शनिवार, 8 अप्रैल 2023

सौभाग्यवती स्रिया कुंकू का लावतात 🌹

  सौभाग्यवती स्रिया कुंकू का लावतात 🌹


 


देवतांच्या पूजेत परिमल द्रव्य म्हणून अष्टगंधाचा उपयोग करतात. त्यात हळद व कुंकू ही दोन मुख्य गंधद्रव्ये आहेत. ‘  रामप्रभूंनी रावण व कुंभकर्ण यांना मारल्यानंतर आपल्या स्वरूपात विलीन करून घेतले. त्यामुळे त्यांची ज्योत सभोवती फ़िरत होती. तेव्हा रामांनी त्यांना बजावले की, मी जेव्हा केदारनाथाचा अवतार घेईन त्यावेळी माझ्याशी विरोधी भक्ती करावी म्हणजे तुम्हांला मोक्ष प्राप्त होईल. रामानी अवतार घेतल्यानंतर राक्षसांचा वध केला. त्यात जलसेना व चंद्रसेना यांचा वध झाला. त्या पतिव्रता स्त्रिया होत्या. देवांना अत्यंत वाईट वाटले. त्या स्त्रियांनी वर मागितला. देवांनी दिला तो, ‘ हळद - कुंकू ही द्रव्ये स्त्रियांनी लावावीत, तरच त्या सौभाग्यवती, सुवासिनी स्त्रिया मानल्या जातील. ’ असा वर देऊन नेमाला दंडक घातला. तेव्हापासून स्त्रियांचे मानचिन्ह झाले. मात्र गतधवा  ( विधवा ) स्त्रीने नवरा वारल्यानंतर हळद - कुंकू लावले तर तिची उभय कुळे नरककुंडात सात जन्म पडतील. यासाठी पतिनिधनानंतर स्त्रिया हळद - कुंकू लावीत नाहीत.

जी सौभाग्यवती स्त्री कपाळी कुंकू लावीत नाही,त्या दुर्भागीचे तोंड पाहू नये. चुकून दृष्टीस पडल्यास सूर्यदर्शन घ्यावे म्हणजे पाप नष्ट होते. 

 


कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यातील शिराळकोप्प तालुक्यातील उडुतडी म्हणजे  अक्का महादेवीचे जन्मगाव. शेठ निर्मलशेट्टी आणि सुमतीदेवी या सदाचारसंपन्न शिवभक्त दाम्पत्यांच्या पोटी अक्का महादेवीचा जन्म झाला. महादेवी अस तिचे नाव ठेवले.

महादेवी बालवयापासून तारुण्यावस्थेपर्यत महादेवी शिवपूजन करणे, फुलांच्या माळा करणे, विभूती लावणे, लिंग रुद्राक्ष धारण करणे, वाचन करणे , समाजाचे निरीक्षण करणे, त्यांच्या प्रश्नावर विचार करणे , वचने श्रवण करणे हीच तिची दिनक्रम होता. बसवादी शरणांच्या वचनाने प्रभावित होऊन  अक्का स्वतः वचने लिहू लागली.

शरणांचा लिंगपती शरणसती हा लिंगायत सिद्धांत  अक्काने आपल्या जगण्यात पुरेपूर उतरविला होता. तिने बालपणीच मल्लिकार्जुनाला आपला पती म्हणून वरले होते. ती नित्य मल्लिकार्जुनाचे ध्यान करणे, अक्कना मल्लिकार्जुनाच्या भेटीची ओढ लागलेली असे.  अक्का महादेवीची वचने ही अध्यात्माच्या उच्च अध्यात्म पातळीला घेऊन जाणारी आहेत. अक्कमहादेवीची वचने जीवन व्यापी, प्रभावी आहेत.

एकदा राजा कौशिक राज्यात फेरफटका मारण्यासाठी गेला असताना त्याला  अक्का महादेवीचे दर्शन झाले, पहाताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला. त्याने अक्काना लग्नासाठी मागणी घातली . अक्कमहादेवीना लग्न करायचे नव्हते. आईवडिलांच्या आग्रहाखातर तिने लग्न केले पण त्यासाठी दोन अटी घातल्या, ” मी शिवपूजेत असताना राजाने मला स्पर्श करू नये. माझ्या इच्छेविरुद्ध मला स्पर्श करू नये.” या दोन अटी राजाने मान्य केल्यानंतर त्यांचे लग्न झाले.

एकदा अक्का इष्टलिंगयोगात मग्न असताना कौशिक राजाने कामांध होऊन स्पर्श केला. अटीच उल्लंघन झाले.  अक्का नी त्या क्षणी अंगावरील वस्त्रांचा आणि राजवैभवाचा त्याग केला. ती रानावनातून भटकत कल्याणकडे निघाली.

पावसात घर करून राहता वादळाला भिऊन चालेल का ? बाजारात घर करून राहता गोंगाटाला भिऊन चालेल का ? जंगलात घर करून राहता हिंस्त्र पशूंना भिऊन चालेल का ? असे प्रश्न  अक्का विचारू लागली. जंगलातून भटकत असताना  अक्काना अनेकवेळा अनेक संकटांना सामोरे जावे लागले. लोकांनी अक्काना नावे ठेवली. अशापरिस्थितीतही अक्क स्थितप्रज्ञ राहिली. अखेर कल्याणच्या अनुभवमंटपात सामील झाली. शरण जीवनाशी एकरूपता पावली. अक्का कल्याणच्या अनुभवमंटपात आल्यानंतर अक्क आणि अल्लमप्रभु यांच्यातील संवाद अक्कच्या ज्ञानाच दर्शन घडवतो. अनुभवमंटपातील शरणांनी अक्कला आपली लाडकी लेक म्हंटले आहे. अनेक वचनात अक्कची स्तुती, गौरव केला आहे. म. बसवण्णांनी आपल्या वचनात “अक्कामहादेवी माझी आई आहे .” अस म्हणून अक्कचा गौरव केला आहे. अक्कमहादेवी म्हणजे अध्यात्माच्या उच्च शिखरावर पोहचलेली शरणी होती.

कल्याणक्रांतीनंतर सर्व शरण आपल्या निजस्थळी गेल्याचा उल्लेख तुरुंगाहि रामण्णा आपल्या वचनात करतात. त्या वचनात  अक्का महादेवी आणि अल्लमप्रभु श्रीशैलजवळच्या कर्दळीबनात जाऊन लिंगैक्य झाले.

यामुळेच अक्का जगन्माता, शिवयोगीणी  अक्कान बळग, या नावाने प्रसिध्द झाली. स्त्रीला कनिष्ठ , शूद्र ठरवून तिच्याकडून ठरवून दुययम वागणूक दिली जात होती. त्यावर अक्कामहादेवी आपल्या वचनात प्रकाश टाकते.


वचन


फुंकिन मी रणशिंग, स्त्री न च अबला अन न हीन,

हिनवू नका स्त्रीला समजून हीन, बंधुनो लक्षात ठेवा.मीही पुरुषासम घालीन कासोटा धैर्याचा,

धारण करीन कवच स्वाभिमानाचा,

लावीन तिलक शिवप्रेमाचा,

हात सरसावून फुंकिन मी रणशिंग,

मनोधैर्याच्या निऱ्या सुटल्या तर शपथ तुमची

हे चेन्नमल्लिकार्जुना.

विकाराचे चामडे, मलमूत्राचे मडके

हाडाचा सापळा, भ्रमाचा भोपळा

आगीत जळणारा, घाणीत कुजणारा

हा देह सोडून चेन्नमल्लिकार्जुनाला जण मानवा.

भूक लागली तर गावात भिक्षा मागीन

तहान लागली तर नदी-तलाव आहेत

थंडीपासून रक्षिणारे पिसाट वारे आहेत

झोपण्यासाठी पडकी देवालये आहेत.

हसणे- खेळणे, सांगणे-ऐकणे, चालणे-बोलणे

शरणांच्या सहवासात आनंदाला उधान येते.

चेन्नमल्लिकार्जुना,

तू दिलेले आयुष्य असे तो,

लिंगसुखीच्या सहवासात दिवस घालवते.

माझी भक्ती बसवण्णांची कृपा,

माझे ज्ञान प्रभुदेवांची कृपा,

माझी परिपूर्णता चेन्नबसवण्णांची कृपा

या तिघांनी एक-एक दिल्याने तीन भाव झाले,

ते तीन भाव तुम्हास समर्पण केल्याने

मला कसला त्रास उरला नाही.

चेन्नमल्लिकार्जुन देवाच्या स्मरणाने

तुमच्या करुणेचा शिशु झाला पहा

संगनबसवण्णा.

कामाला जिंकले बसवा तुमच्या दयेने.

सोमधराला धरले बसवा तुमच्या दयेने.

दिसण्यास स्त्री असले तर काय झाले ?

बलपुरुष मी बनले बसवा तुमच्या दयेने,

अतिकामी चेन्नमल्लिकार्जुनाला बाहुबंधात बांधले.

आमचे मिलन झाले बसवा तुमच्या कृपेने.

चंदनाचे तुकडे तुकडे करून उगाळले तर

ते दुखावून थरथरते का ?

सुवर्ण कापून आगीत भाजले तरी

ते दुखावून काळे कधी होईल का ?

उसाचे लहान लहान तुकडे करून

पाण्यात पिळले, उकळून उकळून रसाची साखर झाली

तरी दुखावून गोडी सोडेल का ?

माझी पूर्वजन्मीची पातके तुम्ही नष्ट

केली नाही तर तुम्हालाच हानी.

माझा पिता चेन्नमल्लिकार्जुनाने कष्ट दिले

तरीही मी शरणागती सोडणार नाही.

देवा, तुमच्या सज्जन सदभक्तांना पाहून

माझे डोळ्यावरील अज्ञान पटल नष्ट झाले,

देवा, तुमच्या सज्जन सदभक्ताच्या श्रीचरणी मस्तक लावताच

माझे कपाळीचे लिखित नष्ट झाले.

चेन्नमल्लिकार्जुना

तुमचा शरण संगनबसवण्णांचे चरण पाहून

पुन्हा पुन्हा वंदन करते.

हे अग्नी, सकल मर्त्यजन हवि हातांत घेऊन

  त्वाम् अग्ने हविष्मन्तः देवम् मर्तासः ईळते ।

मन्ये त्वा जातऽवेदसम् स हव्या वक्षि आनुषक् ॥ १ ॥


हे अग्नी, सकल मर्त्यजन हवि हातांत घेऊन तुज भगवंताचे स्तवन करीत असतात; हे सर्वज्ञा मीही तुझेच चिंतन करीत असतो, तर आमचे हविर्भाग देवांकडे तूं निरंतर नेऊन पोहोंचीव. ॥ १ ॥


अग्निः होता दास्वतः क्षयस्य वृक्तऽबर्हिषः ।

सम् यज्ञासः चरन्ति यम् सम् वाजासः श्रवस्यवः ॥ २ ॥


जो दर्भाग्रें नीटनेटकीं कापून टाकून त्याचे आसन बनवून ते देवाकरितां पसरून ठेवतो, आणि जो दानधर्म व हविर्भाग अर्पण करतो अशा पुरुषाच्या घरांतील मुख्य यज्ञसंपादक म्हटला तर हा अग्निच होय; सर्व यज्ञसमारंभ त्यालाच पावतात आणि सत्कीर्तिप्रेरित सत्वसामर्थ्येहीं सुद्धां त्याच्याच पाठिमागें धांव घेतात. ॥ २ ॥


उत स्म यम् शिशुम् यथा नवम् जनिष्ट अरणी इति ।

धर्तारम् मानुषीणाम् विशाम् अग्निम् सु अध्वरम् ॥ ३ ॥


बालकाला मातेनें जन्म द्यावा त्याप्रमाणें अभिनवरूप अग्नीला "अरणि"नें प्रकट केलें. तो हा अग्नि अखिल मानवजातीचा सांभाळ करणारा आहे; उत्कृष्ट याग ज्याच्या प्रीत्यर्थ होतात असाही तो अग्निच आहे. ॥ ३ ॥


उत स्म दुःऽगृभीयसे पुत्रः न ह्वार्याणाम् ।

पुरु यः दग्धा असि वना अग्ने पशुः न यवसे ॥ ४ ॥


सर्पाचें पिल्लूसुद्धां अचपळ असतें त्याप्रमाणें तूंही दुर्निवार आहेस; आणि एखादा बैल तृण धान्याचा पार फडशा उडवून देतो, त्याप्रमाणें हे अग्नि, तूंही असंख्य अरण्यें जाळून फस्त करतोस. ॥ ४ ॥


अध स्म यस्य अर्चयः सम्यक् सम्ऽयन्ति धूमिनः ।

यत् ईम् अह त्रितः दिवि उप ध्माताऽइव धमति शिशीते ध्मातरी यथा ॥ ५ ॥


पहा ह्या धूम्रपरिवेष्टित अग्नीच्या ज्वाळांचा झोत आकाशाकडे एकसारखा लागून राहतो कारण अशावेळीं, त्रित हा एखाद्या लोहाराप्रमाणें त्या अग्निला जोरानें फुंकून प्रज्वलित करीत असतो अथवा एखाद्या शिकलगाराप्रमाणें त्याला तीव्रपणा आणीत असतो. ॥ ५ ॥


तव अहम् अग्ने ऊतिऽभिः मित्रस्य च प्रशस्तिऽभिः ।

द्वेष्ःऽयुतः न दुःऽइता तुर्याम मर्त्यानाम् ॥ ६ ॥


हे अग्नि, तुज मित्राच्या साहाय्यानें, तुझी स्तुति केल्यानें मी आणि माझे आप्तजन असे आम्ही सर्वजण द्वेषबुद्धि विलयाला नेऊन मर्त्यमानवांच्या हात धुवून पाठीमागें लागणार्‍या सर्व संकटांतून सुखरूप पार पडूं असें कर. ॥ ६ ॥


तम् नः अग्ने अभी नरः रयिम् सहस्वः आ भर ।

सः क्षेपयत् सः पोषयत् भुवत् वाजस्य सातये उत एधि पृत्ऽसु नः वृधे ॥ ७ ॥


तर हे दर्पदलना अग्ने, आम्हां शूर पुरुषांना तें अप्रतिम वैभव तूं प्राप्त करून दे. आम्हांस भरंवसा आहे कीं देव आम्हांकडे असें वैभव खचित पाठवील. तो आमचा उत्कर्ष करील आणि आम्हीं सत्वसामर्थ्य मिळवावें म्हणून आम्हांला प्रोत्साहन देईल. तर हे देवा आम्हांस विजयश्री प्राप्त व्हावी ह्या करितां तूं युद्धांत आमच्या बरोबर रहा. ॥ ७ ॥

[9:16 AM, 4/8/2023] +91 88059 58414: 🌹 कर्मयोग 🌹



भाग १

 

‘कर्मयोग’ या शब्दाचा व्युत्पत्यर्थ ‘कर्माची युक्ती’ किंवा ‘कर्माची कुशलता’ असा आहे. कोणतेही युक्त कर्म करण्याचा मार्ग किंवा पद्धती म्हणजे कर्मयोग, असा त्याचा भावार्थ आहे. धर्मशास्त्रात, विशेषत: वेदांमध्ये, विहित असलेली कर्मे हीच युक्त कर्मे होत, असे वैदिक धर्माच्या संदर्भात मानलेले आहे. या अर्थामध्ये भगवद्‌गीतेने अधिक भर घालून तो अर्थ संपुष्ट केला. युक्त कर्मे फलाची आसक्ती सोडून आणि लाभ-अलाभ, सुख-दुःख, राग-द्वेष, सिद्धी-असिद्धी, जय-पराजय या द्वंद्वांचा अभिनिवेश न धरता सतत करीत राहणे म्हणजे कर्मयोग होय, असा भगवद्‌गीतेचा अभिप्राय आहे. निष्काम बुद्धीने वरील द्वंद्वांचा अभिनिवेश न ठेवता व निरहंकार बनून शास्त्रविहित कर्मे करीत राहिल्याने पापनाश होऊन चित्तशुद्धी होते. चित्तशुद्धीच्या योगाने आत्मा प्रसन्न होऊन परतत्त्वाचा किंवा परमेश्वराचा साक्षात्कार होतो आणि साक्षात्काराने मोक्ष सिद्ध होतो, असा कार्यकारणभाव भगवद्‌गीतेत सांगितलेला आहे. अद्वैतवादाप्रमाणे जीवात्माच तत्त्वत: परमात्मा आहे. हे जीवात्म्याचे तात्त्विक स्वरूप म्हणजे परमात्मा असून त्याचा चित्तशुद्धीद्वारा साक्षात्कार होतो. जीवात्म्याहून परमात्मा हा भिन्न आहे, असे विशिष्टाद्वैतवाद किंवा द्वैतवाद मानतो. परमात्मा म्हणजे परमेश्वर. परमेश्वराचा साक्षात्कार होण्याकरिता कर्मयोगाला भक्तियोगाची जोड द्यावी लागते, असे अद्वैतवादही मानतो. विशिष्टाद्वैतवाद व द्वैतवाद भक्तियोगास प्राधान्य देतात व कर्मयोग हा भक्तियोगाचे अंग किंवा सहकारी कारण समजतात. शंकराचार्यप्रणीत अद्वैतवादाप्रमाणे गृहस्थाश्रमातील कर्मयोगाचे महत्त्व मर्यादित आहे, असे समजले जाते. साक्षात्काराची इच्छा द्दढ झाल्यानंतर गृहस्थाश्रमीने कर्मयोग सोडून संन्यासाश्रम स्वीकारावा, असे शंकराचार्यांचे मत आहे. यास ‘विविदिषा संन्यास’ म्हणतात. कर्मयोगाला भक्तियोगाची जोड शांकरमतालाही मान्य आहे. भक्तियोग, कर्मयोग ही या मताप्रमाणे ज्ञानयोगाची अंगे होत. या मतानुसार मध्यवर्ती किंवा मुख्य स्थान ज्ञानयोगाला आहे. संन्यासाश्रमात आत्मतत्त्वाचे श्रवण, मनन आणि निदिध्यासन हे प्रमुख होय. आत्मतत्त्वाचे श्रवण, मनन, निदिध्यासन आणि आत्मसाक्षात्कार मिळून ज्ञानयोग होय. या ज्ञानयोगाला भक्तियोग व कर्मयोग यांची जोड द्यावीच लागते. शंकराचार्यांच्या मताप्रमाणे ज्ञानयोगच मोक्षाचे मुख्य साधन असल्यामुळे, त्यांनी विविदिषा संन्यासाचा आग्रह धरला आहे. परंतु संन्यासाश्रमावाचूनही गृहस्थाश्रमातील कर्मयोग आचरीत असताना भक्तियोग व ज्ञानयोग यांचे सहकार्य घेऊन आत्मसाक्षात्कार होतो व मोक्षाची प्राप्ती होते, असेही शंकराचार्यांनी भगवद्‌गीतेवरील भाष्यात म्हटले आहे.





fly