बुधवार, 28 जनवरी 2015

वातविकारांवर उपचार

 
सर्वसामान्यपणे ज्यात सांधे दुखतात तो "संधिवात' असे मानले जात असले, तरी सांधेदुखीने त्रस्त व्यक्‍तीवर योग्य उपचार होण्यासाठी नेमके निदान होणे आवश्‍यक असते. .......
ज्याच्या नावातच वात आहे, असा हा रोग वातविकारांपैकी एक आहे. सर्वसामान्यपणे ज्यात सांधे दुखतात तो संधिवात असे मानले जात असले तरी सांधेदुखीने त्रस्त व्यक्‍तीवर योग्य उपचार होण्यासाठी नेमके निदान होणे आवश्‍यक असते. हे निदान करण्यासंदर्भात आयुर्वेदाने अत्यंत बारकाईने मार्गदर्शन केलेले आहे.

संधिगत वात -
हन्ति सन्धिगतः सन्धिन्शूलशोफौ करोति च ।
...योगरत्नाकर

जेव्हा सांध्यांमध्ये वातदोष वाढतो तेव्हा संधिवेदना व सूज निर्माण करतो.

एखादाच सांधा दुखणे व सगळे सांधे दुखणे असे याचे दोन प्रकार आहेत. यातील पहिला प्रकार म्हणजे एखादा सांधा दुखण्याचे प्रमाण खूप मोठे असल्याचे दिसते. घोटा दुखणे वा गुडघे दुखणे, मान वा कंबर दुखणे अशा सर्व तक्रारी वाताने त्या त्या ठिकाणी बस्तान बसविल्याच्या निदर्शक असतात. आजकाल दिवसेंदिवस कमी वयातही असा त्रास होण्याचे प्रमाण वाढताना जाणवते आहे.

सगळे सांधे दुखणे हा विकार खूपच त्रासदायक असतो. वेळेवर योग्य उपचारांच्या अभावी हा रोग व्यक्‍तीला अंथरुणावर खिळवून ठेवू शकतो. अशा व्यक्‍तीत फक्‍त सांध्यातच नाही तर एकंदर सर्व शरीरात वातदोष मोठ्या प्रमाणात वाढल्याची लक्षणे दिसत राहतात.

आमवात
युगपत्‌ कुपितौ अन्त त्रिकसन्धिप्रवेशकौ ।
स्तब्धं च कुरुतो गात्रनामवातः स उच्यते ।।
...माधवनिदान

जेव्हा आमदोष व वातदोष हो दोघे एकत्रित रीत्या कुपित होतात तेव्हा ज्या ज्या सांध्यात आमापाठोपाठ वातदोष जातो त्या त्या ठिकाणी हालचाल बंद करवतो, जखडण निर्माण करतो. या विकाराला आमवात असे म्हणतात.

संधिवातात सांध्यांमध्ये वातदोष असतोच पण आमवातामध्ये या दोघांच्या जोडीला आमही असतो. म्हणूनच आमवात बरा होण्यास दुष्कर व चिवट रोग समजला जातो. यात सुरुवातीला ताप येणे, अंग जड होणे, सांधे जखडणे अशी लक्षणे असतात. क्रमाक्रमाने जखडणाऱ्या सांध्यांची संख्या व तीव्रता वाढत जाते, सांध्यांवर सूज असणे, सांधा स्पर्शाला गरम लागणे, तीव्र वेदना होणे, स्पर्शही सहन न होणे ही आमवाताची लक्षणे असतात. आमवाताचे वैशिष्ट्य म्हणजे आम ज्या सांध्यात जाईल तेथे वेदना होतात. म्हणून बऱ्याचदा आमावातात फिरत्या वेदना असतात.

वातरक्‍त
क्रुद्धो रुद्धगतिर्मरुत्प्रकुपितेनास्रेण सन्दूष्यते ।
प्राक्‍पादौ तदनु प्रधावति वपुकण्ड्‌वार्तिसुप्त्यादयः ।।
...योगरत्नाकर

कुपित झालेला व अवरोध झालेला वायू दूषित रक्‍तासह मिळून प्रथम पायाचा आश्रय घेतो व नंतर संपूर्ण शरीरात धावतो. यामध्ये सांध्यांच्या ठिकाणी वेदना, खाज व बधिरता ही लक्षणे जाणवतात.

प्रत्यक्षातही पायाच्या किंवा हाताच्या अंगठ्यापासून याची सुरुवात होताना दिसते. सांध्यांच्या ठिकाणी लालसरपणा, वेदना, सूज ही लक्षणे दिसतात. क्रमाक्रमाने ही लक्षणे घोटा, गुडघा अशी वर वर सरकतात.

कोष्ठुकशीर्ष
वातशोणिजः शोथो जानुमध्ये महारुजः ।
ज्ञेयः क्रोष्टुकशीर्षस्तु स्थूलः क्रोष्टुकशीर्षवत्‌ ।।
... योगरत्नाकर

क्रोष्टुक म्हणजे कोल्हा. सूजेमुळे गुडघा कोल्ह्याच्या डोक्‍याप्रमाणे दिसू लागतो तो रोग म्हणजे क्रोष्टुकशीर्ष.
हा रोग फक्‍त गुडघ्यांपुरताच मर्यादित असतो व ह्यात रक्‍तधातूच्या जोडीने वात कुपित झालेला असतो.

वातकंटक
रक्‌पादे विषमे न्यस्ते श्रमाद्वा जायते यदा ।
वातेन गुल्फमाश्रित्य तमाहरर्वातकण्टकम्‌ ।।

पाऊल चुकीच्या पद्धतीने टाकल्याने किंवा अत्यधिक परिश्रम करण्याने जेव्हा वात गुल्फसंधीचा म्हणजे घोट्याचा आश्रय घेतो तेव्हा त्याला वातकंटक म्हणतात.

अंसशोष व अवबाहुक
अंसदेशे स्थितो वायुः शोषयित्वा अंसबन्धनम्‌ ।
सिराश्‍चा।क़ुंच्य तत्रस्थो जनयत्यवबाहुकम्‌ ।।
...योगरत्नाकर

अंस म्हणजे खांदा. खांद्यामध्ये जेव्हा वायू कुपित होतो व तेथील संधिबंधनांना सुकवतो तेव्हा त्याला अंसशोष म्हणतात. तर तिथल्या शिरा आखडल्यामुळे जेव्हा हात उचलता येत नाही तेव्हा त्याला अवबाहुक असे म्हणतात.आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये याप्रकारे सांधा सुकणे व जखडणे हे फक्‍त खांद्यांच्या संदर्भात सांगितले असले तरी ते इतर सांध्यांच्या बाबतीतही घडू शकते. विशेषतः आजकाल मांडी व कंबरेच्या सांध्यांच्या ठिकाणी रक्‍तप्रवाह पोचणे बंद होऊन तीव्र वेदना, चालता न येणे यासारखी लक्षणे असणारा रोग तरुण वयातच होताना दिसतो. हा यातलाच प्रकार समजावा लागतो. सर्व संधिवात विकारांवर दुःख कमी करण्याबरोबर रोग बरा व्हावा व झीज भरून निघावी म्हणून "संतुलन शांती तेल' वापरता येते, तसेच पाठीच्या मणक्‍यांची झीज, दोन मणक्‍यांमधील कूर्चा व नसा यांच्यासाठी "संतुलन कुंडलिनी तेल' वापरता येते.

मानदुखी, कंबरदुखी -
पाठीचे मणके हे सुद्धा छोटे छोटे सांधेच असतात. हे सांधे जोपर्यंत लवचिक असतात तोपर्यंत ठीक असते. पण, मणक्‍यांमध्ये वातदोष वाढला, लवचिकता कमी झाली तर दुखण्याची, जखडण्याची सुरुवात होते.

या सर्व वर्णनावरून एक लक्षात येईल की सांधा दुखतो या तक्रारीच्या मागे अनेक कारणे असू शकतात.
वातप्रकोप हे त्यातले सामान्य व प्रमुख कारण असले तरी त्याचा प्रकोप कशामुळे झाला, कोणासमवेत झाला याचीही दखल घेणे आवश्‍यक असते. प्रत्यक्ष उपचार करताना तर व्यक्‍तीची प्रकृती, तिचे राहणीमान, खाण्या-पिण्याच्या सवयी, वय, कुटुंबातला इतिहास, ताकद, पचनशक्‍ती अशा अनेक लहानसहान गोष्टींचा विचार करावा लागतो व त्यानुसार नेमके उपचार योजावे लागतात.

---------------------------------------------------------------
वात नियंत्रित ठेवण्यासाठी
स्नेहन - बाहेरून करायचे स्नेहन म्हणजे वातशामक द्रव्यांनी तेल लावणे तर आतून करायचे स्नेहन म्हणजे घृृतपान. अंगाला "संतुलन अभ्यंग तेला'सारख्या तेलाने नियमित अभ्यंग करणे, सांध्यांना "संतुलन शांती तेला'सारखे आतपर्यंत जिरून सांध्यांना पूर्ववत वंगण देण्याची क्षमता असणारे तेल लावणे हे संधिवात होऊ नये म्हणून चांगले असते आणि संधिवात झालेल्यांनाही आवश्‍यक असते.
-स्वेदन - वातदोषाला शमविण्यासाठी स्वेदन म्हणजे शेकणे हाही उत्तम उपाय असतो. निर्गुडी, एरंड, शेवगा वगैरे वातशामक वनस्पतींच्या पानांचा शेक करण्याने वेदना शमतात, सूजही कमी होते. यासाठी तयार "संतुलन अस्थिसंधी पॅक'ही वापरता येतो. आमाचा संबंध असणाऱ्या संधिववेदनेमध्ये रुक्ष स्वेदन म्हणजे विटकरीच्या किंवा वाळूच्या साहाय्याने शेक करणे उपयुक्‍त असते.
-विरेचन - वाताला संतुलित करण्यासाठी हलके विरेचन हा उत्तम उपचार होय. स्नेहपान, बाष्पस्वेदन घेऊन शास्त्रोक्‍त पद्धतीने विरेचन घेणे उत्तम असतेच पण घरच्या घरी पंधरा दिवसातून एकदा एरंडेल तेल घेऊन किंवा गंधर्वहरीतकी, योगसारक चूर्ण घेऊन पोट साफ करणे हेही वातासाठी चांगले असते. शरीराचे स्नेहन व्हावे व कोठासाफ व्हावा यासाठी पोळी किंवा भाकरी करताना त्यात चमचाभर एरंडेल तेलाचे मोहन टाकता येते. दिवसातून एकदा अशी गरम पोळी किंवा भाकरी खाण्याचा सर्व प्रकारच्या सांधेदुखीवर चांगला उपयोग होताना दिसतो.
-बस्ती - वातावरचा हुकुमी उपचार म्हणजे बस्ती. दशमूलासारख्या वातशामक द्रव्यांनी सिद्ध तेलाची बस्ती घेणे सर्व सांधेदुखीवर उत्तम असते. अशी आयुर्वेदिक बस्ती पोट साफ होण्यासाठी नाही तर वातशमन करणारी असते. वैद्यांच्या मार्गदर्शनाने अशी बस्ती घेता येते. तसेच घरच्या घरीही तयार तेलाच्या पाऊचची बस्ती घेता येते. उदा. संतुलन आयुर्वेद सॅनबस्ती

वातशामक औषध म्हणूून योगराजगुग्गुळ, वातबल गोळ्या, गोक्षुरादी चूर्ण. दशमूलारिष्ट, महारास्नादि काढा पंचतिक्‍तघृत वगैरे योग घेता येतात. मात्र, त्यापूर्वी वैद्यांचा सल्ला घेणे अधिक सयुक्‍तिक.

---------------------------------------------------------------
वातव्याधीसाठी पथ्यापथ्य
-पथ्य - तांदूळ, गहू, कुळीथ, पचतील एवढ्या प्रमाणात उडीद, परवर, शेवगा, लसूण, बोर, डाळिंब, मनुका, खडीसाखर, तूप, दूध, मनुका, सैंधव मीठ
-अपथ्य - रुक्ष धान्ये म्हणजे जव, नाचणी वगैरे; जड कडधान्ये (पावटा, चवळी, हरबरा, वाटाणा वगैरे); कडू व तिखट चवीचे पदार्थ, प्रवास, जागरण, नैसर्गिक वेगांचा अवरोध, अधिक परिश्रम, उपवास, अति मैथुन, चिंता.
---------------------------------------------------------------
सगळे सांधे दुखणे हा विकार खूपच त्रासदायक असतो. वेळेवर योग्य उपचारांच्या अभावी हा रोग व्यक्‍तीला अंथरुणावर खिळवून ठेवू शकतो. अशा व्यक्‍तीत फक्‍त सांध्यातच नाही तर एकंदर सर्व शरीरात वातदोष मोठ्या प्रमाणात वाढल्याची लक्षणे दिसत राहतात.


TAG: धनु. जांघ , नितंब. वात विकार , कुल्हे का दर्द , गठिया , साईंटिका ,मज्जा रोग ,यकृत दोष इत्यादि । दसवां. मकर. घुटने ,टाँगे. वात विकार ,गठिया , साईंटिका इत्यादि । ग्यारहवां. कुम्भ.

सकाळी उठून प्रथम श्रीरामांचे चिंतन करावे व कामविसर्जनासाठी मुखी सतत राम नाम असावे.

रामायणातील सर्वात महत्त्वाची व्यक्‍ती म्हणजे श्री मारुतीराय. श्रीमद्‌भगवद्‌गीतेत उत्तम भक्‍ताची लक्षणे सांगितली आहेत. भक्‍तोत्तम कोण, याचा पुरावा देण्याची वेळ आली असता मारुतीरायांनी स्वतःची छाती फाडून त्यात श्रीरामांचे वास्तव्य आहे हे दाखविले. ज्या गोष्टीत राम नाही त्याला जगात काही स्थान नाही, ज्या मोत्याच्या कंठ्यात राम नाही त्याचे मला काम नाही. किंबहुना जेथे राम नाही तेथेच "काम' आहे. मारुतीरायांच्या हृदयात रामाचे वास्तव्य सतत असल्यामुळे त्याने कामावर विजय मिळविला व त्यामुळे त्यांना महावीर ब्रह्मचारी हे विशेषण प्राप्त झाले. जे मनात तेच डोळ्यात, जे मनात तेच हातात व जे मनात तेच वागणुकीत असते. एकदा का मनात श्रीराम स्थिरावले की सर्व इंद्रिये विश्राम पावतात म्हणजे त्याच्यातही श्रीरामांचा ठसा उमटतो. समर्थ रामदासांनीही मनाच्या श्‍लोकात म्हटले आहे, "मुखी राम विश्राम तेथेचि आहे'. साहजिकच त्या ठिकाणी कुठलाही मानसिक ताण नसतो व कुठलाही प्रज्ञापराध नसतो. अशा वेळी केलेली प्रत्येक कृती श्रीरामार्पण होऊन कर्मबंधन निर्माण होत नाही.
ब्रह्मचर्य दोन्ही बाजूंनी समजून घ्यावे लागेल. चैतन्य, जाणीव म्हणजेच ब्रह्म म्हणून जाणिवेला अनुसरून जो वागतो, राहतो, जगतो तो ब्रह्मचारी. सर्व जगताच्या गाभ्याचे एकच सत्य आहे व ते म्हणजे श्रीराम. म्हणून आतून येणारे उत्तर "अहं ब्रह्मा।स्मि' असेच असते. जो स्वतःच्या अंतःप्रेरणेला, संपूर्ण ब्रह्माडातील व्यक्‍तिगत ब्रह्मचैतन्याला म्हणजेच निसर्गाला व सर्वांभूती असलेल्या परमेश्‍वराला स्मरून कार्य करतो तो ब्रह्मचारी. दुसरे म्हणजे ज्याने कामावर विजय मिळविला तोही ब्रह्मचारीच.
केवळ स्त्री-पुरुषाच्या मिलनाशी ब्रह्मचर्याचा संबंध नसावा. मेंदूत असलेल्या हृदयग्रंथीच्या ठिकाणी सर्व शक्‍ती एकवटण्याच्या केलेल्या प्रयत्नालाच ब्रह्मचर्य असे म्हटलेले आहे. मेंदूला व हृदयाला ओजाची पूर्ती होणे आवश्‍यक असते. मेंदूला वा हृदयाला ओज पुरेशा प्रमाणात न पुरवता शक्‍ती अधोगामी करून वीर्यरूपाने विसर्जित केली गेली तर ही कृती ब्रह्मचर्याच्या विरोधी समजली जात असावी. म्हणूनच शक्‍तीचा क्षय वा अपव्यय न करता शक्‍ती सत्कारणी लावणे, तिला जाणिवेपर्यंत पोचविणे व निसर्गचक्राला धरून चालणे याला ब्रह्मचर्य म्हटलेले असते.
ब्रह्मचर्याचा महिमा मोठा आहे. आयुर्वेदानेसुद्धा सांगितले आहे की त्रिदोष, मल व अग्नी संतुलित असताना शक्‍तीचे रूपांतरण सप्तधातूत होऊन शेवटी शक्‍ती वीर्य अवस्थेपर्यंत पोचते. या वीर्याचे सूक्ष्म शक्‍तीत रूपांतरण होऊन ती शक्‍ती ओजरूपाने हृदय व मेंदूला मिळते. याच शक्‍तीमुळे सर्व इंद्रियव्यापार चालतात. या दृष्टीने पाहिले असता ब्रह्मचर्य व वीर्य यांचा कुठेतरी संबंध आहेच. शरीरातील सर्व दोष, धातू, अग्नी, मल हे संतुलित असताना मन प्रसन्न होऊन ते आतील आत्मारामाला संपूर्ण शरण राहू शकते व त्याचवेळी समाधान व शांतीचा अनुभव येतो. म्हणूनच साहजिकच वीर्यनाश हा दोष समजून ती ब्रह्मचर्याच्या आड येणारी एक घटना आहे असा ब्रह्मचर्य शब्दाचा लौकिक अर्थ लावला गेला असला तर नवल नाही.
"ब्रह्मचर्य हेच जीवन' असे श्री शिवानंद स्वामींनी म्हटले आहे. वीर्याच्या एका थेंबाचासुद्धा नाश करू नये असा सल्ला त्यांनी दिलेला आहे. हे वाक्‍य समजून घेत असता "नाश करणे' या संकल्पनेविषयी सावधानता बाळगणे आवश्‍यक आहे. झाडावरून फळे काढणे म्हणजे फळांचा नाश नव्हे. या फळांचा मुरांबा वा भाजी करणे म्हणजे फळांचा नाश नव्हे. फळांपासून बनविलेले अन्न खाणे म्हणजे अन्नाचा नाश होणे, असे आपण म्हणत नाही. अन्नाचे शक्‍तीत रूपांतरण झाले नाही वा ज्याने अन्न खाल्ले त्याचे जीवन ताणपूर्ण व दुःखमय होऊन जीवन नकोसे झाले तर मात्र अन्नाचा नाश झाला असे म्हणता येईल. या व्याख्येप्रमाणे नैसर्गिक रीतीने व आवश्‍यक धातू म्हणून सहजतेने वीर्याचा वापर झाल्यास ब्रह्मचर्य मोडले असे समजता येणार नाही.
प्रत्येक व्यक्‍तीची प्रकृती वेगळ्या ताकदीची असते त्यामुळे नैसर्गिक व साहजिक म्हणजे काय हे ठरविताना गोंधळ होऊ शकतो. यासाठी वेगवेगळ्या पातळीवरचे जीवन जगण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या शक्‍तीची पूर्ती होऊन उरलेली शक्‍ती इतर मार्गासाठी वापरली गेली तर त्याला काही समस्या असू नये.
शरीरातील सर्व इंद्रियात व एकूणच सर्व जीवनात जर "राम" शिल्लक ठेवता आला तर "काम" वर्जित ठरविण्याचे कारण नाही. ब्रह्मचर्याचे पालन करणाऱ्याने मुळात वीर्यवर्धन होईल असा आहार करावा. जिभेवर "राम' असला की खाण्याच्या बाबतीतले जिभेचे चोचले कमी होतात. जे अन्न सकस नाही, ज्या अन्नात वीर्य नाही म्हणजेच ज्या अन्नात राम नाही ते अन्न स्वीकारू नये. तेव्हा योग्य आहार-विहार ठेवून बाह्य जगतात सर्वांभूती बाळगावे प्रेम व अंतरात्म्यापर्यंत पोचण्यासाठी मनातील काम विसर्जित करून शांततेचा अनुभव घेणे आवश्‍यक ठरते.
ब्रह्मचर्याची उपासना करत असताना अनेक प्रश्‍न उत्पन्न होतात. मुलगा वा मुलगी वयात आली असता कामशक्‍ती जोर धरू लागते. अशा वेळी शरीरात तयार होणाऱ्या वीर्यापैकी बाहेरच्या उत्तेजनेमुळे जागेपणी सहजगत्या, मुद्दामहून वा स्वप्नात वीर्य स्खलित होऊ शकते. ही घटना पुरुष किंवा स्त्री या दोघांच्या शरीराच्या बाबतीत घडू शकते. अशा घटनांमुळे शरीरातील शक्‍ती कमी पडून दैनंदिन व्यवहार करण्यात अडचण उत्पन्न होत नसेल तेव्हा अशी क्रिया साहजिक म्हणावी, पण असे वारंवार घडू लागले तर शरीरातील अग्नीचे संतुलन बिघडून ब्रह्मचर्य पाळण्यात अडचण येऊ शकते. म्हणून वीर्यशक्‍तीचा योग्य वापर योग्य वेळी केला तर ब्रह्मचर्याला बाधा येऊ नये.
सतत झालेला किंवा केलेला वीर्यस्राव चांगला नव्हे. यामुळे पुरुषांना पुढे आयुष्यात लैंगिक समस्या येऊ शकतात. तसेच स्त्रियांच्या बाबतीत नेहमी अंगावर पांढरे जाण्याने पाळीचे, गर्भाशयाचे वा हाडे पोकळ होण्याचे त्रास होऊ शकतात. स्त्री-पुरुष आकर्षण नैसर्गिक आहे व वीर्यउत्तेजना पण साहजिक आहे. त्याला मुद्दाम उत्तेजना दिली तर ते ब्रह्मचर्यपालनाच्या विरुद्ध समजले जावे.
ब्रह्म हे सर्वव्यापी आहे व म्हणून ब्रह्मचाऱ्याने ज्ञानोपासना करावी. त्याबरोबरच सर्वांभूती ब्रह्म पाहण्याच्या संकल्पनेनुसार आपपरभाव न ठेवता सर्वांभूती सारखेच प्रेम अनुभवावे म्हणजे ब्रह्मचर्याचे पालन होऊ शकेल. समर्थ श्रीरामदास स्वामींनी "काम' व "राम' याविषयी मनाच्या श्‍लोकांमध्ये बरेच मार्गदर्शन केलेले दिसते.
राम त्या काम बाधू शकेना
गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना ।
हरीभक्‍त तो शक्‍त कामास मारी
जगी धन्य तो मारुची ब्रह्मचारी ।।

fly