शुक्रवार, 13 जून 2025

cool and lesser-known tech and everyday-use facts

 

Here are some cool and lesser-known tech and everyday-use facts in the same style:


  1. You can use both plus (+) and dots (.) in Gmail addresses, and they won't change the email address's function.
    e.g., jane.doe@gmail.com, janedoe@gmail.com, and jane.doe+news@gmail.com all go to the same inbox.


  1. Typing “cmd” in the address bar of a File Explorer window on Windows opens Command Prompt at that location.
    Quick way to run commands in a specific folder.


  1. In Google Sheets, you can press Ctrl + / to instantly open the list of keyboard shortcuts.
    Super handy for speeding up your work.


  1. In Excel, double-clicking the fill handle (small square at bottom-right of a cell) auto-fills the column based on adjacent data.
    Saves tons of time when copying formulas down.


  1. On Mac, pressing Command + Shift + 4 lets you take a selective screenshot.
    You can drag to capture only part of the screen.


  1. In Chrome, if you accidentally close a tab, pressing Ctrl + Shift + T (Cmd + Shift + T on Mac) reopens it.
    It even works for multiple recently closed tabs.


  1. You can mute a WhatsApp group or chat forever by selecting "Mute" → "Always."
    No more constant pings from noisy groups.


  1. On YouTube, adding &t=1m30s to a video URL starts it at 1 minute and 30 seconds.
    e.g., https://youtube.com/videoID&t=1m30s

    1. In Gmail, adding "+label" to your email address lets you filter emails easily.
      e.g., johndoe+shopping@gmail.com can be filtered using "To: johndoe+shopping@gmail.com"


    1. Holding down the spacebar on your phone's keyboard (iOS/Android) turns it into a trackpad.
      Great for moving the cursor precisely when editing text.


    1. In Google Docs, typing @ gives you quick access to people, files, templates, and building blocks.
      Try @meeting notes to insert a pre-built notes template instantly.


    1. Pressing Windows + V on Windows opens your clipboard history — but you need to enable it first.
      Great for copying multiple items and pasting selectively.


    1. You can use your phone's camera to scan documents straight from the Google Drive app.
      Tap the "+" → "Scan" to turn papers into PDFs instantly.


    1. In Excel, using Ctrl + ; inserts today’s date, and Ctrl + Shift + ; inserts the current time.
      Quick way to timestamp entries.


    1. On iPhones, you can tap the back of the phone (Back Tap) to perform actions like taking a screenshot.
      Enable via Settings → Accessibility → Touch → Back Tap.


    1. In Google Chrome, pinning a tab (right-click → "Pin") keeps it open and moves it to the left.
      Perfect for frequently used tools like email or dashboards.

गुरुवार, 2 जनवरी 2025

कोकण रिसॉर्ट्स होम स्टे यादी...

 कोकण रिसॉर्ट्स होम स्टे यादी...

आपल्या मित्र परिवारांसाठी कोकणातील रिसॉर्टची यादी देत आहोत.

 

🏝️ अलिबाग

१) कौस्तुभ ताम्हणकर :- 9819745393

२) वनिता कुलकर्णी :- 9702158058

३) शीतल खारवले :- वेदांत हॉलिडे :-  9923788282 / 9011788282

४) रजनी कर्वे, नंदनवन हॉलिडे होम, किहीम, अलिबाग :- 9822609417 / 7798585540


🏝️ नागाव

१) प्रवीण वैद्य :- नागावची वाडी रिसॉर्ट :- 9819174018

२) सौरभ आपटे :- 9921168899

३) धनश्री नायर :- 9986801367


🏝️ दिवे आगर

१) प्रदीप सहत्रबुद्धे :- 9421167220

२) पराग जोशी,आनंद सागर रिसॉर्ट :- 9822280896


🏝️ हरीहरेश्वर

१) भक्त निवास :- मंदार बेडकर :- 9545252964

२) उदय घाणेकर :- 9260496280 / 7820862932


🏝️ दापोली

१) निता बिवलकर :- केळशी :- 9604790349 / 9604790361

२) अमित कुंटे,आर्यन बीच रिसॉर्ट्स :- कर्दे:- 9011656792

३) मंदार आघरकर, लवीश व्हीला रिसॉर्ट :- कोळथरे :- 9850722083

४) अजिंक्य वैद्य :- कोळथरे :- 7620186884

५) सुदीप वैद्य :- कोळथरे :- 9371011187

६) योगेश आघरकर, कोकण मेवा रिसॉर्ट :- कोळथरे :- 9867640677, 9890589699

७) अभिजित परांजपे,अतिथी रिसॉर्ट्स :-  जालगाव :-  7264889511

८) अमेय कर्वे,गोकुळधाम रिसॉर्ट, गिम्हवणे :- 7249750512

९) मनीषा ओक,बहर होम स्टे :- 8390739521

१०) प्रशांत परांजपे ,आम्रपाली रिसॉर्ट :- जालगाव :- 9561142078

११) मयुरेश पुरोहित,बंगली रिसॉर्ट,लाडघर :- 9766951970

१२) प्रियांका दाबके,मँगो इन,जालगाव :- 7057878198

१३) सुचित्रा फडके :- फडके हाऊस :- 9372454576

१४) आनंद भावे :- गारवा बीच रिसॉर्ट , कोळथरे, दापोली :- 97640655810 / 8390921227 


🏝️ गुहागर

१) शार्दूल भावे :- योगेश्वरी :- 7507514966

२) केदार खरे :- 9689666612


🏝️ वेळणेश्वर

१) विक्रांत गोखले :- कल्पतरू :- 9822576575 / 9823527689


🏝️ गणपती पुळे

१) प्रमोद केळकर, केळकर लॉज :- 9422430782


🏝️ रत्नागिरी

१) सुहास ठाकुरदेसाई :- 9822290859


🏝️ देवगड

१) प्रसाद पाटणकर,राजहंस लॉज :-9420738273

शनिवार, 2 नवंबर 2024

💥दिवाळीच्या फराळामागील आहारशास्त्र 💥

 💥दिवाळीच्या फराळामागील आहारशास्त्र ठाऊक आहे का 💥?


नुसते दिवाळीचे पदार्थ बनवून दिवाळी साजरी करण्यापेक्षा तिचे शास्त्रीय महत्त्व, वेगवेगळे पारंपरिक पदार्थ, त्या बनविण्याच्या पद्धती, खाण्याच्या पद्धती तसेच त्या प्रथम कोणी बनविल्या याचा शोध घेऊन या दिवाळीत आपल्या मुलांना आपल्या परंपरांबद्दल माहिती दिल्यास त्यांनाही याचा अभिमान वाटायला लागेल व ते खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करतील. मग पाहा ‘हॅपी दिवाली’ ची कशी ‘शुभ दीपावली’ होतेय ते !


गावी सगळीकडे दिवाळीचे फराळ बनविण्याची गडबड चालू होती. सगळे जण आपापल्या कामात व्यग्र होते. सर्वाना प्रश्न विचारून विचारून अगदी भंडावून सोडले होते. शंकरपाळीचा आकार असाच कसा ? करंज्या अशा कशा दिसतात ? लाडू गोलच का करतात ? प्रत्येक फराळाचा आकार वेगवेगळा का असतो ? आणि त्या छोटा भीमला जो लाडू आवडतो तो हाच का ? या प्रश्नांचे उत्तर मात्र कोणाकडेच नव्हते. आज्जीची प्रकर्षांने आठवण येत होती. ती असती तर तिने सांगितलं असतं सगळं. पण या आताच्या नवीन पिढीच्या ‘मम्मी’ ला पण हे माहीत नाहीये. त्यात छोटा भीमने तर लहान मुलांवर वेगळीच छाप टाकली आहे. त्यामुळे भीम नक्की कोण होता हे आपल्यालाही माहिती करून घेतलं पाहिजे. कारण नुसते दिवाळीचे पदार्थ बनवून दिवाळी साजरी करण्यापेक्षा तिचे शास्त्रीय महत्त्व, वेगवेगळे पारंपरिक पदार्थ, त्या बनविण्याच्या, खाण्याच्या पद्धती तसेच त्या प्रथम कोणी बनविल्या याचे शोध घेऊन या दिवाळीत आपल्या मुलांना आपल्या परंपरांबद्दल माहिती दिल्यास त्यांनाही याचा अभिमान वाटायला लागेल व ते खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करतील. मग पाहा ‘हॅपी दिवाली’ ची कशी ‘शुभ दीपावली’ होतेय ते.


असो, तर भीम हा ‘पौरोगव बल्लव’ या नावाने राजा विराटाच्या सेवेत एक वर्ष पाकशास्त्रज्ञ म्हणून राहिला. ‘पौरोगवो बृवानो अहम बल्लावो नाम नामत:। ..  महाभारत/विराट पर्व/ २/१-१०. भीमाला पाकशास्त्र चांगले येत होते. महाभारतात खूप ठिकाणी याचे वर्णनदेखील मिळते. बल्लव म्हणजे पाकशास्त्रज्ञ. पांडव वनवासात असताना जेव्हा श्रीकृष्ण त्यांना भेटायला आले, तेव्हा भीमाने त्यांच्यासाठी खास एक नवीन प्रकारचा गोड पदार्थ तयार केला होता. तो खाल्ल्यावर श्रीकृष्णाने मोठय़ा आनंदाने भीमाचे कौतुक केले होते. व त्या पदार्थाचे नाव ‘रसाला’ असे ठेवले. तर हे ‘रसाला’ म्हणजेच आताचे श्रीखंड. म्हणजेच श्रीखंडाचा प्रथम निर्माता भीम आहे व त्याने तो खास श्रीकृष्णासाठी बनविला.


आपल्याला आपल्या प्राचीन आहारीय शास्त्राची माहिती करून देणाऱ्या ‘क्षेमकुतूहल’, ‘भोजन कुतूहल’, ‘पाकदर्पण’ अशा प्राचीन व सध्याच्या युगातील अगदी नुकत्याच प्रकाशित झालेल्या सूद्शास्त्र वर्णन केलेल्या ग्रंथांमध्ये आपल्याला याची अधिक माहिती मिळते. पूर्वीच्या काळी ‘पूपलिका’ म्हणजे पुरी, ‘पूपा’ म्हणजे छोटे वडे, ‘ईण्डरिका’ म्हणजे इडली, ‘घारिका’ म्हणजे डोसा, ‘कुंडलिका’ म्हणजे जिलेबी, ‘किलाट’ म्हणजे पनीर, ‘लाप्सिका’ म्हणजे हलवा आणि ‘चणक रोटिका’ म्हणजे हरभरा डाळीपासून बनवलेली रोटी अर्थात पुरणपोळी, ‘हिमाहवा’ म्हणजे बर्फी, ‘पिंडक’ म्हणजे पेढा व ‘लड्डूक’ म्हणजे लाडू असे सध्याच्या प्रचलित पदार्थाचे जुने संदर्भ व बनविण्याच्या पद्धतीचे वर्णन मिळते. त्याचबरोबर त्यासाठी लागणारी साधनसामुग्री, त्यांचा आपल्यावर होणारा परिणाम, त्याचे फायदे-तोटे, प्रत्येक पदार्थ खाण्याचे प्रमाण याबद्दल विस्तृत माहिती मिळते. गरज आहे ती फक्त आयुर्वेदीय सिद्धांत व आहारशास्त्रातील वर्णन केलेले पदार्थ यांची सांगड घालून त्यांचे कालानुरूप व प्रकृतीनुरूप सेवन करण्याची.


आपण दिवाळीत केलेल्या पदार्थानी युक्त भोजनाला ‘पंचपक्वान्नांचे भोजन’ असे म्हणतो. पैकी यातील पंच- पक्व -अन्न म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पाच महाभूतांपासून बनलेले भोजन. या प्रत्येक महाभूतांचा आकार ग्रंथात वर्णन केलेला आहे. जसे की ‘पृथ्वी’ महाभूत हे स्थिर असल्या कारणाने चौकोनी सांगितले आहे. ‘जल आणि आकाश’ मात्र गोल सांगितले असून ‘अग्नी’ चा आकार त्रिकोणी व वायूचा आकार अर्ध चंद्राकृती सांगितला आहे. आपल्या दिवाळीतील लाडू गोल, करंज्या अर्धचंद्राकृती, शंकरपाळ्या कधी त्रिकोणी कधी चौकोनी केलेल्या पाहायला मिळतात. या प्रत्येकाच्या मागे काही तरी गमक आहे. हे उगीचच नक्की आले नाही. या सर्व पंचमहाभूतांची आपल्याला आठवण राहावी, पुढच्या पिढीला त्याची माहिती मिळावी म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने ती आपल्या परंपरांमध्ये जतन करून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.


आपल्या आहारातील सहा रस म्हणजे षड्रससुद्धा याच पाच महाभूतांपासून बनलेले असतात. यापैकी पृथ्वी आणि आप महाभूतापासून मधुर रस बनतो. पृथ्वी आणि तेज महाभूतापासून आम्ल रस बनतो. अग्नी व जल महाभूतापासून लवण रस म्हणजे खारट. आकाश व वायूपासून कडू. अग्नी व वायूपासून तिखट आणि पृथ्वी व वायूपासून तुरट रसाची निर्मिती होते, असे आयुर्वेद शास्त्राचे मत आहे. या सहा रसांच्या संतुलित सेवनामुळे आपल्या शरीराचे पोषण होत असते.


गंमत पाहा, आपल्या परंपरेत या सर्वाना महत्त्वाचे स्थान आहे. आपण दिवाळीमध्ये बनवीत असलेल्या प्रत्येक पदार्थाचा आकार व चव, त्यात वापरली जाणारी घटकद्रव्ये वेगवेगळी असतात. तसेच त्या प्रत्येक पदार्थाची अवस्थासुद्धा वेगवेगळी असते. थोडक्यात, या प्रत्येक पदार्थाच्या निर्मितीमागे हे पंच महाभूतांचे शास्त्र दडलेले असते. त्यांच्या कमी-अधिक संयोगानेच पदार्थ, त्यांचा आकार, त्यांची चव व टिकाऊपणा ठरलेला असतो. या पंचमहाभूतांमुळेच आपल्याला त्या पदार्थाचे पंच ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने ज्ञान होत असते. म्हणून तर पृथ्वी महाभूत त्या पदार्थातील गंध ठरवीत असते. आप महाभूत त्या पदार्थाची चव ठरवत असते, तेज महाभूत त्या पदार्थाचे रूप म्हणजे दिसणे ठरवत असते तर वायू महाभूत त्या पदार्थाचा स्पर्श ठरवत असते. तो पदार्थ खाताना येणारा विशिष्ट आवाज हा त्या पदार्थातील आकाश महाभूतांमुळे येत असते. कारण आकाश महाभूत त्या पदार्थातील शब्द व्यक्त करत असतो. म्हणून आपल्याला वेगवेगळ्या कारणांमुळे एखादा पदार्थ आवडत असतो. कोणाला भज्याचा वास आवडतो, कोणाला जिलेबीची चव आवडते, कोणाला शेव, चकलीचा कुरकुरीतपणा व खातानाचा आवाज आवडत असतो तर कोणाला स्पर्शाला अनारसे व दिसायला करंज्या आवडत असतात. त्यामुळे या पाचही महाभूतांचे त्या एकाच पदार्थातील उत्तम संतुलन हे प्रत्येकालाच त्या पदार्थाच्या मोहात पाडते. हीच त्या सुगरणीची खरी कसरत असते.


दिवाळीच्या प्रत्येक पदार्थाचा रंग-रूप, आकार, चव, स्पर्श व आवाज वेगवेगळा आहे. म्हणून आपल्या पाचही ज्ञानेंद्रियांना आनंद देणारी अशी दिवाळी आपल्याला इतर सणांपेक्षा जास्त आवडते. कारण यात प्रत्येकाच्या प्रत्येक आवडीनिवडीची काळजी घेतली आहे.


बहुतांशी दिवाळीच्या फराळातील पदार्थ हे पार्थिव, आकाशीय व वायुवीय तत्त्वाचे असतात. त्यांच्यावर अग्नी व जल तत्त्वाचा संस्कार झालेला असतो. जसे की काही पदार्थ तेज व जल तत्त्व प्रधान अशा उष्ण तेलात तळलेले असणे. यामुळे त्या पदार्थावर या दोन महाभूतांचे संस्कार होतात. संस्कारांमुळेच त्या पदार्थात गुणपरिवर्तन होते. टणक पदार्थ मऊ  होतात तर मऊ पदार्थ टणक होतात. म्हणून तर लाडू, करंज्या, शंकरपाळ्या, कापण्या, चिरोटे, शेव, चिरमुरे, अनारसे, चकल्या या प्रत्येकाचे पांचभौतिकत्व वेगवेगळे असते. त्यामुळे लाडू टणक असतात. करंज्या पटकन फुटतात. शंकरपाळ्या, चिरोटे मऊ  असतात. शेव, चकल्या कुरकुरीत असतात. तर गुलाबजामून, रसगुल्ले जल महाभूत युक्त पार्थिव असतात. काही मधुर रसाचे गोड, काही तिखट तर काही आंबटगोड असतात. या प्रत्येक पदार्थाचे एक विशिष्ट पांचभौतिक संघटन असते. म्हणून तर प्रत्येक पदार्थ बनविताना ठरलेल्या प्रमाणातच घ्यावा लागतो, त्यास पाणी, अग्नीसुद्धा ठरल्याप्रमाणेच द्यावा लागतो नाही तर त्या पदार्थाचे पांचभौतिक संघटन बिघडते व पदार्थ बिघडतो.


लाडू…

उदाहरणार्थ आपण लाडूचे पांचभौतिक महत्त्व जाणून घेऊ. लाडू हा पृथ्वी आणि आप महाभूत प्रधान असा पदार्थ आहे. त्यामुळे तो अत्यंत पौष्टिक व बलवर्धक आहे. लाडूचे प्रकार जरी अगणित असले तरी त्याचा आकार मात्र गोलच असतो. पृथ्वीसारखा स्थिर व आप महाभूतासारखा गोल आकार धारण करतो. मुळात पृथ्वीसारख्या त्याच्या दीर्घकाळ टिकण्याच्या गुणामुळे लाडू करण्याची पद्धत निर्माण झाली असावी. पूर्वीच्या काळी प्रवास मोठे असत. वाटेत आताच्यासारखी हॉटेल नसत. म्हणून खूप दिवस टिकणारा व प्रवासात नेता येणारा, सर्व लहान मुलांना आवडणारा, खाताना हात खराब न होणारा, कुठेही, केव्हाही, कधीही सहज खाता येणारा आणि यासोबत खाण्यासाठी कशाचीही गरज नसणारा, स्वादिष्ट व गोड असल्याकारणाने पटकन तरतरी आणून देणारा, खाताच पोट भरलेल्याची जाणीव करून देणारा, असा हा मजेशीर पदार्थ म्हणजे लाडू. लाडूचे प्रकारही असंख्य आहेत. विविध डाळी, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी यांपासून विविध प्रकारचे लाडू बनविता येतात. बदाम, काजू, मनुके यांमुळे लाडू अधिकच पौष्टिकहोतात. तुपामुळे त्यांमध्ये स्निग्धपणा आलेला असतो. आपल्याकडे रव्याचे लाडू, हरभरा डाळीचे लाडू, बेसनाची जाड शेव तयार करून तिचे तुकडे गुळाच्या पाकात पाडून तयार केलेले शेवकांडीचे लाडू, फक्त चुरमुरे व गुळाचा पाक यांपासून बनविलेले लाडू असे अनेक प्रकार आहेत. मधुमेहाचे रुग्ण सोडले तर बाकी सर्वाना विशेषत: लहान मुलांना तर पोषक असा दिवाळीचा एक परिपूर्ण आहारीय पदार्थ म्हणजे लाडू. यापैकी दिवाळीत फारसा न केला जाणारा मात्र लहान मुलांसाठी अत्यंत वृष्य, बलदायक व पौष्टिक असा लाडू म्हणजे फक्त खजूर व गुलकंद वापरून तूप लावून केलेला लाडू. ज्यांनी केला नसेल त्यांनी या दिवाळीत हा आवर्जून करावा. मुले फार खूश होतात. तसेच गुलकंद पित्तशामक असल्याने याने फार उष्णताही वाढत नाही. मुलांना चॉकलेटपेक्षा हाच लाडू जास्त आवडतो. तसेच स्त्रियांनी या दिवाळीत हटकून ठरवून स्वत:साठीसुद्धा एक आयुर्वेदिक केश्य लाडू बनवावा. आळीव, खोबरे, तीळ, बडिशोप, बाळंतशोप, डिंक, गोडंबी, बदाम, तूप, गूळ यांपासून बनविलेला हा लाडू उत्तम केश्यवर्धक, हाडांना बळकटी देणारा, केसांची वाढ करणारा व केसांना प्राकृत कृष्ण वर्ण प्रदान करणारा आहे.


करंजी.

आता आपण करंजीबद्दल थोडी माहिती जाणून घेऊ. करंज या वृक्षाच्या बिया या करंजीप्रमाणे दिसतात. म्हणून यास करंजी असे म्हणतात. करंजी ही अर्धचंद्राकृती असते. अर्थातच वायू महाभूताचे अधिक्य यामध्ये असते. म्हणून करंजी जेवढी वायूने अधिक भरलेली असेल तेवढी छान लागते. दिसायलाही भरलेली खुसखुशीत कारंजी छान दिसते. म्हणून करंजी बनविताना याची काळजी घ्यावी लागते.


चकली.

वर्तुळाकृती व अर्धचंद्राकृती आणखी एक पदार्थ म्हणजे चकली. यामध्ये आकाश व वायू महाभूताचे आधिक्य असते. म्हणूनच ती त्या त्या महाभूताचा आकारही धारण करताना दिसतात. यामध्ये आपण जेवढे तिखट मिसळू तेवढे त्याचे तेज तत्त्व वाढते. त्याचबरोबर तिच्यावर अग्निसंस्कार किती झाला आहे यावरून चकलीचे रूप ठरते. म्हणून चकलीची भाजणी उत्तम व्हावी लागते. तसेच ती तळणे हे सुद्धा एक अत्यंत कौशल्याचे काम आहे. चकली कमी तापलेल्या तेलात टाकली तर तिचे महाभूत संघटन बिघडते व ती मऊ  होते. तिचा बाहेरील भाग कडक होत नाही. म्हणून योग्य प्रमाणात तापलेल्या तेलातच चकली तळली तर तिच्यातील संघटन उत्तम बनते व चकली कडक व खुसखुशीत बनते. यावरून आपल्याला एखाद्या पदार्थाच्या निर्मितीतील पंचमहाभूतांचे महत्त्व चटकन समजते.


चिवडा.

तिखट पदार्थामधला आपल्या सर्वाचा आवडता आणि आकाश व वायू पंचमहाभूत प्रदान असा आणखी एक पदार्थ म्हणजे चिवडा. बहुतेक घरांमध्ये पातळ पोहय़ांचा चिवडा बनविला जातो. पोहे हा शब्दच मुळी ‘पृथु’ या शब्दापासून निर्माण झाला आहे. लाह्यांना चपटे केले, पृथु केले की त्यास पोहे असे म्हणतात. त्यामुळे काही ठिकाणी लाह्यांना चिवडा केला जातो तर काही ठिकाणी त्याच लाह्यांपासून  बनविलेल्या पोह्यांचा चिवडा केला जातो. लाह्यांमधील  आकाश महाभूत काढून टाकले व त्यास ‘पृथु’ करून त्यातील पर्यायाने अल्प पृथ्वी महाभूत वाढवले की झाले पोहे. मात्र या पोह्यांमध्ये भरपूर प्रमाणात छिद्रे असल्याने यात वायू पंचमहाभूताधिक्य हे असतेच. म्हणून पोहे, भेळ, लाह्या असे पदार्थ खाल्ले की आपला वात वाढतो. असो. म्हणून पोहे नुसतेच जर कढईत भाजायला घेतले तर उष्णता जास्त असल्याने पोह्यांमध्ये जागा व्यापलेल्या हवेचे प्रसरण होऊन ती बाहेर निघून जाते व पोहे आक्रसतात. म्हणून पातळ पोह्यांचा चिवडा करताना ते आधी भाजू नयेत. फोडणी झाल्यावर त्यावर पोहे टाकून परतले की तेलाचे सूक्ष्म आवरण त्या पोह्यांवर चढते. हवेची जागा तेलाचे सूक्ष्म रेणू घेतात. म्हणून पोहे अशा प्रकारे परतले की आक्रसत नाहीत. मंद विस्तवावर परतले की त्यातील अंगभूत पाण्याचा अंश निघून जातो. त्यामुळे तेलाचे रेणू आतपर्यंत जाऊ  शकतात आणि पोहे कुरकुरीत होतात. दगडी पोह्यांसारखे  जाड पोहे असल्यास ते तेलात तळून त्यापासून चिवडा तयार करतात. तसेच काही ठिकाणी भाजक्या पोह्यांचाही चिवडा करतात. ते आधीच भाजके असल्याने कुरकुरीतच असतात. त्यामुळे ते तळावे लागत नाहीत किंवा जास्त भाजावेही लागत नाहीत. तर थोडक्यात हा सर्व खेळ त्या पोह्यांमध्ये दडलेल्या आकाश आणि वायू महाभूताचा आहे. त्यावर अग्नी महाभूताचा आपण संस्कार करतो व त्यास अधिकच रुचकर बनवतो.


अनारसे.

अनारसे बनवताना मात्र जल महाभूताच्या संतुलनाला  महत्त्व असते. म्हणून अनारशासाठी तांदूळ तीन दिवस भिजवून मगच कुटले जाते. तीन दिवस भिजल्याने त्यामध्ये आंबवण्याची क्रिया आधीच झालेली असते. त्यामुळे त्या पिठात वायू महाभूतही वाढलेला असतो. अर्थात या ठिकाणी हा वायू महाभूत म्हणजे आंबविण्याच्या क्रियेत तयार झालेला कार्बन डायॉक्साइड. त्यामुळे अनारसा तुपात टाकला की वायू व अंगीभूत पाण्याची वाफ बाहेर येऊ  लागते. म्हणून अनारशावर तूप उडवीत राहिले की त्या छिद्रांमधून ते आतपर्यंत जाऊ  शकते आणि अनारशाला जाळी पडते. उष्ण तत्व योग्य प्रमाणात मिळाल्यास त्यास छान सोनेरी रंगही प्राप्त होतो.


अशा प्रकारे आपल्याकडे दिवाळीच्या फराळामध्ये बनणाऱ्या प्रत्येक पदार्थामागे काही तरी शास्त्र दडलेले आहे. एवढेच नव्हे तर आपल्याकडे प्रत्येक सणाला बहुतांशी वेगवेगळा पदार्थ वर्णन केला आहे. त्यामुळे संक्रांत, दिवाळी, दसरा, कोजागरी, नवरात्र, श्रावण या प्रत्येक काळात आहारीय पदार्थ वेगवेगळे सांगितले आहेत. आपण मात्र एकसाखेच वागून किंवा त्यांचे चुकीचे अनुसरण करून आजार वाढवून घेतो. दिवाळीच्या काळात निसर्ग आपल्याला बल द्यायला सुरुवात करतो. बाहेर थंडी सुरू झालेली असते. त्यामुळे त्वचेवरील रोम रंध्रे बंद होऊ  लागतात व अग्नी शरीरात कोंडला गेल्याने तो अधिकच वाढू लागतो. त्यामुळे आपल्याला भूक जास्त लागते. म्हणून ही भूक भागविण्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवून हा सण साजरा केला जातो. म्हणून प्रत्येकाने आपापल्या पचनशक्तीचा अंदाज घेऊन स्वत:च्या शरीराचे पंचभौतिक संघटन ओळखून दिवाळीतील पदार्थाचा आनंद घ्यावा.

शनिवार, 27 अप्रैल 2024

नामांकित 40 नाटकं

 सर्व नामांकित 40 नाटकं पाठवत आहे. रोज एक नाटक पहा. भरभरून आनंद लुटा आणि आपल्या मराठी भाषेला समृद्ध करा...


* सुंदर मी होणार

https://youtu.be/L0BD4s5FQgM


* हसवा फसवी

https://youtu.be/v4-MqXYJq6o


* बटाट्याची चाळ

https://youtu.be/5i1xaSZeyOM


* श्रीमंत दामोदर पंत

https://youtu.be/U7350LnlKCk


* शांतता ! कोर्ट चालु आहे

https://youtu.be/QG_Pi051qao


* नटसम्राट

https://youtu.be/yTFPT7-v-Ws


* ती फुलराणी

https://youtu.be/PLHfek5SO_Q


* तो मी नव्हेच

https://youtu.be/8TAToq08YuQ


* पती सगळे उचापती

https://youtu.be/6IZXCmrE09s


* मोरुची मावशी

https://youtu.be/eCOeRK9N7QM


* एका लग्नाची गोष्ट

https://youtu.be/JZl_zwm_IPI


* गेला माधव कुणीकडे

https://youtu.be/1gEZ0WePqV4


* तुझे आहे तुजपाशी

https://youtu.be/sTZGYKAWc_4


* असा मी असामी

https://youtu.be/S38SOv4f95w


* शांतेच कार्ट चालु आहे

https://youtu.be/twOnQ3JCTxE


* श्री तशी सौ

https://youtu.be/N4pwOnoY7zY


* वासु ची सासू

https://youtu.be/-m3iruEQoJE


* अखेरचा सवाल

https://youtu.be/DmuCU9Y33sg


* शूऽऽऽ.. कुठं बोलायचं नाही

Part 1 - https://youtu.be/07R2IFyyJ9E

Part 2 - https://youtu.be/GsOOVwUmqx8


* चल कहितरीच काय

https://youtu.be/blOdn2nbDgw


* चार दिवस प्रेमाचे

https://youtu.be/PD-mBpCvTAw


* मी नथुराम गोडसे बोलतोय

https://youtu.be/PD-mBpCvTAw


* कुर्यात सदा टिंगलम

https://youtu.be/LHBWfTRQvvo


* तुझ्या माझ्यात

https://youtu.be/94YChmH9GYo


* खर सांगायच तर

https://youtu.be/uMJ9gA2TFrM


* सखाराम बाईंडर

https://youtu.be/NIMIgL-OLXc


* कुसूम मनोहर लेले

https://youtu.be/2AH8SgZ2qSI


* अशी पाखरे येती

https://youtu.be/kqo2tjug3AU


* सेलीब्रेशन

https://youtu.be/dR6r75iUGXE


* अप्पा आणी बाप्पा

https://youtu.be/2z4ndcpOLJU


* कार्टि काळजात घुसली

https://youtu.be/p_FgFnDnFGc


* बॅरिसटर

https://youtu.be/ZW73zW21eXQ


* मित्र

https://youtu.be/tKpPpGWJTzw


* अश्रूंची झाली फुले

https://youtu.be/5HZYa1s1OXo


* डाॅक्टर तुम्हीसुद्धा

https://youtu.be/SVY0mq7FO1Y


* डबल गेम

https://youtu.be/v3EFucCuMdM


* सूर राहु दे

https://youtu.be/ZeT8mqNDkss


* गोड गुलाबी

https://youtu.be/XZ5pC8x8nQY


* अधांतर

https://youtu.be/ECwRnB8n2z4


* नातीगोती

https://youtu.be/F7dlUMpA5JU

शुक्रवार, 22 दिसंबर 2023

15 free resources to escape the Leetcode hell:

 15. Grooking the coding interview with 20 patterns: https://lnkd.in/dSGhifeu

14. Tech interview handbook to learn the whole process with tips and tricks: https://lnkd.in/d3fpt-T2

13. A better way to prepare for coding interviews: https://neetcode.io/

12. All graphs algorithms in 1 place: https://lnkd.in/dc5djrQG

11. Grind 75 - your minimal roadmap to succeeding coding interviews: https://www.grind75.com/

10. Dynamic programming lectures: https://lnkd.in/dXkY42cD

9. Comprehensive Data Structure and Algorithm Study Guide: https://lnkd.in/djuheyPY

8. Demystifying DP in simple visuals: https://lnkd.in/dzpRmD3b

7. How to approach difficult DP problems: https://lnkd.in/d5NuaVYU

6. How to effectively use LeetCode to prepare for interviews: https://lnkd.in/dx2Txs3F

5. The tech interview cheatsheet: https://lnkd.in/dPHyTxzh

4. Cracking the coding interview: https://lnkd.in/djh-RA6S

3. Dynamic programming for beginners: https://lnkd.in/dN674ErF

2. GreatFrontend to practice frontend interviews like never before: https://lnkd.in/dEGV-ZfV

1. Backtracking 101: https://lnkd.in/dJ6gi8vx

गुरुवार, 21 दिसंबर 2023

🚩तीन लोक १४ भुवन वर्णन :-🚩

 🚩तीन लोक १४ भुवन वर्णन :-🚩

 

🚩विष्णुपुराण के अनुसार लोकों या भुवनों की संख्या १४ है। इनमें से ७ लोकों को ऊर्ध्वलोक व ७ को अधोलोक कहा गया है। यहाँ ७ ऊर्ध्वलोकों का विवरण निम्न है।


१) 🚩भूलोक :- वह लोक जहाँ मनुष्य पैरों से या जहाज, नौका आदि से जा सकता है। अर्थात  हमारी पूरी पृथ्वी भूलोक के अन्तर्गत है।


२) 🚩भुवर्लोक :- पृथ्वी से लेकर सूर्य तक अन्तरिक्ष में जो क्षेत्र है वह भुवर्लोक कहा गया है और यहाँ उसमें अन्तरिक्षवासी देवता निवास करते हैं।


३) 🚩स्वर्लोक :- सूर्य से लेकर ध्रुवमण्डल तक जो प्रदेश है उसे स्वर्लोक कहा गया है और इस क्षेत्र में इन्द्र आदि स्वर्गवासी देवता निवास करते हैं।


पूर्वोक्त तीन लोकों को ही त्रिलोकी या त्रिभुवन कहा गया है और इन्द्र आदि देवताओं का अधिकारक्षेत्र इन्हीं लोकों तक सीमित है।


४) 🚩महर्लोक :- यह लोक ध्रुव से १ करोड़ योजन दूर है। यहाँ भृगु आदि सिद्धगण निवास करते हैं।


५) 🚩जनलोक :- यह लोक महर्लोक से २ करोड़ योजन ऊपर है और यहाँ सनकादिक आदि ऋषि निवास करते हैं।


६) 🚩तपलोक :- यह लोक जनलोक से ८ करोड़ योजन दूर है और यहाँ वैराज नाम के देवता निवास करते हैं।


७) 🚩सत्यलोक :- यह लोक तपलोक से १२ करोड़ योजन ऊपर है और यहाँ ब्रह्मा निवास करते हैं अतः इसे ब्रह्मलोक भी कहते हैं और सर्वोच्च श्रेणी के ऋषि मुनि यहीं निवास करते हैं।


🚩जैसा कि विष्णु पुराण में कहा गया है नीचे के तीनों लोकों का स्वरूप उस तरह से चिरकालिक नहीं है यहाँ जिस तरह से ऊपर के लोकों का है और वे प्रलयकाल में नष्ट हो जाते हैं जबकि ऊपर के तीनों लोक इससे अप्रभावित रहते हैं।


🚩अतः भूलोक, भुवर्लोक और स्वर्लोक को ‘कृतक लोक’ कहा गया है और जनलोक, तपलोक और सत्यलोक को ‘अकृतक लोक’। महर्लोक प्रलयकाल के दौरान नष्ट तो नहीं होता पर रहने के अयोग्य हो जाता है अतः वहाँ के निवासी जनलोक चले जाते हैं। यहां इस कारण महर्लोक को ‘कृतकाकृतक’ कहा गया है।


🚩यहाँ जिस तरह से ऊर्ध्वलोक हैं और उसी तरह से ७ अधोलोक भी हैं जिन्हें पाताल कहा गया है। यहाँ इन ७ पाताल लोकों के नाम निम्न हैं।


१) 🚩अतल :- यह हमारी पृथ्वी से १० हजार योजन की गहराई पर है और इसकी भूमि शुक्ल यानी सफेद है।


२) 🚩वितल :- यह अतल से भी १० हजार योजन नीचे है और इसकी भूमि कृष्ण यानी काली है।


३) 🚩नितल :- यह वितल से भी १० हजार योजन नीचे है और इसकी भूमि अरुण यानी प्रातः कालीन सूर्य के रङ्ग की है।


४) 🚩गभस्तिमान :- यह नितल से भी १० हजार योजन नीचे है और इसकी भूमि पीत यानी पीली है।


५) 🚩महातल :- गभस्तिमान से यह १० हजार योजन नीचे है और इसकी भूमि शर्करामयी यानी कँकरीली है।


६) 🚩सुतल :- यह गभस्तिमान से १० हजार योजन नीचे है और इसकी भूमि शैली अर्थात पथरीली बतायी गयी है।


७) 🚩पाताल :- यह सुतल से भी १० हजार योजन नीचे है और इसकी भूमि सुवर्णमयी यानी स्वर्ण निर्मित है।


🚩इन सात अधोलोकों में दैत्य, दानव और नाग निवास करते हैं।


🚩हम यह कह सकते हैं कि अन्ततोगत्वा हर लोक भगवान् के अधीन है। यहां (हर ईश्वरवादी ऐसा ही मानेगा।) फिर भी हम अलग अलग लोकों की प्रकृति को देखें तो यह माननें को बाध्य होगें कि जिस प्रकार हमारे लोक में कई राज्य है और उनकी शासनपद्धति भिन्न है और यहां शासक भी भिन्न हैं उसी प्रकार से अन्य लोकों में भी यही बात है।


🚩पाताललोकों के वर्णन से प्रकट होता है कि उसमें दैत्यों, दानवों और नागों के बहुत से नगर हैं और यहां इसी प्रकार से स्वर्ग में भी इन्द्र, वरुण, चन्द्रमा आदि के नगर हैं। ऊपर के लोक महर्लोक जनलोक, तपलोक और सत्यलोक के निवासी इतने उन्नत हैं कि वहाँ किसी सत्ता की आवश्यकता ही नहीं है।


🚩जय श्री हरि विष्णु भगवान की जय 🚩


!! हर हर महादेव!!

रविवार, 22 अक्टूबर 2023

कुलदेवी चा कुलाचार🔸

 कुलदेवी चा कुलाचार🔸


खण-नारळाने देवीची ओटी भरणे, हा देवीच्या दर्शनाच्या वेळी करावयाचा एक प्रमुख उपचार आहे... हा उपचार शास्त्र समजून अन् भावपूर्ण केला, तर त्याचा आध्यात्मिक लाभ अधिक प्रमाणात भाविकाला होतो. पुढील ज्ञान (माहिती) वाचून देवीची ओटी योग्यरित्या भरून पूजकांनी देवीची कृपा संपादन करावी.... !


१. देवीची ओटी भरण्याचे महत्त्व काय ..?


देवीपूजनाची सांगता देवीची ओटी भरून (खण आणि साडी अर्पण करून) करणे, म्हणजे देवीच्या निर्गुण तत्त्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे वा कल्याणाचे कार्य करण्यासाठी सगुणात येण्यास आवाहन करणे होय... देवीला खण आणि साडी अर्पण करतांना देवीला प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रार्थना केल्याने त्या आधी केलेल्या पंचोपचार विधीतून कार्यरत झालेल्या देवीच्या निर्गुण तत्त्वाला साडी आणि खण यांच्या रूपाने मूर्त सगुण रूपात साकार होण्यास साहाय्य होते.....


२. देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत...


अ. देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी; कारण देवतेकडून येणार्‍या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते.....


आ. एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण, नारळ आणि थोडे तांदूळ ठेवावेत... नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी. नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील, अशा पद्धतीने देवीसमोर उभे रहावे.....


इ. देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी’, अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी... यामुळे देवीतत्त्व जागृत होण्यास साहाय्य होते.....


ई. ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ वहावेत.....


उ. देवीला अर्पण केलेली साडी शक्य असल्यास परिधान करावी, तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे.....


३. देवीची ओटी भरतांना होणारी सूक्ष्मातील प्रक्रिया आणि त्यामुळे होणारे लाभ.....


अ. नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्त्व आकृष्ट होते... हे तत्त्व नारळाद्वारे खण आणि साडी यांमध्ये संक्रमित होण्यास साहाय्य होते. तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणार्‍या लहरींमुळे जिवाच्या शरिराभोवती संरक्षक-कवच निर्माण होते.....


आ. वस्त्रातून पृथ्वीतत्त्वाच्या साहाय्याने सात्त्विक लहरी प्रक्षेपित होतात... या लहरी नारळातील पाण्यात असलेल्या आपतत्त्वाच्या साहाय्याने प्रक्षेपित होणार्‍या लहरींमुळे गतीमान होऊन कार्यरत होतात. त्यामुळे पूजा करणार्‍याच्या देहाभोवती त्या लहरींचे संरक्षक-कवच निर्माण होण्यास साहाय्य होते. तसेच साडी आणि खण यांमध्ये आलेल्या देवीतत्त्वाच्या सात्त्विक लहरींमुळे आपला प्राणदेह आणि प्राणमयकोश यांची शुद्धी होण्यास साहाय्य होते.....


इ. हाताची ओंजळ छातीसमोर येईल, अशा पद्धतीने उभे राहिल्याने होणार्‍या मुद्रेमुळे शरिरातील चंद्रनाडी कार्यरत होण्यास साहाय्य होते, तसेच मनोमयकोशातील सत्त्वकणांचे प्रमाण वाढण्यास साहाय्य झाल्याने मन शांत होते... या मुद्रेमुळे पूजक देवतेसमोर जास्तीतजास्त नम्र होतो. देवतेकडून येणार्‍या सात्त्विक लहरी हाताच्या बोटांतून पूजा करणार्‍याच्या शरिरात संक्रमित होण्यास साहाय्य झाल्याने शरिरातील अनाहतचक्र कार्यरत होऊन पूजा करणार्‍याचा देवीप्रती भाव जागृत होतो. यामुळे त्याच्या स्थूल आणि सूक्ष्म या देहांची शुद्धी होण्यास साहाय्य होते. जेवढा देवीप्रती भाव जास्त, तेवढी पूजाविधीतून मिळालेली सात्त्विकता जास्त काळ टिकते.....


ई. तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्याचे ग्रहण आणि प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात. त्यामुळे तांदळाचा समावेश ओटीत प्राधान्याने केला जातो.....


४. विशिष्ट देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्याने काय लाभ होतो... ?


‘त्या त्या देवीला तिचे तत्त्व जास्तीतजास्त आणि लवकर आकृष्ट करून घेणार्‍या रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्याने त्या त्या देवीचे तत्त्व जिवासाठी अल्प कालावधीत कार्यरत होते... पुढील सारणीत काही देवींची नावे आणि त्या देवींचे तत्त्व जास्तीतजास्त अन् लवकर आकृष्ट करणारे रंग (त्या त्या देवीच्या तत्त्वाशी संबंधित रंग) दिले आहेत.....


५० टक्क्यांपेक्षा जास्त आध्यात्मिक पातळीच्या किंवा भाव असलेल्या साधकाने विशिष्ट उद्देशासाठी देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि साडी अर्पण करण्याची तेवढी आवश्यकता नसते; कारण जिवाच्या भावावर किंवा प्रार्थनेवर अल्प-अधिक प्रमाणात देवीच्या तारक किंवा मारक या रूपांनी जिवाकरता कार्य करणे अवलंबून असते.....


‘देवीचे तत्त्व, तत्त्वाशी संबंधित रंग, रंगांचे प्रमाण ....(टक्के)


१. श्री दुर्गादेवी, तांबडा (लाल), -


२. श्री महालक्ष्मी, तांबडा + केशरी, ६० + ४०


३. श्री लक्ष्मी, तांबडा + पिवळा, ४० + ६०


४. श्री सरस्वती, पांढरा, –


५. श्री महासरस्वती, पांढरा + तांबडा, ६० + ४०


६. श्री काली, जांभळा, –


७. श्री महाकाली, जांभळा + तांबडा,८० + २०


५. देवीला सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी अर्पण करणे अधिक योग्य का ठरते... ?


देवीला नऊवारी साडी अर्पण करणे, हे पूजा करणार्‍याच्या आवश्यकतेप्रमाणे देवीने नऊ रूपांच्या माध्यमातून कार्य करण्याचे प्रतीक असणे.....


देवतेप्रती भाव असणार्‍या आणि गुरुकृपायोगाप्रमाणे समष्टी साधना करणार्‍या पूजकाने त्याच्या भावानुसार देवीला कोणत्याही प्रकारची साडी अर्पण केली, तरी चालू शकते; कारण त्याच्या भावामुळे अपेक्षित फळाचा लाभ त्याला होतोच... मात्र प्राथमिक टप्प्याच्या साधकाची किंवा कर्मकांडाप्रमाणे साधना करणार्‍यांची प्रत्येक गोष्ट नियमानुसार होणे महत्त्वाचे असल्याने त्यांनी देवीला सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी अर्पण करणे योग्य आहे. नऊवारी साडी अर्पण करणे, हे पूजा करणार्‍याच्या आवश्यकतेप्रमाणे देवीने नऊ रूपांच्या माध्यमातून कार्य करण्याचे प्रतीक आहे. नऊवारी साडीतील नऊ वार (स्तर) हे देवीची कार्य करणारी नऊ रूपे दर्शवतात. नऊवारी साडी अर्पण करणे, म्हणजे मूळ निर्गुण शक्‍तीला, जिच्यात देवीतत्त्वाची, म्हणजेच शक्‍तीची सर्व रूपे सामावलेली आहेत, त्या श्री दुर्गादेवीला तिच्या नऊ अंगांसह (नऊ रूपांसह) प्रगट होऊन कार्य करण्याचे आवाहन करणे होय. ‘९’ हा आकडा श्री दुर्गादेवीच्या कार्य करणार्‍या प्रमुख नऊ रूपांचे प्रतिनिधीत्व करतो.....


७. देवीला अर्पण केल्या जाणार्‍या खणाचा आकार त्रिकोणी का असतो ..?


त्रिकोणी आकार हा ब्रह्मा-विष्णु-महेश यांपैकी ब्रह्माच्या इच्छाशक्‍तीशी निगडित आहे... ब्रह्मांडातील इच्छालहरींचे भ्रमणही उजवीकडून डावीकडे त्रिकोणी आकारात संक्रमित होत असते. देवीला त्रिकोणी आकारातील खण अर्पण करणे, म्हणजे ‘आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी’, यासाठी आदिशक्‍ती श्री दुर्गादेवीची इच्छाशक्‍ती प्रबळ करून तिची  कृपादृष्टी संपादन करणे.....

मंगलवार, 17 अक्टूबर 2023

🌹 नवरात्रीत ९ दिवस ९ नैवेद्य 🌹

 🌹 नवरात्रीत ९ दिवस ९ नैवेद्य 🌹


Navratri puja offerings   
नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास केले जातात. प्रत्येक भक्तांना या नऊ दिवसात देवीला काय नैवेद्य दाखवाव, जेणेकरून देवी आपल्यावर प्रसन्न होईल. असे वाटत असते. दरम्यान या दिवसात देवीला नैवेद्य दाखवल्या शिवाय कोणताही उपवास पूर्ण होत नाही असे मानले जाते. त्यामुळे नवरात्रीमध्ये देवीला वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात. त्यामुळे नवरात्रीमध्ये देवीला नऊ दिवस दाखवले जाणार नऊ नैवेद्य पाहणार आहोत.




Nine days of Navratri 

१)नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीचे प्रथम रुप माता शैलपुत्रीचे पुजन केले जाते. यादिवशी देवीला गायीचे शुद्ध तुप अर्पण केले जाते. यामुळे उपवास करणारा निरोगी राहतो.


Navratri ritual food 

२)त्यानंतर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणीची पुजा केली जाते. मात ब्रह्मचारिणीला प्रसन्न करण्यासाठी देवीच्या चरणी साखरेचा नैवेद्य दाखवला जातो. यामुळे घरातील सदस्याचे आयुष्य वाढते असे म्हटले जाते.


Navratri prasad for 9 days 

३)नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटाची पुजा केली जाते. यादिवशी देवी दुध किंवा दुधापासून तयार केलेले पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवला जातो. यामुळे दुःखपासून मुक्ती मिळते आणि आनंदाची प्राप्ती होते.


Nine Navratri naivedyam items 

४)चौथ्या दिवशी माता कुष्माण्डाची पुजा केली जाते. यादिवशी देवीला मालपोह्याचा नैवेद्य दाखवला जातो. यामुळे उपवास करणाऱ्या व्यक्तीच्या बुद्धीचा विकार होतो आणि निर्णय घेण्याची क्षमता देखील वाढते.


Navratri 9 offerings to Goddess 

५)नवरात्रीच्या पाचव्या दिवशी माता स्कंदमातेची पुजा-अर्जा केली जाते. यादिवशी देवीला कळ्याचा नैवेद्य दाखवला जातो. यामुळे शरीर स्वस्थ राहते.


नवरात्री नौ दिन नैवेद्य 

६)नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या सहाव्या रुपाची म्हणजे कात्यायनी मातेची पुजा केली जाते. देवीला मधाचा नैवेद्य अर्पण केला जातो. यामुळे उपवास करणाऱ्याची कांती तेजोमय होते.


Navratri traditions and rituals 

७)सप्तमी दिवशी माता कालरात्रीची पुजा केली जाते. यादिवशी देवीला गुळाचा नैवेद्य दाखवून एक नैवेद्याचे ताट जेवासहित ब्राम्हणाला दान करावे. यामुळे उपवास करणाऱ्यावर येणार संकट दूर होते.


How to celebrate Navratri 

८)अष्टमी दिवशी देवीच्या महागौरी रुपाची पुजा केली जाते. यादिवशी देवीला नारळाचा नैवेद्य दाखवला जातो.


Significance of 9 days of Navratri

९)नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे नवमीला देवीच्या सिद्धिदात्रीची पुजा केली जाते. यादिवशी देवीला तिळाचा नैवेद्य दाखवावा. हा उपवास केल्या व्यक्तीला मृत्यूचे भय राहत नाही असे म्हटले जाते.



  1. Related Topics

  2. नवरात्री 9 दिवस उपासना
  3. नवरात्री 9 दिवस नैवेद्य पूजा
  4. नौ दिवसीय नवरात्री उपासना
  5. नवरात्री उपासना सांगणारे ग्रंथ
  6. नवरात्री पूजा विधी मराठी
  1. नवरात्रि 9 दिन उपासना
  2. नवरात्रि 9 दिन नैवेद्य पूजा
  3. नौ दिनी नवरात्रि उपासना
  4. नवरात्रि पूजा के लिए किताबें
  5. नवरात्रि पूजा विधि हिंदी में

सोमवार, 9 अक्टूबर 2023

भगरीचे आरोग्यासाठी फायदे...

भगरीचे आरोग्यासाठी फायदे...


भगर म्हणजेच ‘वरीचे तांदूळ’ हे आपल्या घरी उपवासाच्या दिवशी केले जातात.


सहसा उपवासाचा दिवस सोडला तर इतर दिवशी आपण भगर खात नाही.


पण या भगरीत काय काय घटक आहेत आणि ती किती पौष्टिक आहे हे वाचले तर असे लक्षात येईल की एरवी सुद्धा खायला हा पदार्थ किती चांगला आहे.


आज आपण याच उपवासाच्या पदार्थाबद्दल जाणून घेणार आहोत.


खरंतर भगर हे काही धान्य नाही. भगर म्हणजे शेतात आपोआप उगवणाऱ्या गवताच्या एका प्रकारच्या बिया.


हिंदीमध्ये याला ‘सामा चावल’ म्हणतात.


शिजलेल्या भगरीची चव सुद्धा काहीशी भातासारखीच असते.


भगर हे पटापट वाढणारे पीक आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण ‘बी’ पेरल्यापासून केवळ पंचेचाळीस दिवसात भगरीचे पीक तयार होते.


भगर हे अख्या भारतभर उपवासाच्या दिवशी केले जाते, पण ते केवळ उपवासापुरते मर्यादित न ठेवता इतर वेळेस पण खाण्यासाठी किती उपयुक्त आहे हे आपण आता बघणार आहोत.

जाणून घेऊयात भगरीत असलेली पोषकद्रव्ये आणि त्याचा आपल्या शरीराला होणारा उपयोग

1. जास्त प्रमाणात प्रोटीन


भगरीमध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते.


तांदूळ, गहू, ज्वारी या धान्यापेक्षा भगरीत कॅलरी कमी असतात.


जास्त प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे थोडीशी भगर खाऊन सुद्धा अंगात शक्ती येते.


कॅलरी कमी असल्यामुळे वजन आटोक्यात ठेवण्यासाठी सुद्धा भगर उपयुक्त ठरते.


2. फायबर रिच फूड


भगरीत फायबर खूप जास्त प्रमाणात आढळतात.


आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन व्हायला फायबरची गरज असते.


म्हणूनच आहारात फायबरचे प्रमाण जास्त असेल तर पचनाच्या तक्रारी कमी होतात.


भगर पचायला हलकी असते. भगर खाल्याने कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर तो दूर होतो, गॅसेस होत नाहीत आणि अपचनामुळे पोट दुखत असेल तर ते सुद्धा दुखायचे कमी होते.

 

आहारात फायबरचे प्रमाण जास्त असेल तर पोट भरल्याची भावना सुद्धा लवकर येते आणि जास्त वेळासाठी टिकून राहते.

 

या कारणामुळेच वजन कमी करायचे असेल तर भगर हा एक चांगला पर्याय आहे.


3. लो ग्लायसेमिक इंडेक्स


भगर हे ‘लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड’ आहे. ‘लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड’ म्हणजे असे अन्न ज्यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असते आणि असलेले कार्बोहायड्रेट पचायला अतिशय सोपे असते.


यामुळे सुद्धा वजन आटोक्यात ठेवण्यासाठी भगर फायदेशीर आहे.


‘लो ग्लायसेमिक इंडेक्स’ असलेल्या अन्नामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.


मधुमेह असणाऱ्या लोकांना या प्रकारचे अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो.


अर्थातच मधुमेह असणाऱ्या लोकांनी भाताच्या ऐवजी भगर खाल्ली तर त्यांच्यासाठी ते फायदेशीर असते.


4. ग्लूटेन फ्री


भगरीत ग्लूटेन नसते. ग्लूटेन म्हणजे आपण खातो त्या धान्यात आढळणारा एक चिकट पदार्थ.


आपण ज्या धन्याच्या पिठाला मळतो त्यात ग्लूटेन असते, उदाहरणार्थ गव्हाचे पीठ. पिझा, पास्ता, ब्रेड यामध्ये ग्लूटेनचे प्रमाण जास्त असते.


ग्लूटेनमध्ये काही पोषक दर्वे नसतात, काही लोकांना ग्लूटेनची ऍलर्जी सुद्धा असते.


ग्लुटेनयुक्त पदार्थ खाल्ल्याने त्यांना पोटात दुखणे, अपचन यासारखे त्रास होतात.


अशांसाठी भगर जे पूर्णपणे ग्लूटेन फ्री आहे हा एक उत्तम पर्याय आहे, जो पचायला हलका आहे हे आपण वर बघितलेच आहे.


5. जास्त प्रमाणात आयर्न असते


भगरीत आयर्न जास्त प्रमाणात आढळते.


म्हणूनच आपल्याला जर ऍनेमियाचा त्रास (शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणे) सरल तर शरीरातले हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी भगर उपयोगी आहे.


इतर कोणत्याही धान्यात असते त्यापेक्षा जास्त प्रमाणात आयर्न भगरीतून मिळते.


साधारण 100 ग्राम भगरीतून 18.5 mg आयर्न मिळते. विशेषतः शाकाहारी लोकांसाठी भगर हा आयर्नचा सर्वोत्तम स्रोत आहे.


6. व्हिटॅमिन्स आणि खनिजे यांचे प्रमाण जास्त असते


भगरीत व्हिटॅमिन ‘सी’, ‘ए’ आणि ‘इ’ जास्त प्रमाणात असतात.


तसेच भगरीत खनिजे सुद्धा जास्त प्रमाणात आढळतात ज्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते.


7. सोडियम फ्री फूड


भगरीत सोडियम नसते ज्यामुळे बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदा होतो.


8. भरपूर अँटिऑक्सिडंट्स


साध्या भातापेक्षा भगरीमध्ये जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात.


अँटिऑक्सिडंट्स आपल्या शरीरातल्या पेशींची फ्री रॅडिकल्स नावाच्या धोकादायक मॉलिक्यूल पासून संरक्षण करतात.


मोठी माणसे भगर जरी उपवासाला खात असले तरी बाळाला पहिल्यांदा बाहेरचे अन्न देताना, अगदी सहाव्या सातव्या महिन्यापासून भगरीची खीर करून दिली तर बाळासाठी तो उत्तम पोषक आहार ठरतो.


कारण ती पचायला अतिशय हलकी असते.


भगरीसारखे इतके सकस अन्न, फक्त उपवासासाठी न वापरता त्याचा रोजच्या आहारात उपयोग झाला पाहिजे.


शिवाय नवरात्रात नऊ दिवसांचा उपवास करताना, आपल्या शरीराला पोषक आहार मिळून ऊर्जा टिकून राहण्यासाठी भगरीचा वापर सर्वात जास्त करावा.

रविवार, 8 अक्टूबर 2023

बहुगुणी तीळ...!

 बहुगुणी तीळ! तीळ :- 


तीळ मजबुत हाडांसाठी. तीळात कॅल्शियम आहे, ते आपल्या सर्वांना माहीतच आहे. याशिवाय मँगनीज, लोह, फॉस्फरस, सेलेनियम, ब गटातील जीवनसत्त्वे आणि तंतुमय पदार्थही आहेत. तीळातील कॅल्शियम हाडांसाठी चांगलं तर आहेच, तसेच तीळात झिंक जास्त असते, जे हाडांचा ठिसूळपणा रोखण्यास मदत करते. थोडक्यातच स्त्रियांना याचा खूप फायदा होऊ शकतो. तीळातील कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे घटक हाडांसाठी पोषक ठरतात. थंडीच्या दिवसात तीळ खाण्याची सवय ठेवल्यास हाडं किंवा सांधेदुखीचा त्रास जाणवणार नाही. दिवसातून एकदा तुम्ही मोठा चमचाभर तीळ खाल्लेत, तर तुमचे दातही मजबूत होतील. 

तीळ in english 

तिळात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स उच्च प्रमाणात असल्यामुळे रोग प्रतिकारशक्तीही वाढते. हिवाळा स्वास्थासाठी चांगला मानला जातो. थंडीच्या दिवसांत अशा काही गोष्टी मिळतात ज्या आपल्या शरीरासाठी फायदेशीर मानल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे तीळ. तीळ एक असा खाद्यपदार्थ आहे, ज्यात अनेक गुणकारी घटक असतात. दिसायला अतिशय छोटा असणाऱ्या तीळाचे मोठे फायदे आहेत. थंडीत तीळाचं सेवन शरीरासाठी उत्तम मानलं जातं. तीळामुळे शरीराला उष्णता मिळण्यास मदत होते. तर आपल्या शरीराची हाडंदेखील मजबूत करते. 

अंगावरील तीळ in English

वैज्ञानिकदृष्ट्या तीळाच्या तेलामध्ये केसांसाठी पोषक घटक असल्याचं सांगण्यात आलं आहे. तीळाच्या तेलात व्हिटॅमिन ई, बी कॉम्प्लेक्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि प्रोटीनही मूबलक प्रमाणात आढळतं.

जाणून घ्या! तीळ खाण्याचे ‘हे’ १० फायदे

◼️तीळात सेसमीन नावाचे एन्टीऑक्सिडेन्ट आढळतात जे कॅन्सर पेशी वाढण्यापासून बचाव करतात. 


◼️तीळाच्या सेवनामुळे भूक वाढते. तीळ वात, पित्त आणि कफची समस्या कमी करण्यास मदत करते. 

तीळ खाण्याचे फायदे तोटे 

◼️तीळाच्या तेलाने सतत मालिश केल्याने हाडं मजबूत होण्यास मदत होते. 


◼️थंडीच्या दिवसांत तीळाचं तेल त्वचेवर लावल्याने त्वचेवरील रखरखीतपणा दूर होतो. तीळाच्या सेवनाने चेहरा चमकदार होण्यास मदत होते. 

जवस खाण्याचे फायदे 

◼️पोटात दुखत असल्यास काळे तीळ गरम पाण्यासोबत खाल्ल्याने पोटदुखीपासून आराम मिळतो. 


◼️तीळामध्ये असणाऱ्या काही घटकांमुळे तणाव, डिप्रेशनच्या समस्यांपासून सुटका होण्यास मदत मिळू शकते.


◼️तीळ आणि खडीसाखर एकत्र खाल्ल्याने सुक्या खोकल्यापासून आराम मिळू शकतो. 

खसखस खाण्याचे फायदे

◼️कान दुखत असल्यास तीळाच्या तेलात लसून एकत्र करुन, तेल हलकं गरम करुन लावल्यास कानदुखी कमी होऊ शकते.


◼️तीळाचं सेवन दातांसाठीही गुणकारी ठरतं. सकाळी ब्रश केल्यानंतर तीळ चावून खाल्ल्याने दात मजबूत होण्यास फायदा होतो.

 तिळाच्या तेलाचे फायदे 

◼️सतत तोंड येत असल्यास तीळाच्या तेलात सेंधव मीठ मिसळून लावल्यास आराम पडू  शकतो.


म्हणूनच पूर्वीपासून तीळ आणि तिळाचे तेल चिरतारुण्यासाठी वापरत असावेत.

fly