सोमवार, 10 अप्रैल 2023

सापाचे झाले सोने

 



सापाचे झाले सोने



मणब्याचा उद्धार पाहून स्वामींना भेटायला निघालेले शास्त्री एका जागेवर विसाव्या साठी थांबतात.

तिथे एका वृद्द्ध आणी गरीब माणसाला पाणी पाजायला एक श्रींमत माणूस घोड्यावरून

उतरून येतो. तो व्यक्ती त्या म्हाताऱ्या माणसाला पण स्वामी म्हणुन हाक मारतो.

शास्त्रीबुवानी विचारल्यावर तो माणूस आपला पूर्व वृतांत सांगतो.

तो बसप्पा असतो, जातींनी तेली पण प्रपंचात मन लागत नाही.

कोणतेही आजीविकेचे कार्य करायची त्याला इच्छाच होत नाही त्याल सुचते ते फक्त नामस्मरण आणी ईश्वराचे ध्यान.

त्यामुळे घरचे अगदी कंटाळले होते.

आणी कंटाळणार पण का नाही? घरात अन्न नाही, भूखेनी रडणारे मुलं-बाळं.

काहीही झाले तरी बसप्पाला ईश्वर उपासने शिवाय दुसरे कार्य करायचीच इच्छा होत नाही.

चित्त शांत व्हावे म्हणुन तो अनेक साधुंशी भेटला अनेकांना गुरु करू पहिले पण चित्ताला ओळख पटली नाही

या मुळे तो उद्विग्न राहायचा.

एकदा वनात त्याला काट्यांमध्ये झोपलेले स्वामी दिसतात.

काट्या मध्ये शांत पणे झोपणारा माणूस साधारण नसावा ,म्हणुन बसप्पा स्वामींशी संवाद करतो.

बसप्पाला पहिल्या  बरोबर स्वामी म्हणतात;-"काय रे तेल्या! घर संसार सोडुन मोक्ष पाहिझे?"

"अरे अशी जवाबदारी टाकून का पळत आहे?"

"घरच्यांना कोण पाहणार?"

स्वामी अंतर्यामी आहे हे कळल्यावर बसप्पा घट्ट स्वामींचे पाय धरतो.

स्वामी म्हणतात:-"योग्य वेळ आली की तुला बोलावु"

काही दिवसांनी रात्री स्वप्नात दृष्टांत देउन स्वामी बसप्पाला बोलावतात.

बसप्पा येतो पण स्वामी दुर जातात.बसप्पा पण मागे-मागे येतो, स्वामींच्या मागे जातांना काटे लागून बसप्पा रक्त-बंबाळ

होतो, तेव्हा स्वामी थांबतात.

स्वामी म्हणतात: 'हमारे साथ चलना इतना आसान नही है, जावो वापस जावो "

"आपल्या संसाराची काळजी घे."

बसप्पा म्हणतो:" प्रपंच आणी परमार्थ एका बरोबर जमत नाही, प्रपंचात ईश्वराचा विसर होतो"

स्वामी म्हणतात:" अरे रामदास स्वामी म्हणुन गेले आहे- "प्रपंच करावा नेटका .........."

"देव प्राप्तीसाठी पळण्याची गरज नाही लायकी झाल्यावर देव स्वत: भेटायला येईल"

" पुंडलिका कडे पांडुरंग आला, एकनाथ कडे पाणी भरले "

स्वामी पुढे जातात. बसप्पा तसाच लंगडत येतो. या वेळेला स्वामी जिथे थांबतात तिथे चारी कडे सापच-साप होते.

स्वामी म्हणतात :- "आमची एवढी सेवा केली त्या बद्दल तुला काही देऊ."

"पण आमच्या कडे काय आहे ? जा हे साप घेऊन जा . वाट्टेल तेवढे साप घेऊन जा."

बसप्पा थरथरतो.

स्वामी एक साप उचलून देतात,बसप्पा जवळ असलेल्या कपड्याची झोळी पसरवतो आणी त्यात साप बांधून घरी जातो.

रस्त्यात साप सोडुन द्यावा असा विचार येतो पण स्वामींनी दिलेला साप कसा सोडु , असा विचार करुन मुकाट्यानी चालत जातो.

घरी गेल्यावर बायको आशेनी गाठोडीत काय आहे म्हणुन विचारते.

तिला काही म्हणणार त्याआधी बायको गाठोडी हिसकवुन घेते.

उघडते तर काय, त्यात चक्क सोन्याचा साप.

बसाप्पाच्या बायकोनी कधी गुंजभर सोनं पाहिलेले नव्हते, आणी आता तर भला मोठ्ठा सोन्याचा साप.

बसप्पा एका काळी पोरा-बाळांना पोटभर अन्न सुद्धादेऊ शकत नव्हता तो आता गावाचा श्रीमंत माणूस बनतो.

त्या दिवशी पासुन बसप्पा प्रत्येक अडलेल्या-नाडलेल्या व्यक्ती मध्ये स्वामी पाहून त्यांना स्वामी म्हणुन हाक मारायचा.आणी यथासांग मदत करायचा.

बसाप्पाचा असा वृतांत ऐकुन नारायण शास्त्री आणखीच गोन्धलतात आणी नव्या जोमानी अक्कलकोट कडे चालायला लागतात.


🌹 स्वामीगुरूमाऊली 🌹🙏🏻

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly