला वेळ लागत नाही. पाण्याला जीवन का म्हणतात, कारण अगदी सहज उपलब्ध असलेला व जीवनाला प्रारंभ करून देणारा जीवनरस म्हणजे पाणी.

शरीरातील ओटीपोटाच्या ठिकाणी असलेल्या स्वाधिष्ठान चक्राच्या ठिकाणी जलतत्त्वाचा वास असतो. जलतत्त्व म्हणजे केवळ पाणी नव्हे. जे काही प्रवाही असेल त्याला जलतत्त्व म्हणायला हरकत नाही. या जीवनमहासागरात पोहण्यासाठी, तरून जाण्यासाठी जो मदत करतो, जो काळामध्ये माणसाला प्रवास करण्यासाठी मदत करतो तो असतो जीवनरस. जे प्रवाही असते त्याचा काही आकार असतो का? पाण्याला रंग, रूप, आकार नसतो. जे काही पाण्यात मिसळेल त्याचा रंग पाण्याला येतो. शरीरातील पाण्याचे तसे नसते. उलट त्यात शरीरास रंग-रूप देण्याची ताकद असते. एखाद्याला "पाणी दाखवून देणे' वा "पाणी पाजणे' असे उगाच म्हणत नाहीत. शरीरातील प्रवाही द्रव निघून गेले, तर मात्र कुठलाच आकार उरत नाही व असे झाले तर सगळ्यांच्याच तोंडचे पाणी पळते. चेहऱ्याचा रंग फिका पडतो.

"अयन' म्हणजे काळ. तेव्हा काळाबरोबर झुंज देण्यासाठी शरीरात जीवनरस वाढविणारे ते "रसायन'. आयुर्वेदात या रसायनाचे माहात्म्य सांगितलेले आहे. कायाकल्प करण्यासाठी आवश्‍यक असलेली शरीरशुद्धी पंचकर्माद्वारे झाली तरी सर्व पेशींना, धातूंना व इंद्रियांना पुष्टी देऊन त्यांना तारुण्य मिळवून देणारी असतात रसायने. विशिष्ट रसायनाचे सेवन केले नाही तर कायाकल्पाचा विधी अर्धवट झाला असेच म्हणावे लागेल. पंचकर्म झाल्यानंतर रसायनसेवन करावे असे सर्वसामान्यतः म्हटले जाते. रसायनसेवन करून अमरत्व प्राप्त व्हावे, म्हणजेच काळाबरोबर झुंज देत पुढे जाता यावे, यासाठी रसायन दिले जाते. शरीराचे पुनर्जीवन करण्यासाठी रसायनसेवन मुख्य असते व ते रसायन पचण्यासाठी शरीरशुद्धी करणे आवश्‍यक असते. यासाठी पंचकर्म केले जाते. शरीराची शुद्धी झालेली नसली, तर अमृतासमान रसायनांचे केलेले सेवन वाया जाऊ शकते. अर्थात या पंचकर्मात आहारविहारावर नियंत्रण; शरीरासाठी स्नेहन (मसाज वगैरे), आंतर्स्नेहन (तूप पिणे), स्वेदन, विरेचन, वमन, बस्ती वगैरे करणे; मनासाठी व शरीरातील हॉर्मोनल संस्थेसाठी व अग्नी संतुलित होण्यासाठी योगासने व प्राणायाम आणि जिवाची शुद्धी होण्यासाठी स्वास्थ्यसंगीत व ध्यान करणे या सर्व गोष्टी मोडतात. असे पंचकर्म झाल्यावर रसायनसेवन करण्यात येते.

अगदी सोप्यात सोपे रसायन म्हणून सुंठीचा व हिरड्याचा प्रयोग सांगितलेला आहे. अगदी सोपे व सर्वांना उपलब्ध असणारे रसायन आहे च्यवनप्राश. च्यवनप्राशचे आयुर्वेदातील नाव आहे च्यवनप्राशावलेह. च्यवनप्राश तयार करण्याची एक विशिष्ट पद्धत आयुर्वेदाच्या ग्रंथात सांगितलेली आहे. त्या पाठाप्रमाणे तयार केलेला अवलेह रसायन म्हणून काम करतो. च्यवनप्राशात सुवर्णवर्ख, चांदीचा वर्ख वगैरे द्रव्ये मिसळली, तर दुधात साखर असा योग होऊ शकतो.

परंतु मुळात अवलेहच योग्य पद्धतीने न बनवता काही द्रव्ये एकत्र करून नुसते मिश्रण बनवले व त्याची सुवर्णयुक्‍त, केशरयुक्‍त अशी जाहिरात केली, तर त्याचा रसायनासारखा उपयोग होणार नाही. जी द्रव्ये शरीरात गेल्यावर वयःस्थापन करतात, म्हणजे शरीराची झीज कमी करतात, शरीराला म्हातारपणाकडे जाऊ देत नाहीत, ताकद-वीर्य-शौर्य वाढवतात, धी-बुद्धी-मेधा यांची वृद्धी करतात व आयुष्य उत्तम तऱ्हेने जगायला मदत करतात ती रसायने.

खरे तर काळाची दोन परिमाणे समजून घेणे आवश्‍यक असते. एक म्हणजे रस नसलेला काळ व दुसरा रस असलेला काळ. एखादे संगीत, नाटक वा चित्रपट पाहण्यासाठी तीन तास दिले, पण त्यात काही रस वाटला नाही तर तीन तासांचा रसहीन काळ आपल्या वाटेला आला असे म्हणावे लागेल. या तीन तासात संगीत, नाटक वा चित्रपटाचा पूर्ण रसास्वाद घेता आला, तर ह्या तीन तासांच्या काळाला रसयुक्‍त काळ म्हणता येईल. दोन्ही उदाहरणांत आपण तिकिटाचे मूल्य सारखेच मोजलेले असते, आत बसायचा कालावधीही सारखाच असतो, परंतु रसाशिवायचा काळ व रसयुक्‍त काळ यांच्यात जमीन अस्मानाचा फरक असतो व त्यातून मिळालेला फायदाही वेगळा असतो.

सकाळी प्रार्थना करून दिवस सुरू केला, की जीवनात व सर्व गोष्टीत सौंदर्य दिसू लागते. आपल्याला सर्व गोष्टीत रस आहे असे वाटते. ओलेपणा असला तरच वस्तू एकमेकांत मिसळतात. रस निघून गेला, की कण कण सुटे होऊन वाऱ्यावर उडून जातात.

मातीच्या हवेत असणाऱ्या कणांवर जरासा पावसाचा शिडकावा झाला, तर मातीचे कण व पाणी एकत्र होऊन खाली येऊन जमिनीवर साठतात. त्याचप्रमाणे रसामुळे जीवन बांधले जाते, अस्तित्वात येते. जीवनात मनुष्याला रस आवश्‍यक असतो. जीवनात रस वाटण्यासाठी मुळात तशी इच्छा असणे व तशी दृष्टी असणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक असते.
भौतिक पातळीवर शारीरिक संपन्नतेसाठी रसायनांचे सेवन कायम करावे असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे मनाला चांगल्या मार्गाने व व्यवस्थित जीवनाचा आनंद घेता येण्यासाठी जीवन अभिरुचीसंपन्न असावे असे सांगितले आहे. "मना सज्जना भक्‍तिपंथेचि जावे' असे समर्थांनी म्हटले आहे. जीवनाला मन विटणार नाही अशी इच्छा असणाऱ्यांनी सज्जन असणे आवश्‍यक असते. सज्जन असणे म्हणजे जनसमुदायाशी एकरूप होऊन राहणे. यानंतर समर्थ म्हणतात, ""जीवनात भक्‍तिरस असल्याशिवाय जीव व आत्मा यांना रस मिळणार नाही.'' भक्‍तिरसात डुंबल्यावरच परमानंद म्हणता येईल असा आनंद मिळेल व त्याला अमरत्वाची प्राप्ती होईल.

प्रकृतीला अनुसरून, सात्त्विक व योग्य वेळी घेतलेले अन्न हेच एक रसायन असते. सुरवातीस आयुर्वेदाने सांगितलेली रसायने सेवन करून प्रकृती नीट ठेवली की त्यात असलेला जीव व मन यांना आवश्‍यक असलेल्या रसायनाची पूर्ती करण्याची बुद्धी आपसूक होईल.

आयुर्वेदाने अनेक रसायनांचा उल्लेख केलेला आहे. विशेष रसायन म्हणून नाना तऱ्हेचे लेह, कल्प, औषधे सांगितली आहेत, जी घेतल्यावर मनुष्य दीर्घायुषी होईल, नुसताच दीर्घायुषी होईल असे नाही तर जेवढा काळ तो जगेल तेवढ्या काळाची गुणवत्ता वाढेल. जीवनाच्या शेवटच्या मिनिटापर्यंत जीवनाचा व या सृष्टीत असलेल्या सर्व वस्तूंचा रसास्वाद घेता येईल. मनुष्य किती वर्षे जगला यापेक्षा तो रसयुक्‍त काळ किती जगला, त्याने जीवनाचा रसास्वाद कसा घेतला, जीवनाचा आनंद कसा उपभोगला यावरच दीर्घायुष्याची खरी किंमत ठरू शकते.
हिरा नुसताच मोठा असून चालत नाही तर त्यात कुठलाही दोष नसला, त्यात कुठलाही काळा डाग नसला तर त्याची खरी किंमत असते. तसेच कुणी नुसत्या शरीराने आडदांड असला, शंभर वर्षे जगला, पण आयुष्यभर माणूसघाणेपणा केला, विकासात, कलेत वा इतर कशातही रस दाखवला नाही, त्यापासून आनंद मिळवला नाही तर खऱ्या जीवनाचा रस त्याला मिळालाच नाही असे म्हणावे लागले.

आयुर्वेदाने जीवनरसाचे महत्त्व ओळखून रसायनांचा स्वतंत्र अध्याय सांगितलेला आहे. आपणही या रसायनांचे महत्त्व ओळखून नित्यनियमाने ज्याला जे जमेल, परवडेल त्याने रसायनसेवन करणे आवश्‍यक आहे.

उपाय बद्धकोष्ठतेवर, संडास साफ न होणे.

 लहान मुलांची कडक संडास | संडास साफ न होणे

 संडास साफ न होण्याची कारणे पोट होणे लक्षणे लगेच होण्यासाठी उपाय यावर पातळ संडासला गोळ्या एरंडेल तेल उपाययोजना आयुर्वेदिक गरोदरपणात काय करावे घट्ट डॉक्टर स्वागत तोडकर वर घरगुती मूळव्याध कोंब फोटो गुदभागी जखम मुळव्याध औषध उपचार फिशर मराठी शस्त्रक्रिया खर्च औषधे जुलाब उलटी लहान मुलांना हगवण बिघडणे पोटात कळ येणे आव पडणे चिकट काळी बंद थांबवण्यासाठी करताना रक्त मुरडा लागणे सांगा कमी होण्याचे बाळाची हिरवी शी बाळाला होत नसेल तर फुगणे कडक बद्धकोष्ठता खडा बध्दकोष्ठता म्हणजे
 Image result for लहान मुलांची कडक संडास


आजच्या या धकाधकीच्या जीवनात मुख्यत- आढळणारी तक्रार म्हणजे बद्धकोष्ठता आज याविषयी सविस्तर जाणून घेऊ व सोबत होमिओपॅथी औषधांची माहिती पाहू. .......
पचनक्रियेमधील नैसर्गिक चक्रामध्ये पोट साफ होणे याला खूप महत्त्व आहे. पोट साफ न होणे यालाच बद्धकोष्ठता म्हणतात. सकाळी उठल्यानंतर शौचास साफ होणे, हे निरोगी आरोग्याचे लक्षण आहे. अर्थात याचा परिणाम दिवसभराच्या कामावर होत असतो. दिवसभराच्या ताणतणावामध्ये व धावपळीमध्ये उत्साही राहण्यासाठी पोट साफ/मोकळे राहणे महत्त्वाचे असते.

बद्धकोष्ठतेची लक्षणे -



दिवसभर बेचैन राहणे, भूक मंदावणे, मळमळणे, डोके व पोट जड राहणे, गॅसेस होणे, छातीवर दडपण येणे, चिडचिडेपणा ही लक्षणे सर्वसामान्यपणे आढळतात. यामध्ये मलाशयामध्ये मल साठून राहिल्याने त्याच्या स्नायूंची लवचिकता व कार्यक्षमता कमी होते. हा विकार जरी किरकोळ स्वरूपाचा वाटत असला, तरी काही व्यक्तींमध्ये कालांतराने यातून गंभीर समस्या निर्माण होतात. उदा. पोटातील व्रण (अल्सर) मोठ्या आतड्याचा कर्करोग इ.



बध्दकोष्टता (मलावष्टंभ) ही सामान्यपणे आढळणारी अवस्था असून या अवस्थेला वयाचा निर्बंध नाही. अगदी बालवयापासून ते वृध्दांपर्यंत संडासला साफ न होणं, संडास पूर्ण झाल्यासारखी न वाटणं, पोट रिकामं न होणं म्हणजे मलावष्टंभ (Constipation)!

बध्दकोष्ठता लक्षणं


साधारणत: मलावष्टंभ नेमक्या कोणत्या कारणाने होतंय हे सांगणं, निदान करणं सोपं नव्हे. असंख्य तात्पुरती तसंच जीर्ण कारणं यात दडलेली आढळतात. आहार विहारातील बदल, तंतूयुक्त खाद्य आहारात नसणं, फळं, फळ भाज्या, डाळींचा आहारातील अभाव, द्रव पदार्थ कमी प्रमाणात सेवन करणं, अवष्टंभ करणारी पदार्थ अधिक सेवन करणं, ही कारणं तर व्यायाम, हालचाल, चालण्याचा अभाव, मल प्रवृत्तीचा वेग आला असताना दाबून ठेवणं (लहान मुल आणि तरुणांमध्ये हे कारण अधिकतम दिसतं) बसून खाणं, खाऊन बसणं, मानसिक कारणांमध्ये उत्तेजितता, नैराश्य, मनाविरुध्द घडणं, भीती, अति आनंद, अति रडणं, अति हसणं ही कारणं प्रामुख्याने असतात. अनेक प्रकारची औषधं मलावष्टंभ निर्माण करतात.



काही वेळा औषध योग्यवेळी न सेवन केल्याने अवष्टंभ होताना दिसतं. लहान मुलांमध्ये मल प्रवृत्तींच्या सवयी व्यवस्थित न लावल्यामुळे हे लक्षण प्रामुख्याने दिसतं आणि वाढतंही. भीती, कमी आहार, न आवडणारा आहार, संडास या जागे विषयी भीती ही मूळ कारणं होत. मलावष्टंभाचे प्रमाण संपूर्ण विश्वात अधिक असून, दर सात मोठ्या व्यक्तींमध्ये एकाला, तर दर तीन लहान मुलांमागे एका लहान मुलामध्ये मलावष्टंभ आढळतो. इतर देशांमध्ये हे प्रमाण स्रियांमध्ये अधिक तर भारतात पुरुषांमध्ये अधिक दिसन येतं. वृध्द व्यक्तींमध्ये मलावष्टंभ जास्त तर गरोदर स्रियांमध्ये हा जास्त दिसतो.


कारणं आणि प्रतिबंध


आतड्यांची हालचाल कमी होण्याने, जठराग्नी उत्तम नसल्याने, पाचक अग्नी अधिक असताना योग्य आहार न मिळणं, गरोदरपणी आतड्यांची हालचाल कमी होऊन स्थिरत्व येतं. या अवस्थेला काळजीपूर्वक हाताळून अडथळा दूर करणं आवश्यक असतं. वजन कमी असणं आणि जास्त असण्याने मलावष्टंभचा त्रास होतो. भीती, मानसिक व्याधी, अपघात, मानसिक अपघात ही कारणं ही त्या व्यक्तीमध्ये बध्दकोष्ठता तयार करतात. अनेक व्याधीमध्ये आहाराच्या अभावामुळे व्याधी अवस्थेमुळे मलावष्टंभ निर्माण होते. त्यात ताप हा व्याधी सर्वसामान्य आहे. थायरॉइडच्या कमी स्त्रावाच्या अवस्थेत (Hypothyroidsm), मधुमेह कॅल्शिअम अधिक असणं आणि कॅल्शियमयुक्त पदार्थ अधिक खाणं, पोटाचे सर्वच विकार, मूळव्याध, भगंदर, चरिकर्तिका काही मांसगत विकार पक्षाघात, हृदयाचे विकार या रूग्णांमध्ये बध्दकोष्टता आढळते.

मानसिक विकारांवरील औषधं, फिट्स विरोधी औषधं, कॅल्शिअम, वेदनाशामक औषधं, लोहयुक्त औषधं, लोहयुक्त गोळ्या, सूज कमी करणाऱ्या, शरीरातील पाणी कमी करणाऱ्या गोळ्या यामुळे मलावष्टंभ होतं खरं पण या गोळ्या स्वत:हून बंद करू नये. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मुलांमध्ये, तरुणांमध्ये कोरडे अन्न खाण्याचं प्रमाण खूप वाढत आहे. जे बध्दकोष्ठतेचं मूळ कारण आहे. योग्य प्रमाणात दूधाच्या सेवनाचा अभाव. मलावष्टंभाची सुरुवात होतानाच त्यावर उपाय करायला हवेत. ही सुरूवात घरातील मोठ्या व्यक्तींना प्रथम लक्षात येतं. लहान मुलं अनेक वेळा मलप्रवृत्तींना जातात. मोठी व्यक्ती तीनहून अधिकवेळा शौचाला जाणं, आठवड्यातून तीनच वेळा मल प्रवृत्ती होणं, मलाच्या वेळेस खूप त्रास होणं, कुंथणे ही क्रिया आठवड्यातून चारहून अधिक वेळेस होणं, अगदी कडक मल होणं, आयुर्वेद शास्त्रानुसार मलाला दुर्गंध येणं, मल कडक होऊन पाण्यात तळाशी जाणं, ही विशेष लक्षणं सांगितली आहेत.


भारतात मलावष्ट मार्गांची सुरुवात काही सवयींमुळे होते. तर मलावष्टंभाच्या मानसिक परिणामामुळे काही सवयी व्यसनं जडून जाताना सर्रास दिसतात. तंबाखू, विडी, सिगारेट यांचा वापर करुन मल प्रवृत्तीला जाणं. पाण्याचा, मग गरम पाण्याचा, चहा, पाणी सेवन केल्यावर मल प्रवृत्तींचा वेग येणं. पण ‘बेड टी’ ही संकल्पना इंग्रजांची असून त्यांच्या वातावरणात कदाचित उपयुक्त असेल पण भारतात नाही!

गरोदरपणात पोट साफ होण्यासाठी काय करावे

बद्धकोष्ठतेची कारणे -

दैनंदिन जीवनातील काही सवयी, तसेच आहारातील दोष ही प्रमुख कारणे आहेत.

रात्री उशिरा झोपणे व सकाळी उशिरा उठणे, मद्यपान, जेवणाच्या अनियमित वेळा, आहारामध्ये अतितिखट, तेलकट, मसालेदार, मांसाहार या पदार्थांचा जास्त समावेश व पालेभाज्या, फळे यांचा अभाव, पाणी कमी पिणे, नियमित व्यायामाचा अभाव. पहाटे लवकर उठणे व रात्री जागरण न करणे ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. नियमित व्यायामाने सकाळी पोट साफ होण्यास मदत होते, तसेच दिवसभर मन प्रसन्न व आनंदी राहते.


यासाठी रात्री झोपताना कोमट पाणी घेणे व सकाळी उठल्यानंतर गार पाणी १ ग्लास घेणे फायद्याचे ठरते. याने मलावरोध कमी होण्यास मदत होते, तसेच पचनकार्य नीट होण्यासाठी अन्न सावकाश व चावून खावे. तसेच आहारामध्ये बटाटे, रताळे, साबुदाणा, हरभऱ्याची डाळ, चहा, कॉफी यांचा अतिरेक टाळावा. शक्‍यतो ऍल्युमिनिअमच्या भांड्यांमध्ये अन्न शिजविणे टाळावे व भरपूर पाणी प्यावे. आता यासाठी उपयोगी काही होमिओपॅथिक औषधांची माहिती घेऊ.
Image result for लहान मुलांची कडक संडास


पोट साफ होणे लक्षणे

१) ब्रायोनिया - पोटात जड वजन असल्यासारखे वाटते. तोंडात कडवटपणा येतो. शौचास खूप जोर द्यावा लागतो. हे सर्व संधिवाताशी निगडित असते.

२) ऍल्युमिना - शौचास खूप जोर द्यावा लागतो. रुग्णास शौचास जायची इच्छा नसते किंवा गेल्यावर होत नाही. बटाटा आवडत नाही/त्रास होतो. हे औषध जुनी सर्दी, अर्धांगवायू यासाठीही उपयुक्त आहे.


३) मॅग मूर - हे औषध मुख्यत- यकृताशी निगडित आहे. लहान मुलांमध्ये मलावरोध दात येताना झाल्यास अत्यंत गुणकारी औषध आहे. शौचाला थोडीच होते. दूध पचवू शकत नाही.


४) सल्फर - मलावरोध झाल्यामुळे गुदद्वाराची खूप आग होते व सूज येते. हा रुग्ण जेवणात खाण्यामध्ये पाणीच खूप पितो. शौचास खूप जोर द्यावा लागतो.


५) ग्रॅफायटीस - हे औषध जाड, गोऱ्या स्त्रियांना किंवा मुलींना ज्यांना पाळीचे विकार असतील त्यांना उपयोगी पडते. शौचावाटे रक्त पडते. मल जड असतो.


६) नक्‍स व्होमिका - मलावरोधासाठी अत्यंत गुणकारी औषध असते. यामध्ये तक्रारी या मद्यपान, बाहेरचे खाणे, मांसाहार यामुळे होतात. शौचास खूप जोर द्यावा लागतो. शौचास खूप कडक व थोडी होते.

अपचन, मूळव्याध व गॅसेस यासाठीही उपयुक्त औषध आहे.

लहान मुलांमध्ये पोटदुखीची समस्या सर्रास आढळते. अशावेळी अचानक मुलं रडायला लागतात. या वेदना तीव्र  असल्याने मुलांना आणि पर्यायाने पालकांनाही त्याचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. डॉक्टरांच्या मते, खाण्याच्या वेळी मुलांनी अधिक प्रमाणात हवा श्वसनाच्या मार्गाने आत घेतल्यास आतड्यांचे आकुंचन होण्याचे प्रमाण वाढते. परिणामी पोटदुखीची समस्या वाढते. ( नक्की वाचा : मुलांच्या आहारातील या ’10′ अ‍ॅलर्जींना वेळीच ओळखा)

पोटदुखीची ही समस्या धोकादायक नसली तरीही या दरम्यान लहान मुलांना त्रास होतो. अशावेळी या वेदना कमी करण्याचा एक पारंपारिक मार्ग म्हणजे पोटावर केलेला हिंगाच्या पाण्याचा मसाज .

हिंग फायदेशीर का आहे 

स्वयंपाकघरात वापरले जाणारे हिंग हे पावडर स्वरूपात आढळते.  फेरुला या वनस्पतीपासून हिंग बनवले जाते. हिंग़ातील अ‍ॅन्टी बॅक्टेरियल आणि अ‍ॅन्टी सेप्टीक घटक पोट साफ करण्यास मदत करतात. यामुळे पचनमार्ग मोकळा व स्वच्छ होतो. पोटाचे विकार तसेच श्वसनाच्या समस्या कमी होण्यास  मदत होते. लहान मुलांना थेट हिंग देणे त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे त्यांच्या पोटावर हिंगाच्या पाण्याने मसाज करणे फायदेशीर ठरते. (नक्की  वाचा : मुलांना ‘स्ट्रॉग’ बनवतील ‘सुवर्णप्राशन’चे दोन थेंब !)

कसा कराल हा उपाय  ? 

अर्धा चमचा हिंग पाण्यात मिसळून त्याची पेस्ट बनवा.
पोटाजवळ  हलक्या हाताने या पेस्टने मसाज करा.
मात्र ही पेस्ट बेंबीत जाणारा नाही याची काळजी घ्या. बेंबीजवळील पेस्ट कापसाच्या ओल्या बोळ्याने पुसा.
पाण्याऐवजी ऑलिव्ह ऑईल किंवा तीळाच्या तेलातही हिंग मिसळून पेस्ट करणे फायदेशीर ठरू शकते.
पेस्ट लावल्यानंतर थोडावेळ ती थंड होऊ द्यावी तसेच सुकू द्या.
पोटदुखी कमी करण्यासाठी थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे संयम पाळा.
पेस्ट सुकल्यानंतर मुलांना ढेकर येऊ देण्यासाठी प्रयत्न करा. यामुळे  गॅस बाहेर पडेल तसेच पोटदुखीची समस्या कमी होण्यास मदत होईल.
त्यानंतर ओल्या कापडाने बाळाचे पोट स्वच्छ पुसावे.
हिंग बाळाच्या पोटाला लावून पचनाचा त्रास कमी करण्याचा हा पर्याय त्रासदायक नसल्याने तो आवश्यक असल्यास तुम्ही बिनदिक्कत करू शकता. मात्र या उपायाने त्रास कमी न झाल्यास तसेच बाळाचे रडणे कमी न झाल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

बहुतांशी लोकांचे पोट साफच होत नाही. काहींना त्रास जाणवत नाही, मात्र पोट पूर्ण साफ झाले आहे याचे समाधान होत नाही. मग वृद्ध लोकांचे रोज वेगवेगळ्या जाहिराती बघून नवनवीन औषधे घेणे सुरू होते. काही दिवस बरे वाटते व पुन्हा त्या औषधांची सवय होते, त्यामुळे पोट काही साफ होत नाही. असो. या सर्व तक्रारींमध्ये पोट साफ का होत नाही याचे कारण शोधणे मात्र गरजेचे असते. सरसकट सर्वानाच एक औषध देऊन उपयोग होत नाही.

आयुर्वेदात ‘अवष्टंभ: पुरिषस्य..’ असे सूत्र आहे. म्हणजे प्राकृत पुरीषाचे कामच मुळी ‘अवष्टंभ’ करणे म्हणजे साठून राहणे असे आहे. विचार करा, हे साठून राहण्याचे काम त्याचे नसते, तर लोकांना सतत एखादे ‘डायपर’ घालूनच फिरावे लागले असते. म्हणून मल तयार झाला की, तो प्रथम साठून राहतो. म्हणजे रोज काहींना ठरावीक वेळेत पोट साफ होण्याची सवय असेल तर तो आहे प्राकृत अवष्टंभ. 

मात्र ठरावीक वेळेला साफ होणारे पोट त्यानंतर दोन-चार तासांनंतरही अथवा एक दिवस होऊन गेला तरी साफ नाही झाले तर तो आहे ‘मलावष्टंभ’. या प्रकारामध्ये प्रामुख्याने आदल्या दिवशी घेतलेला आहार, त्याचे प्रमाण व होणारे पचन हे अवलंबून असते. घरगुती गरम पाणी, लिंबू पाणी अथवा लंघन केले तरी काही वेळाने पोट साफ होते व रुग्णाला बरे वाटते. 
बाळाचे पोट साफ होण्यासाठी उपाय

ज्या लोकांची बाउल मुव्हमेंट अर्थात पोट साफ होण्याची प्रक्रिया नियमित होत नाही, त्यांचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेत जातो. तज्ज्ञांच्या मते, अशा स्थितीतच मलावरोध किंवा गॅसची समस्या निर्माण होते. घरगुती उपायांद्वारे बाउल मुव्हमेंट नियमित कशी करावी यासंदर्भात जाणून घेऊया.


  • सकाळी उठताच सर्वात आधी कोमट पाण्यात लिंबू आणि शेंदी मीठ मिसळून प्यावे. त्यामुळे बाउल मुव्हमेंट नियमित ठेवण्यास मदत होईल.
  • तज्ज्ञांच्या मते, फळांच्या ज्यूसमध्ये दूध मिसळून प्यायला हवे. तसेच ज्या फळांमध्ये गर असतो, त्यांचे थेट सेवन करा.
  • भोजनानंतर दालचिनी पावडरचे सेवन करा.
  • 100 मि.लि. पाण्यात एक चमचा मेथीचे दाणे थोडा वेळ उकळा आणि भोजन करण्याच्या एक तास आधी ते पाणी प्या. तसेच भोजनानंतर ते मेथीचे दाणे चावून खा.
  • भोजनानंतर गूळही खा. त्यामुळेही पचन व्यवस्थित होते.
  • दररोज सॅलडचे सेवन करायला हवे. त्यात पालक, टोमॅटो, मुळा आणि काकडीचा समावेश असावा. तसेच सर्व प्रकारच्या फळांपासून बनलेल्या सॅलडचेही सेवन करायला हवे.
  • दिवसभर भरपूर पाणी आणि ताक प्यायला हवे; जेणेकरून कडक शौचास होणार नाही. तसेच भाज्यांपासून बनलेले सूप व वरण यासारख्या द्रवपदार्थांच्या सेवनाचेही प्रमाण वाढवा.
  • तंतूमय फळे व भाज्यांचे सेवन केल्यासदेखील शौचास कडक होत नाही आणि पचन व्यवस्थित होते. 



मात्र हे सतत व रोजच चालू राहिले तर पचनशक्ती खालावते, अग्नी मंद होतो व रुग्णास सततचा ‘मलावष्टंभ’ हा आजार मागे लागतो. यासाठी मात्र चिकित्सा घ्यावी लागते. नाही तर ‘ग्रहणी’ नावाचा मोठा आजार अथवा ‘मूळव्याध’ मागे लागते. आपण आतापर्यंत अवष्टंभ, प्राकृत मलावष्टंभ, आजार स्वरूप मलावष्टंभ पहिले. या सर्वामध्ये लक्ष्य हे मलाकडे म्हणजे त्याच्या प्राकृत निर्मितीकडे द्यावे लागते. 
पोट साफ होण्यासाठी गोळ्या
तशा पद्धतीची औषधी उपाययोजना केली की हे बरे होते. मात्र वृद्धापकाळात सततच्या प्रवाहनामुळे, पोट साफ होण्याच्या घेतलेल्या वेगवेगळ्या औषधींमुळे व वयोमानानुसार आतडय़ांची शक्ती कमी होते व ते तयार झालेला मल भाग पुढे ढकलण्यास सक्षम होत नाहीत. त्यास ‘कोष्ठबद्धता’ असे म्हणतात. म्हणून तर ‘मलबद्धता’ व ‘कोष्ठबद्धता’ या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. 


पोट साफ होण्यासाठी औषधे

एकात पचनशक्ती महत्त्वाची, तर दुसऱ्यात आतडय़ांची शक्ती महत्त्वाची. म्हणून यांच्या चिकित्साही बदलतात. तुम्हाला कोणता त्रास आहे हे प्रथम जाणून घ्यायला हवे. लहान मुलांमध्ये फक्त मलबद्धता असेल तर त्यांच्या आहाराकडे लक्ष द्या.


पोट साफ होण्यासाठी एरंडेल तेल

बाहेरचे पदार्थ पिझ्झा, बर्गर इत्यादी फास्टफूड कमी करा. १०-२० मनुके रात्री भिजत घालून पाण्यासह मनुके खाण्यास द्या. मुगाचे कढण अथवा मुगभात खिचडी खायला द्या. पपई, पेरू, डाळिंब, आवळा अशी फळे मुलांना खायला द्या. ज्वारीच्या लाहय़ा, साळीच्या लाहय़ा मुलांना द्या. एक वेळेच्या जेवणामध्ये आवर्जून भाकरीचा समावेश करा. 


पोट साफ होण्यासाठी आयुर्वेदिक गोळ्या

हेच मोठय़ा माणसांमध्ये पोट साफ होत नसल्यास त्यांनी प्रथम आहार कमी करावा, पोटाला आवश्यक तेवढी विश्रांती द्यावी म्हणजे पचनशक्ती वाढते, तर वृद्ध मंडळींनी त्यांच्या आतडय़ांची शक्ती वाढवण्याकडे लक्ष द्यावे. रोज आहारातील तुपाचे प्रमाण वाढवावे. पोटाला रोज एरंड तेलाने मसाज करावा. आहारातही रोज १-१ चमचा एरंड तेल घ्यावे. 


पोट साफ होण्यासाठी उपाय डॉक्टर स्वागत तोडकर

याने आतडय़ांना बळ मिळते व कोष्ठबद्धता दूर होते. नुसती पोट साफ होण्याची औषधे घेऊ नयेत. यामुळे आतडय़ांची शक्ती कमी होते. आमची आज्जी आम्हाला एक नियम सांगायची, तो जर सर्वानी पाळला तर पोटाच्या ८० टक्के तक्रारी होतच नाहीत अथवा झाल्या तरी बऱ्या होतात. तो नियम म्हणजे ‘खाऊ की नको खाऊ ’असा प्रश्न पडला असेल तर न खाणेच चांगले व मलविसर्जनाला जाऊ की नको जाऊ , हा प्रश्न पडला असेल तर जाणेच चांगले.’


एरंडेल तेल एरंडेल तेल हा बद्धकोष्ठतेवरील फार जुना उपचार आहे. या तेलामुळे आतड्यातील जंतू मरतात. जर तुम्हाला एक चमचा एरंडेल तेल पिणे शक्य नसल्यास ते ग्लासभर दुधात एकत्र करून रात्री प्यावे. आतड्याच्या धीम्या कार्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास संभवतो तो दूर होईल.
अंजीर अंजीर तुम्हाला फायबर तर पुरवतेच पण बद्धकोष्ठतेवरही अतिशय गुणकारी आहे. आळशी तुम्ही अन्य अन्नधान्यासोबत एकत्र करून नाश्त्याला खाऊ शकता अथवा गरम पाण्यासोबत घेऊ शकता.
लिंबू आयुर्वेदात लिंबाचे अतिशय महत्त्व आहे. सकाळी अनशन पोटी घेतलेले लिंबुपाणी पोट साफ करण्यास मदत करते. तसेच या मिश्रणात मीठ टाकल्यास त्यामुळे शौचास सुलभ होण्यास मदत होते. लिंबू पाण्यामुळे आतडी व पर्यायाने शरीर स्वच्छ होते.
संत्र संत्र हे व्हिटामिन ‘ सी’ व फायबरने समृद्ध आहे. फळांतील फायबरमुळे पोट साफ होते . सकाळ संध्याकाळ संत्र खाण्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.. संत्री रक्त शुद्ध करण्यास, पचनशक्ती वाढवण्यास, अत्यंत गुणकारी आहेत.
मनुका मनुकादेखील रेचक असल्याने बद्धकोष्ठतेवर फारच गुणकारी आहेत. त्यातील फायबर घटकांमुळे पोट स्वच्छ होते . रात्रभर पाण्यात भिजवलेले काळी मनुका सकाळी पाण्यासकट खाल्याने फार फायदा होतो. गर्भवती स्त्रियांसाठी हा उपचार अतिशय उपयुक्त आहे. यामुळे कोणताही साईड इफेक्ट होत नाही.
पालक पालक शरीरातील आतड्यांचा मार्ग स्वच्छ करून पुनरुजीवीत करण्यास मदत करतो. 100 मिली पालक रस व पाणी समप्रमाणात रोज पाण्यासोबत दोनदा घेतल्यास बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो . तीव्र बद्धकोष्ठतेच्या त्रासावरदेखील पालक हितावह आहे.
त्रिफळा चूर्ण त्रिफळा चूर्ण हे आवळा , हरडा व बेहडा या तीन फळांपासून बनवलेले असते . हे चूर्ण रेचक असून त्यामुळे तुमचे पचन नियमित व शौचास सुलभ होण्यास मदत होते. चमचाभर त्रिफळा चूर्ण पाण्यासोबत अथवा मधासोबत रोज सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री झोपताना घेतल्यास बद्धकोष्ठ्तेपासून आराम मिळतो.
पेरू पेरूमध्ये पाचक गुणधर्म असल्याने बद्धकोष्ठतेवर पेरू अत्यंत फायदेशीर ठरतो .पेरूमध्ये व्हिटामीन बी व सी अधिक आहेत. पेरूतील गरामध्ये विद्राव्य (soluble ) फायबर असतात तर बियांमध्ये अद्राव्य (insoluble ) फायबर असतात. त्यामुळे पोट साफ होऊन भूकवाढीसाठी पेरूचे सेवन हितावह आहे.

बियांचे मिश्रण २-३ सूर्यफूलांच्या बिया, थोडे आळशीचे दाणे, तिळाच्या बिया व बदाम यांची पूड करून नियमित घेतल्याने तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. सलाड किंवा नाश्त्याला धान्यात ही पूड एकत्र करून किमान दोन आठवडे खाल्याने निश्चित आराम मिळतो. यामधून मिळणारे फायबर केवळ बद्धकोष्ठतेपासून आराम देत नाहीत तर त्यामुळे आतड्यांचा मार्ग देखील पुनरुज्जीवित होतो.
बध्दकोष्ठतेचा त्रास अनेकांना दिसून येतो. यामध्ये पोट साफ होत नाही. अनेकदा चुकीच्या आहारामुळे, चुकीच्या जीवनशैलीमुळे हा त्रास निर्माण होतो. त्यावर नियंत्रण ठेवलं तर बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून दूर राहता येतं. सकाळी उठल्याबरोबर पोट व्यवस्थित साफ झाले तर संपूर्ण दिवस चांगला जातो. अन्यथा दिवसभर जडपणा, अस्वस्थता, डोके दुखणे पोट दुखणे अशा तक्रारी येत राहतात. पोट सकाळच्या वेळी सहजपणे साफ होणे हे आरोग्याचे लक्षण मानले जाते. मळाची निर्मिती योग्य पद्धतीने न झाल्याने, त्याचे विसर्जनही योग्य प्रकारे होत नाही. शरीरातील टाकाऊ पदार्थ योग्य प्रकारे योग्य प्रकारे शरीराबाहेर टाकले गेले नाहीत तर बऱ्याच शारीरिक तक्रारी निर्माण होतात. भविष्यात निर्माण होणाऱ्या आजाराची ती पूर्वसूचना असते. म्हणूनच बध्दकोष्ठता असणाऱ्या व्यक्‍तींनी वेळीच उपचार करावेत.
 संडास साफ न होण्याची कारणे पोट होणे लक्षणे लगेच होण्यासाठी उपाय यावर पातळ संडासला गोळ्या एरंडेल तेल उपाययोजना आयुर्वेदिक गरोदरपणात काय करावे घट्ट डॉक्टर स्वागत तोडकर वर घरगुती मूळव्याध कोंब फोटो गुदभागी जखम मुळव्याध औषध उपचार फिशर मराठी शस्त्रक्रिया खर्च औषधे जुलाब उलटी लहान मुलांना हगवण बिघडणे पोटात कळ येणे आव पडणे चिकट काळी बंद थांबवण्यासाठी करताना रक्त मुरडा लागणे सांगा कमी होण्याचे बाळाची हिरवी शी बाळाला होत नसेल तर फुगणे कडक बद्धकोष्ठता खडा बध्दकोष्ठता म्हणजे
अशी आहेत लक्षणे

रोज शौचास न होणे, सकाळी उठल्यावर शौचाला न होता दिवसभरात कधीही होणे, मळ टणक गाठी सारखा होणे, पोट साफ होण्यासाठी बराच वेळ बसावे लागणे, मलविसर्जन करताना कुंथावे लागणे, मळ चिकट असणे, शौचाची भावना न होणे इत्यादी सर्व लक्षणे दिसून येतात.

बद्धकोष्ठतेची कारणे

आहारात फार तिखट, कडू, तुरट, इत्यादी रसांचा अधिक वापर असणे, फार कोरडे अन्न खाणे, यात स्निग्धतेचा अभाव असणे म्हणजे तूप न लावता खाल्लेली भाकरी किंवा पोळी, लोणी न लावता खाल्लेला ब्रेड, चुरमुरे, चिवडा पाणीपुरी असे पदार्थ अतिप्रमाणात खाणे यामुळे मळ अधिक कडक होतो.

शरीरास दूध, साजूक तूप, घरचे लोणी, तेल इत्यादी स्निग्ध गोष्टींची आवश्‍यकता असते. हे पदार्थ अजिबातच न वापरणे किंवा अत्यल्प प्रमाणात खाणे अयोग्य असते. त्यांच्या अभावाने मळ मऊ बनत नाही. वात वाढवणारी आणि पचायला जड असणारी कडधान्य स्वतःच्या प्रकृतीचा विचार न करता खाणेही आरोग्यास अपायकारक आहे. आहारात तंतुमय पदार्थ म्हणजेच पालेभाज्या कोशिंबिरीचा अभाव इत्यादीचा अभाव असणे, तसेच मांसाहाराचे प्रमाण अधिक असणे, बेसनाच्या, मैद्याच्या पदार्थांचे खूप जास्त सेवन करणे, अशा चुकीच्या आहारामुळे बध्दकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे प्रकृतीला मानवत नसतानाही खूप उपवास केल्यानेही पचनाचे त्रास संभवतात. डायटिंग हे फॅडही त्यासाठी कारणीभुत असते.

या उलट काहीजण भूक लागलेली नसतानाही जबरदस्तीने खातात. अगोदरचे अन्न पचण्यापूर्वीच खाणे, रात्रीचे जागरण, दिवसा झोपणे, पुरक व्यायामाचा अभाव किंवा खूप जास्त व्यायाम करणे, मलनि:सारणाची भावना जबरदस्तीने दाबून ठेवणे यामुळे बद्धकोष्ठता होते. वाढत्या वयानुसार शरीरातील वाताचा प्रभाव वाढतो, त्यामुळेही बरेचदा बद्धकोष्ठतेचे लक्षण दिसते.
पचन शक्‍तीची दुर्बलता, सदोष आहार पुरेशा व्यायामाचा अभाव ही बद्धकोष्ठतेची प्रमुख कारणे आहेत. बद्धकोष्ठतेची तक्रार फार दिवस राहिल्यास काही आरोग्य समस्या उद्‌भवू शकतात. डोके दुखणे, मुळव्याध, फिशर, हार्निया, निद्रानाश, निरूत्साह, आळस, सर्वांग जड, होणे, कंबरदुखी, अंगदुखी तसेच पचनच्या इतर तक्रारी उदभवतात. म्हणून आहारात, दिनचर्येत योग्य तो बदल करावा.

पोट साफ होण्यासाठी सतत औषध घ्यावे लागणेही योग्य नाही. त्यामुळे ही क्रिया नैसर्गिक होण्यावरच भर दयावा.
वातामुळे बद्धकोष्ठता होत असेल तर एरंडेल तेल, बहावा, मनुका सेवन करावे. तसेच घरी बनवलेले साजूक तूप तर यावर अतिशय गुणकारी ठरते. यामुळे पचनाची ताकद तर वाढतेच पण वातशक्‍तीही नियंत्रित राहते. म्हणून दोन्ही जेवणापूर्वी कोमट पाण्यात एक चमचा तूप आणि चिमूटभर सेैंधव घ्यावे. तसेच रात्री झोपताना कपभर गरम पाण्यात दोन चमचे साजूक तूप आणि दोन चिमुट सैंधव टाकून प्यावे. पोटावर हलक्‍या हाताने तेल चोळाल्यास पोटातील वात सरतो आणि पोट साफ होण्यास मदत होते. कफाशी संबंधीत त्रासातून ही तक्रार उद्‌भवत असल्यास त्यासाठी हिंगाष्टक चूर्ण शंखवटी इत्यादी औषधे घ्यावीत. मळातील अधिक चिकटपणा काढून टाकण्यासाठी इसबगोल, हळीव हे बुळबुळीत पदार्थ घ्यावेत. सोबत त्रिफळासारखे चूर्णही घ्यावे. सौम्य प्रकारात त्रास असणा-यांनी भिजवलेल्या मनुका, अंजीर, सुखसारक चूर्ण इत्यादींचे सेवन करावे. उकळलेले पाणी पिणे हा उपाय बद्धकोष्ठतेवर उत्तमच आहे. यामुळे पचनशक्‍ती सुधारून वात आणि कफाचे नियंत्रण होते. सतत रेचक औषध घेतल्यामुळे कालांतराने आतड्यांमध्ये शिथिलता येऊ शकते आणि इतर तक्रारी वाढू शकतात. म्हणून वैद्यकीय उपचाराबरोबरच बद्धकोष्ठतेपासून मुक्‍तता होण्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम तसेच नियमित दिनचर्या असणे अधिक गरजचे आहे.

नियमित पोट स्वच्छ होणे हे निरोगी आरोग्याचे गमक आहे. मात्र आधुनिक जीवनशैली , खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी आणि वेळा यांमुळे बद्धकोष्ठ्ता जडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. योग्य वेळी बद्धकोष्ठ्तेवर उपचार केले नाहीत तर यातून गंभीर आजार संभवू शकतात. बद्धकोष्ठतेवर काही घरगुती उपाय आज खासरे वर बघूया..

बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टीपेशन या आजाराचे मूळ म्हणजे घेतलेला आहार व्यवस्थितरीत्या पचन न होणे किंवा चुकीच्या पध्दतीने आहार घेणे, बैठे काम, व्यायामाचा अभाव, अवेळी खाणे, अवेळी झोपणे इत्यादी अनेक कारणे नैसर्गिकपणे, नियमित होणाऱ्या मलविसर्जनात अडथळा आणतात. यामुळे शौचास वेळेवर होत नाही, किंवा पोट साफ होत नाही, कधी कधी घट्ट शौचास होते आणि जोर देऊन शौचास झाल्याने मूळव्याधीसारख्या व्याधी जडण्याची शक्‍यता असते. मांसाहार, तळलेले पदार्थ, मैदायुक्त पदार्थ, मसालेदार पदार्थ जास्त प्रमाणात सेवन करणे, अवेळी खाण्याची सवय यामुळे अवरोध किंवा बद्धकोष्ठता बळावते. कमी पाणी पिणे, चुकीच्या खाण्याच्या पध्दती अवलंबणे जसे पटपट खाणे, भरपेट खाणे इ. तसेच विविध प्रकारची पेये, अति आंबवलेले व तळलेले पदार्थ यामुळे आतड्याची क्रिया मंदावते परिणामी बद्धकोष्ठता होते. शौचास लागलेली असतानासुद्धा न जाणे आणि वारंवार जुलाबाची औषधे घेणे यामुळे बद्धकोष्ठता बळावते. तंम्बाखु, दारू या व्यसनांमुळे आतड्याच्या कार्यावर प्रतिकूल परिणाम होऊन बद्धकोष्ठता निर्माण होते.बध्दकोष्ठतेचा त्रास अनेकांना दिसून येतो. यामध्ये पोट साफ होत नाही. अनेकदा चुकीच्या आहारामुळे, चुकीच्या जीवनशैलीमुळे हा त्रास निर्माण होतो. त्यावर नियंत्रण ठेवलं तर बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून दूर राहता येतं. सकाळी उठल्याबरोबर पोट व्यवस्थित साफ झाले तर संपूर्ण दिवस चांगला जातो. अन्यथा दिवसभर जडपणा, अस्वस्थता, डोके दुखणे पोट दुखणे अशा तक्रारी येत राहतात. पोट सकाळच्या वेळी सहजपणे साफ होणे हे आरोग्याचे लक्षण मानले जाते. मळाची निर्मिती योग्य पद्धतीने न झाल्याने, त्याचे विसर्जनही योग्य प्रकारे होत नाही. शरीरातील टाकाऊ पदार्थ योग्य प्रकारे योग्य प्रकारे शरीराबाहेर टाकले गेले नाहीत तर बऱ्याच शारीरिक तक्रारी निर्माण होतात. भविष्यात निर्माण होणाऱ्या आजाराची ती पूर्वसूचना असते. म्हणूनच बध्दकोष्ठता असणाऱ्या व्यक्‍तींनी वेळीच उपचार करावेत.

अशी आहेत लक्षणे

रोज शौचास न होणे, सकाळी उठल्यावर शौचाला न होता दिवसभरात कधीही होणे, मळ टणक गाठी सारखा होणे, पोट साफ होण्यासाठी बराच वेळ बसावे लागणे, मलविसर्जन करताना कुंथावे लागणे, मळ चिकट असणे, शौचाची भावना न होणे इत्यादी सर्व लक्षणे दिसून येतात.

बद्धकोष्ठतेची कारणे
  
आहारात फार तिखट, कडू, तुरट, इत्यादी रसांचा अधिक वापर असणे, फार कोरडे अन्न खाणे, यात स्निग्धतेचा अभाव असणे म्हणजे तूप न लावता खाल्लेली भाकरी किंवा पोळी, लोणी न लावता खाल्लेला ब्रेड, चुरमुरे, चिवडा पाणीपुरी असे पदार्थ अतिप्रमाणात खाणे यामुळे मळ अधिक कडक होतो.

शरीरास दूध, साजूक तूप, घरचे लोणी, तेल इत्यादी स्निग्ध गोष्टींची आवश्‍यकता असते. हे पदार्थ अजिबातच न वापरणे किंवा अत्यल्प प्रमाणात खाणे अयोग्य असते. त्यांच्या अभावाने मळ मऊ बनत नाही. वात वाढवणारी आणि पचायला जड असणारी कडधान्य स्वतःच्या प्रकृतीचा विचार न करता खाणेही आरोग्यास अपायकारक आहे. आहारात तंतुमय पदार्थ म्हणजेच पालेभाज्या कोशिंबिरीचा अभाव इत्यादीचा अभाव असणे, तसेच मांसाहाराचे प्रमाण अधिक असणे, बेसनाच्या, मैद्याच्या पदार्थांचे खूप जास्त सेवन करणे, अशा चुकीच्या आहारामुळे बध्दकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे प्रकृतीला मानवत नसतानाही खूप उपवास केल्यानेही पचनाचे त्रास संभवतात. डायटिंग हे फॅडही त्यासाठी कारणीभुत असते.

या उलट काहीजण भूक लागलेली नसतानाही जबरदस्तीने खातात. अगोदरचे अन्न पचण्यापूर्वीच खाणे, रात्रीचे जागरण, दिवसा झोपणे, पुरक व्यायामाचा अभाव किंवा खूप जास्त व्यायाम करणे, मलनि:सारणाची भावना जबरदस्तीने दाबून ठेवणे यामुळे बद्धकोष्ठता होते. वाढत्या वयानुसार शरीरातील वाताचा प्रभाव वाढतो, त्यामुळेही बरेचदा बद्धकोष्ठतेचे लक्षण दिसते.
पचन शक्‍तीची दुर्बलता, सदोष आहार पुरेशा व्यायामाचा अभाव ही बद्धकोष्ठतेची प्रमुख कारणे आहेत. बद्धकोष्ठतेची तक्रार फार दिवस राहिल्यास काही आरोग्य समस्या उद्‌भवू शकतात. डोके दुखणे, मुळव्याध, फिशर, हार्निया, निद्रानाश, निरूत्साह, आळस, सर्वांग जड, होणे, कंबरदुखी, अंगदुखी तसेच पचनच्या इतर तक्रारी उदभवतात. म्हणून आहारात, दिनचर्येत योग्य तो बदल करावा.

 संडास साफ न होण्याची कारणे पोट होणे लक्षणे लगेच होण्यासाठी उपाय यावर पातळ संडासला गोळ्या एरंडेल तेल उपाययोजना आयुर्वेदिक गरोदरपणात काय करावे घट्ट डॉक्टर स्वागत तोडकर वर घरगुती मूळव्याध कोंब फोटो गुदभागी जखम मुळव्याध औषध उपचार फिशर मराठी शस्त्रक्रिया खर्च औषधे जुलाब उलटी लहान मुलांना हगवण बिघडणे पोटात कळ येणे आव पडणे चिकट काळी बंद थांबवण्यासाठी करताना रक्त मुरडा लागणे सांगा कमी होण्याचे बाळाची हिरवी शी बाळाला होत नसेल तर फुगणे कडक बद्धकोष्ठता खडा बध्दकोष्ठता म्हणजे

पोट साफ होण्यासाठी सतत औषध घ्यावे लागणेही योग्य नाही. त्यामुळे ही क्रिया नैसर्गिक होण्यावरच भर दयावा.
वातामुळे बद्धकोष्ठता होत असेल तर एरंडेल तेल, बहावा, मनुका सेवन करावे. तसेच घरी बनवलेले साजूक तूप तर यावर अतिशय गुणकारी ठरते. यामुळे पचनाची ताकद तर वाढतेच पण वातशक्‍तीही नियंत्रित राहते. म्हणून दोन्ही जेवणापूर्वी कोमट पाण्यात एक चमचा तूप आणि चिमूटभर सेैंधव घ्यावे. तसेच रात्री झोपताना कपभर गरम पाण्यात दोन चमचे साजूक तूप आणि दोन चिमुट सैंधव टाकून प्यावे. पोटावर हलक्‍या हाताने तेल चोळाल्यास पोटातील वात सरतो आणि पोट साफ होण्यास मदत होते. कफाशी संबंधीत त्रासातून ही तक्रार उद्‌भवत असल्यास त्यासाठी हिंगाष्टक चूर्ण शंखवटी इत्यादी औषधे घ्यावीत. मळातील अधिक चिकटपणा काढून टाकण्यासाठी इसबगोल, हळीव हे बुळबुळीत पदार्थ घ्यावेत. सोबत त्रिफळासारखे चूर्णही घ्यावे. सौम्य प्रकारात त्रास असणा-यांनी भिजवलेल्या मनुका, अंजीर, सुखसारक चूर्ण इत्यादींचे सेवन करावे. उकळलेले पाणी पिणे हा उपाय बद्धकोष्ठतेवर उत्तमच आहे. यामुळे पचनशक्‍ती सुधारून वात आणि कफाचे नियंत्रण होते. सतत रेचक औषध घेतल्यामुळे कालांतराने आतड्यांमध्ये शिथिलता येऊ शकते आणि इतर तक्रारी वाढू शकतात. म्हणून वैद्यकीय उपचाराबरोबरच बद्धकोष्ठतेपासून मुक्‍तता होण्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम तसेच नियमित दिनचर्या असणे अधिक गरजचे आहे.

fly